एक्स्प्लोर

पंड्या आणि राहुलचे निलंबन मागे, भारतीय संघात पुनरागमन

सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त अॅमिकस क्युरी पी. एस. नरसिंह यांच्याशी चर्चा करुनच बीसीसीआयच्या प्रशासकांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होऊ शकतो, तर केएल राहुल राष्ट्रीय क्रिकेटमध्ये किंवा भारत 'अ' संघाकडून खेळू शकतो.

मुंबई : 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमातल्या महिलांविषयीच्या आक्षेपार्ह विधानांप्रकरणी हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई बीसीसीआयच्या प्रशासकांनी दोन आठवड्यांनी मागे घेतली आहे. सध्या सुरु असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी निवड समितीने हार्दिक पंडयाचा भारतीय संघामध्ये समावेश केला आहे. तर केएल राहुलचा भारतीय ‘अ’ संघात समावेश केला आहे. या बद्दलची माहिती बीसीसीआयने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त अॅमिकस क्युरी पी. एस. नरसिंह यांच्याशी चर्चा करुनच बीसीसीआयच्या प्रशासकांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होऊ शकतो, तर केएल राहुल राष्ट्रीय क्रिकेटमध्ये किंवा भारत 'अ' संघाकडून खेळू शकतो. दरम्यान, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोकपालांकडून पंड्या आणि राहुल यांची चौकशी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात पाच फेब्रुवारीला होत असलेल्या सुनावणीत लोकपालांची नियुक्ती करण्यात येईल. न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत भारताने सध्या 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तर कर्णधार विराट कोहलीला शेवटच्या दोन वनडेसाठी विश्रांती देण्यात येणार आहे. का केलं बीसीसीआयने हार्दिक पंड्या आणि केएल राहुलचं  निलंबन, काय आहे प्रकरण? 25 वर्षीय हार्दिक पंड्या केएल राहुलसह चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये आला होता. या शोमध्ये त्याने अनेक वादग्रस्त टिप्पणी केल्या होत्या. "एकच मेसेज अनेक मुलींना पाठवण्यात मला काहीच अडचण नाही आणि मी त्यांच्याशी त्यांच्या 'उपलब्ध' असण्याबाबत खुलेआम चर्चा करतो," असं हार्दिकने शोमध्ये सांगितलं. आपण अनेक महिलांसोबत रिलेशनशिप होतो आणि ही बाब पालकांनाही माहित असल्याची कबुली हार्दिक पंड्याने शोमध्ये दिली. तो म्हणाला की, "जेव्हा मी कौमार्य गमावलं, त्यावेळी आई-वडिलांना 'आज मी करुन आलोय' असं सांगितलं होतं. यानंतर सोशल मीडियावर हार्दिक पंड्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. या टिप्पणीनंतर सगळ्यांनीच सोशल मीडियावर त्याची शाळा घेतली. आपली चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने बुधवारी एका ट्वीटच्या माध्यमातून खेद व्यक्त करत माफी मागितली. "कॉफी विद करणध्ये माझ्या टिप्पणीमुळे जे दुखावले किंवा ज्यांना अपमान झाल्याचं वाटलं त्या सगळ्यांची माफी मागतो. मी जरा जास्तच बोललो. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. सन्मान" संबधित बातम्या करणची कॉफी भोवली, पंड्या आणि राहुल निलंबित राहुल-पंड्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर विराटची प्रतिक्रिया हार्दिक आणि राहुलवर दोन वनडे सामन्यांच्या बंदीची शिफारस पंड्या आणि राहुलच्या निलंबनानंतर ‘या’ दोन खेळाडूंची संघात निवड
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 : मुंबई इंडियन्सला रोखणार कोण? यंदा सहावी ट्रॉफी पक्की?
IPL 2026 : मुंबई इंडियन्सला रोखणार कोण? यंदा सहावी ट्रॉफी पक्की?
Aryaman Birla RCB IPL 2026: 2018 मध्ये राजस्थानकडून आयपीएल खेळले, आता आरसीबीचे मालक झाले; कोण आहेत आर्यमन बिर्ला?
2018 मध्ये राजस्थानकडून आयपीएल खेळले, आता आरसीबीचे मालक झाले; कोण आहेत आर्यमन बिर्ला?
RCB : राजस्थान रॉयल्सचा विक्रम RCB ने मोडला, आयपीएलमधील सर्वात महागडा संघ, किती कोटींचा करार, नवा मालक कोण?
राजस्थान रॉयल्सचा विक्रम RCB ने मोडला, आयपीएलमधील सर्वात महागडा संघ, किती कोटींचा करार, नवा मालक कोण?
BCCI : बीसीसीआयची मोठी कारवाई, इंग्लंडच्या स्टार खेळाडूवर 2 वर्षांची बंदी, आयपीएलमधून नाव मागं घेणं भोवलं
BCCI ची मोठी कारवाई, इंग्लंडच्या स्टार खेळाडूवर 2 वर्षांची बंदी, IPL मधून नाव मागं घेणं भोवलं

व्हिडीओ

Neelam Gorhe on Uddhav Thackeray : निरोपाच्या भाषणात सर्वांचं कौतुक, पण ठाकरेंवर जहरी टीका
Vijay Wadettiwar on Ashok Kharat : तीन जणांची विकेट जाणार, सगळे ना$%& होतील
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी
भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी
Monalisa And Farman Khan: 'मी आतंकवादी नाही...'; मोनालिसा अन् फरमान खानला जीवे मारण्याची धमकी, जीवाचं बरं वाईट करण्याचाही दिला इशारा
'मी आतंकवादी नाही...'; मोनालिसा अन् फरमान खानला जीवे मारण्याची धमकी, जीवाचं बरं वाईट करण्याचाही दिला इशारा
Ashok Kharat and Devendra Fadnavis: अशोक खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
LPG Connection Booking: सिलेंडर बुकिंगसंदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणताही नियम बदलला नाही, सरकारनं नेमकं काय सांगितलं?
एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी 35 दिवस ही निव्वळ अफवाच, केंद्र सरकारनं नेमकं काय सांगितलं?
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता, राज्य सरकारचा मोठा निर्णय समोर, जाणून घ्या नवी अपडेट
लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता, राज्य सरकारचा मोठा निर्णय समोर, जाणून घ्या
शेतकऱ्याचा नादच खुळा, लालऐवजी पिवळं अन् केशरी रंगाचं टरबूज; शेतीतला गोल्डन प्रयोग यशस्वी
शेतकऱ्याचा नादच खुळा, लालऐवजी पिवळं अन् केशरी रंगाचं टरबूज; शेतीतला गोल्डन प्रयोग यशस्वी
'गेल्या तीन वर्षांत जगात सर्वाधिक घसरण इराणी रियाल, लेबनीज पाउंड आणि भारतीय रुपयाची झाली, इराण आणि लेबनॉनवर बॉम्ब पडत आहेत, पण आपल्या देशावर कोणते बॉम्ब पडत आहेत?'
'गेल्या तीन वर्षांत जगात सर्वाधिक घसरण इराणी रियाल, लेबनीज पाउंड आणि भारतीय रुपयाची झाली, इराण आणि लेबनॉनवर बॉम्ब पडत आहेत, पण आपल्या देशावर कोणते बॉम्ब पडत आहेत?'
कोल्हापुरात पिण्याचा पाण्याचा शिमगा संपत नसताना आता गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलमुळे जीव सपशेल टांगणीला; पहाटेपासूनच अनेक पेट्रोल पंपावर रांगा, जिल्हा प्रशासनाच्या कागदी घोड्यांनी काहीच अंदाज येईना
कोल्हापुरात पिण्याचा पाण्याचा शिमगा संपत नसताना आता गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलमुळे जीव सपशेल टांगणीला; पहाटेपासूनच अनेक पेट्रोल पंपावर रांगा, जिल्हा प्रशासनाच्या कागदी घोड्यांनी काहीच अंदाज येईना
Embed widget