एक्स्प्लोर

IND vs PAK, Asia Cup: हरभजन-अख्तरचा वाद, कोहलीचं दमदार शतक; भारत-पाकिस्तान यांच्यातील पाच जबरदस्त सामने

Asia Cup 2022: आशिया चषकाला येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Ind vs Pak) होणार आहे.

Asia Cup 2022: आशिया चषकाला येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Ind vs Pak) होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 28 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या लढतीपूर्वी दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांची उस्तुकता शिगेला पोहचलीय. तसेच त्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक संस्मरणीय सामने खेळले गेले. यातील पाच सामन्यांवर आपण नजर टाकुयात.

हरभजन-अख्तरचा वाद
आशिया कप 2010 च्या चौथ्या सामन्यात भारत- पाकिस्तान एकमेकांशी भिडले. प्रथम फलंदाजी करत पाकिस्ताननं भारतासमोर 268 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून गौतम गंभीरनं 83 आणि महेंद्रसिंह धोनीनं 56 धावा केल्या. अखेरच्या षटकात सुरेश रैना (34 धावा) बाद झाल्यानंतर सामना भारताच्या हातातून निसटताना दिसला. मात्र, हरभजननं मोहम्मद अमीरच्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात हरभजननं अख्तरच्या चेंडूवर षटकार ठोकला होता. यानंतर पाकिस्तानचा हा गोलंदाज संतापला. त्याची हरभजनशी टक्कर झाली. भज्जीनंही अख्तरला त्याच्याच शैलीत उत्तर दिलं.

विराट कोहलीची संस्मरणीय खेळी
2012 मध्ये खेळण्यात आलेल्या आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी संस्मरणीय ठरला. मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं 50 षटकात सहा विकेट्स गमावून 329 धावा केल्या. पाकिस्तानकडून नासिर जमशेदनं 112 आणि मोहम्मद हाफिजनं 105 धावांची तुफानी खेळी केली होती. ज्यामुळं भारताला विजयासाठी 330 धावांचं विशाल लक्ष्य मिळालं होतं. परंतु, विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर भारतानं हा सामना 13 चेंडू शिल्लक असतानाच जिंकला. या सामन्यात विराट कोहलीनं 148 चेंडूत 183 धावांची खेळी केली होती. ज्यात 22 चौकार आणि दोन षटकांराचा समावेश होता. विराट व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर 52 आणि रोहित शर्मानं 68 धावांचं योगदान दिलं.

अखेरच्या षटकात शाहीद आफ्रिदीनं सामना फिरवला
2014 च्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं आठ विकेट्स गमावून 245 धावा केल्या. भारताकडून अंबाती रायुडूनं 58, रोहित शर्मानं 56 आणि रवींद्र जडेजानं नाबाद 52 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. पण शाहिद आफ्रिदीनं अखेर षटकात सामना फिरवला. शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 10 धावा करायच्या होत्या. त्यावेळी कर्णधार धोनीनं रविचंद्रन अश्विनला गोलंदाजीसाठी बोलावलं. अश्विनने पहिल्याच चेंडूवर अजमलला बाद केलं. भारत हा सामना जिंकेल असं वाटत होतं. पंरतु पुढच्या चेंडूवर जुनैदनं एक धाव काढून आफ्रिदीला स्ट्राईक दिली. भारताला सामना जिंकण्यासाठी फक्त एका विकेट्सची गरज होती. पण अखेरच्या षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर षटकार मारून पाकिस्तानला सामना जिंकून दिला.

मोहम्मद आमिरची खतरनाक गोलंदाजी
आशिया कप 2016 मध्ये भारत आणि पाकिस्तान आमने- सामने आले होते. त्यावेळी मोहम्मद आमिरनं खतरनाक गोलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ 17.3 षटकांत 83 धावांवर आटोपला. मात्र, 84 धावांचं लक्ष्य सोप वाटत असलं तरी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरनं भारतीय फलंदाजाच्या नाकी नऊ आणले होते. मोहम्मद अमीरनं पहिल्या दोन षटकांत भारताच्या तीन फलंदाजाला माघारी धाडलं. त्यानं पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माला शून्यावर बाद केलं. दुसऱ्याच षटकात सुरेश रैनालाही ( एक धावा) पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. कठीण परिस्थितीत पुन्हा कोहली भारतासाठी तारणहार ठरला. त्यानं 49 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला.

शिखर-रोहितच्या जोडीचा धमाका
आशिया चषकाच्या मागच्या हंगामात भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने झाले होते. सुपर-4 सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवननं शानदार खेळी केली. दुबईत प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत 237 धावा केल्या. शोएब मलिकनं 78 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानं 63 चेंडू आणि नऊ विकेट्स राखून सामना जिंकला. शिखर धवननं 114 आणि रोहित शर्मानं नाबाद 111 धावांची खेळी केली. 

 

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?

व्हिडीओ

Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget