एक्स्प्लोर
निसर्ग सौंदर्याने नटलेली भारतातील 10 पर्यटनस्थळे
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 13 Jun 2016 10:52 AM (IST)
1/10

महाबळेश्वर( महाराष्ट्र): सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे हिल स्टेशन पावसाळ्यात पर्यटकांसाठी पर्वणी ठरु शकतं. महाबळेश्वरच्या जवळच पाचगणी हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. ( फोटो सौजन्यः विकिपीडिया)
2/10

अंबोली( महाराष्ट्र): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली हे हिल स्टेशन महाराष्ट्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात या ठिकाणचं सौंदर्य पाहण्यासारखं असतं. येथील वनराई, धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात. ( फोटो सौजन्यः विकिपीडिया)
3/10

माऊंट अबू (राजस्थान): अरवली पर्वतरांगांमधील माऊंट अबू हे थंड हवेचं ठिकाण आहे. माऊंट अबू येथील नद्या, धबधबे आणि प्रसिद्ध लेण्यांचं वातावरण पावसाळ्यात पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहेत. ( फोटो सौजन्यः विकिपीडिया)
4/10

गोवाः पर्यटन म्हटल्यानंतर सर्वात पहिला पर्याय हा नेहमी गोवा हाच येतो. गोव्याला प्रचंड मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. गोव्यातील समुद्र किनारे पर्यटकांचे खास आकर्षण आहेत. ( फोटो सौजन्यः विकिपीडिया)
5/10

गंगटोक (सिक्कीम): गंगटोक ही सिक्कीम राज्याची राजधानी आहे. हिमालयीन पर्वतरांगांमध्ये ट्रेकिंगसाठी गंगटोकची खास ओळख आहे. ( फोटो सौजन्यः विकिपीडिया)
6/10

धरमशाळा (हिमाचल प्रदेश): धरमशाळा हे हिमाचल प्रदेशातील दाट वनांनी वेढलेलं शहर आहे. जून महिन्यात येथील दाल लेणी, भागसुनग धबधबा ट्रुईंड हिल ही ठिकाणं पाहण्यासारखी असतात.( फोटो सौजन्यः विकिपीडिया)
7/10

कुर्ग (कर्नाटक): कर्नाटक राज्यातील कुर्ग जिल्हा हे पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. कुर्गमध्ये नैसर्गिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचा आनंद घेता येतो. येथील धबधबे पावसाळ्यात पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात.( फोटो सौजन्यः कुर्ग अधिकृत संकेतस्थळ)
8/10

नैनिताल (उत्तराखंड): नैनितालचं निसर्ग सौंदर्य जग प्रसिद्ध आहे. या सौंदर्यामध्ये पावसाळ्यात अजूनच भर पडते. येथील हिल स्टेशन ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहेत. ( फोटो सौजन्यः विकिपीडिया)
9/10

औली (उत्तराखंड): उत्तराखंडमधील औली हे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. स्की डेस्टिनेशन अशी याची ओळख आहे. मान्सूनमध्ये पर्यटक येथील स्नोफॉलचा आनंद घेऊ शकतात. औली हे ठिकाण समुद्रसपाटीपासून अडीच हजार मीटर उंचीवर आहे. ( फोटो सौजन्यः विकिपीडिया)
10/10

अलेप्पी(केरळ): भारतात मान्सनूचं पहिलं आगमन होतं ते केरळमध्ये. केरळचे किनारे पहिल्या पावसानंतर निसर्गाच्या सौंदर्याने नटतात. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची ओढ केरळकडे जास्त असते. अलेप्पी हे ठिकाण सांस्कृतिक, नैसर्गिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. ( फोटो सौजन्यः विकिपीडिया)
Published at : 13 Jun 2016 10:52 AM (IST)
Sponsored Links by Taboola
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
राजकारण
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
भविष्य
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
राजकारण
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?






















