एक्स्प्लोर
ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर भारताच्या नावावर 'हे' 7 विक्रम

1/8

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात हा सलग सातवा कसोटी मालिका विजय ठरला. 2015 मध्ये श्रीलंकेला 2-1 ने हरवल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
2/8

साल 2000 नंतर पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजांनी एका सामन्यात तीन किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या. यापूर्वी न्यूझीलंडमध्ये भारतीय गोलंदाजांनी ही कामगिरी केली होती.
3/8

सलामीवीर केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत सहा अर्धशतक ठोकले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा राहुल पहिलाच भारतीय सलामीवीर फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच अर्धशतक ठोकण्याचा विक्रम मुरली विजयने 2014-15 मध्ये केला होता.
4/8

भारताने मायदेशात खेळलेल्या या मोसमातील 13 सामन्यांपैकी 10 सामन्यात विजय मिळवला. पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, तर दोन सामने अनिर्णित राहिले.
5/8

धर्मशाला : हिमाचल प्रदेशातील धर्मशाला कसोटीत टीम इंडियाने हिमालयाच्या साक्षीने विजयाची गुढी उभारली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने धर्मशाला वनडेत ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवून, कसोटी मालिकेत विजयाची गुढी उभारली. या विजयासोबत भारताने अनेक विक्रमही नोंदवले आहेत.
6/8

मालिकेतील पहिल्या कसोटीत पराभव होऊनही मालिका जिंकण्याचा विक्रम चौथ्यांदा केला आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 1972-73 मध्ये, 2000-01 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2015 मध्ये श्रीलंकविरुद्ध भारताने अशी कामगिरी केली होती.
7/8

फिरकीपटू आर. अश्विनने 2016-17 या मोसमात सर्वाधिक 79 विकेट घेण्याचा विक्रम केला. एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा अश्विन पहिलाच गोलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेनच्या 2007-08 साली घेतलेल्या 78 विकेटचा विक्रम मोडीत काढला.
8/8

चेतेश्वर पुजारा पहिल्यांदाच भारतीय मैदानात शून्यावर बाद झाला. यापूर्वी परदेशात खेळलेल्या 31 कसोटी सामन्यांमध्ये तो दोन वेळा शून्यावर बाद झाला होता.
Published at : 28 Mar 2017 12:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
