एक्स्प्लोर
तळकोकणातील भात आणि नाचणी शेती लहरी पावसामुळे अडचणीत, शेतकरी हतबल
हिरवंगार दिसणारं शेत आता पिवळसर आणि करपून गेल्यासारखं दिसत आल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.
Sindhudurg Rice Farm
1/13

पावसाळ्यात कोकणातील प्रमुख पीक म्हणजे भात शेती.
2/13

मात्र हीच भातशेती पाऊस नसल्याने अडचणीत सापडली आहे.
3/13

पावसाचा अनियमितपणा भात शेतीसाठी मारत ठरला असून पावसाविना भातशेती कोमेजून गेली आहे.
4/13

तर भात पिकांची उंची देखील खुंटली आहे.
5/13

हिरवंगार दिसणारं शेत आता पिवळसर आणि करपून गेल्यासारखं दिसत आल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.
6/13

वातावरणातील बदलामुळे लहरी पावसाने शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे.
7/13

कारण ऑगस्टच्या महिन्याभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यावर्षी फक्त 220 मी.मी पावसाची नोंद झाली आहे.
8/13

यावर्षी जून महिना पावसाअभावी कोरडा गेला, त्यामुळे शेती उशिराने सुरु झाली.
9/13

त्यातही कोकणातील शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने भातशेती केली.
10/13

पावसाअभावी भातशेती कोमेजून गेली, काही ठिकाणी तर कातळ भागात आणि भरडी भागात रोपे सुकून गेली आहेत.
11/13

भाताची वाढ खुंटली तर भात शेती पिवळंसर झाली आहे.
12/13

खरंतर भात शेती फुलोऱ्यावर येणे अपेक्षित असताना पीक कोमेजून गेली.
13/13

त्यामुळे भाताचं उत्पन्न मिळेल की नाही याची देखील भीती शेतकऱ्याना सतावत आहे.
Published at : 01 Sep 2023 12:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
क्रिकेट
व्यापार-उद्योग
























