एक्स्प्लोर

Gotabaya Rajapaksa : माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे श्रीलंकेत परतले, आर्थिक संकटावेळी देशातून केलं होतं पलायन

Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील (Sri Lanka) आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर देश सोडून पळालेले माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) श्रीलंकेमध्ये परतले आहेत.

Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील आर्थिक संकटावेळी देश सोडून पळालेले माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Sri Lanka Ex President Gotabaya Rajapaksha) आता श्रीलंकेमध्ये परतले आहेत. कोलंबो विमानतळावर गोटाबाया राजपक्षे परतल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. गोटाबाया राजपक्षे सात आठवड्यानंतर श्रीलंकेत परतले आहेत. श्रीलंका (Sri Lanka) इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटाचा (Financial Crisis) सामना करत आहे. खाद्यपदार्थांपासून ते अगदी इंधनापर्यंत सर्वच गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला असून जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. सध्या राजपक्षे थायलँडमध्ये (Thailand) वास्तव्यास होते. आर्थिक संकटावेळी तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी देश सोडला होता.

गोटाबाया यांच्या परतीची तयारी

राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेच्या संसदेने रानिल विक्रमसिंघे यांची नवे राष्ट्रपती म्हणून म्हणून नियुक्ती केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्रमसिंघे यांनी राजपक्षे यांच्या परतण्याची व्यवस्था केली आहे. राजपक्षे कुटुंबीयांच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या पोदुजाना पेरामुना यांनी गोटाबायाच्या परतीची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता गोटाबाया राजपक्षे मायदेशी परतले आहेत.

थायलंड आधी सिंगापूर आणि मालदीवमध्ये मुक्काम

श्रीलंकेतून पलायन करत राजपक्षे यांनी आधी मालदीव आणि सिंगापूरमध्ये (Singapore) आश्रय घेतला होता. गोटाबाया राजपक्षे श्रीलंका सोडून मालदीवला गेले. तेथे एक दिवस मुक्काम केल्यानंतर ते  सिंगापूरला पोहोचले. मात्र राजपक्षे यांना कायदेशीर कारणांमुळे सिंगापूरही सोडावं लागलं. राजपक्षे यांचा सिंगापूर येथे राहण्यासाठीचा व्हिसा संपल्यामुळे त्यांनी सिंगापूर सोडून थायलँडमध्ये (Thailand) आश्रय घेतला होता. त्यानंतर ते आता श्रीलंकेत परतले आहेत. 

श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती बिकट, उपासमारीची वेळ

श्रीलंका इतिहासातील सर्वात मोठ्या आणि भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सध्या श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं चित्र आहे. देशात इंधनासह खाद्यपदार्थांचाही तुटवडा (Food Crisis) निर्माण झाला आहे. सध्या जीवनावश्यक वस्तूंची मोठी कमतरता जाणवत आहे. श्रीलंकेमध्ये सध्या उपासमारीची वेळ आली आहे. अन्नापासून ते स्वयंपाकाचा गॅस, औषध सारख्या जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा निर्माण झाला आहे.

12 जुलैला सोडला होता देश

श्रीलंकेमध्ये भीषण आर्थिक संकट निर्माण झाल्याने जनतेनं जागोजागी निदर्शनं करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर देशातील नागरिकांचा प्रचंड संताप पाहायला मिळाला. यावेळी जनता रस्त्यावर उतरली होती. तसेच त्रस्त नागरिकांनी राष्ट्रपती भवनावरही मोर्चा नेला होता. जनतेकडून गोटाबाया यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. या दरम्यान 12 जुलै 2022 रोजी तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडत पलायन केले होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
BMC Election 2026: भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
BMC Election 2026: भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
Embed widget