एक्स्प्लोर

पाकिस्तानचा कारगील युद्धात थेट सहभाग, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाने भर मंचावर दिली कबुली!

कारगील युद्धात भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. या युद्धात भारताचे शेकडो जवान शहीद झाले. याच युद्धावर पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखाने मोठी कबुली दिली आहे.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान हे दोघेही एकमेकांचे शेजारी राष्ट्र आहेत. या दोन्ही देशांच्या सीमा एकमेकांना लागून असली तरीही त्यांच्यातील संबंध फारसे चांगले नाहीत. जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये टोकाचे मतभेद आहेत. याच जम्मू आणि काश्मीर भूभागामुळे या दोन्ही देशांत अनेकवेळा युद्ध झालं. 1999 सालच्या कारगील युद्धात तर मोठा नरसंहार झाला. कारगीलच्या युद्धात पाकिस्तानला भारतापुढे शरण यावं लागलं. पाकिस्तानने याआधी कधीही कारगीलच्या युद्धात (Kargil War) आपला थेट सहभाग मान्य केलेला नाही. मात्र आता पहिल्यांदाच पाकिस्तानच्या लष्कराने आमचा कारगीलच्या युद्धात थेट सहभाग होता, असे कबुल केले आहे. पाकिस्तानच्या या कबुलीचे जागतिक पटलावर परिणाम पडण्याची शक्यता आहे. 

पाकिस्ताने थेट मान्य केलं

कारगीलच्या युद्धात कुटनीती वापरून पाकिस्तानने भारताचा भूभाग बळगावण्याचा प्रयत्न केला होता. पण भारतीय सैन्याने पाकिस्तानी फौजांना सडेतोड उत्तर दिलं होत. भारताने पाकिस्तानला या युद्धात पराभूत केलं होतं. या युद्धात पाकिस्तानचे हजारो सैनिक मारले गेले होते. याच युद्धात पाकिस्तान लष्कराचा सहभाग होता, असं पाकिस्तान लष्कराचे प्रमुख जनरल असीम मुनीर म्हणले आहेत. पाकिस्तानच्या अनेक सैनिकांनी 1965, 1971, 1999 सालच्या युद्धात बलिदान दिले, असे असीम मुनीर म्हणाले. मुनीर यांचं हे वक्तव्य म्हणजे पाकिस्तानचा कारगील युद्धात थेट सहभाग असल्याची कबुलीच आहे, असे म्हटले जात आहे.

असीम मुनीर काय म्हणाले?  

पाकिस्तानच्या संरक्षण दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात जनरल असीम मुनीर बोलत होते. आपल्या भाषणात ते पाकिस्तानी सैन्याचे गुणगाण करत होते. यावेळी बोलताना "1948, 1965, 1972 सालचे युद्ध असो की 1999 सालचे कारगील युद्ध असो. पाकिस्तान तसेच इस्लामसाठी हजारो सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेले आहे," असे असीम मुनीर म्हणाले. 

कारगील युद्धात काय झाले होते?

याआधी पाकिस्तानी लष्कराने कधीही कारगील युद्धातील थेट सहभाग सार्वजनिक मंचावर मान्य केलेला नाही. कारगील युद्धात मुजाहीद्दीन किंवा काश्मीरमधील फुटीरवादी यांचा सहभाग होता, असे पाकिस्तानी लष्कर अधिकृतपणे सांगते. कारगीलच्या युद्धात पाकिस्तान लष्कराने एलओसीवर दाखरल होत टायगर हील तसेच एलओसीजवळचा भारताच्या काही भूभागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पाकिस्तानची ही कुरापत भारताला माहीत होताच भारतीय लष्करानेदेखील पाकिस्तानच्या फौजांना चोख प्रत्युत्तर दिले होते. लडाखमध्ये साधारण तीन महिने हे युद्ध चालले होते. भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसघोरांना परत पाठवले होते. या युद्धादरम्यान, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बील क्लिंटन यांनीदेखील पाकिस्तानला लष्कर मागे घेण्याचे आवाहन केले होते. 

545 भारतीय जवानांचे बलिदान

या युद्धात भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते. भारतीय लष्कराच्या याच कामगिरीचे कौतुक आणि या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना म्हणून संपूर्ण देशभरात 26 जुलै हा कारगील विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या युद्धात 545 भारतीय जवानांनी बलिदान दिले होते. पाकिस्तानने मात्र या युद्धात त्यांचे जवान मारले गेले नसल्याचा दावा केलेला आहे. 

हेही वाचा :

PM Modi Invitation: लवकरच पंतप्रधान मोदी पाकिस्तान दौऱ्यावर? शाहबाज शरीफ यांचं 8 वर्षांनी निमंत्रण, पण का?

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget