एक्स्प्लोर

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला

Raj Thackeray: हाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री नाही, तर भाजपचा मुख्यमंत्री आहे. सत्तांध झालेल्या या लोकांना लोक किंवा नागरिक मेले तरी चालतील, पण फक्त सत्ता पाहिजे, असे राज म्हणाले.

Raj Thackeray on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या युतीला करप्शन आणि कन्फुजनची युती म्हटल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार पलटवार केला आहे. खासदार संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीमध्ये राज यांनी सिंचन घोटाळ्यावरून फडणवीसांवर हल्ला चढवला. 50 खोके म्हणजे 40 आमदारांसाठी 2 हजार कोटी रुपये झाले आणि हा पैसा भ्रष्टाचार किंवा घोटाळ्यांमधून आला असल्याचे ते म्हणाले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तीन वर्षांत का झाल्या नाहीत, याचे प्लॅनिंग काय होते आणि कशासाठी त्या पुढे ढकलल्या गेल्या, हे मी नंतर सांगणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. 

अरे मग द्या ना ते पुरावे

राज ठाकरे म्हणाले की, "या सगळ्यांचा डोलारा नरेंद्र मोदींवर अवलंबून आहे. ही बसवलेली माणस आहेत. यामधील बसलेला माणूस कोणीच नाही. बसवलेला जो माणूस असतो तो फक्त धन्याचं ऐकतो. त्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं त्या सगळ्या गोष्टी करतात, त्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं वाटत नाही. ते पुढे म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नयेत. ते सिंचन घोटाळ्यात बैलगाडीभर पुरावे आहते म्हणत होते. आता म्हणतात की कोर्टात केस चालू आहे अरे मग द्या ना ते पुरावे? आपलं ते झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून या लेव्हलला आता ते आले आहेत. या देशामध्ये कोणी राजकारणामध्ये सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. सत्ता बदलत असतात, काळ ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो, हे एके दिवशी हे बदलेल.

सध्याचे राज्यकर्ते हे 'ससाणे' आहेत

राज म्हणाले की, सध्याचे राज्यकर्ते हे 'ससाणे' आहेत, जे मालकाच्या हातावर बसून आपलीच माणसे फोडण्याचे काम करतात, म्हणजेच स्वकीयांचा घात करत आहेत. या नेत्यांनी मराठी माणूस एकत्र येऊ नये, यासाठी जाती-जातींमध्ये भेद निर्माण करणे आणि वाद-भांडणे लावण्याचे राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री नाही, तर भाजपचा मुख्यमंत्री आहे. सत्तांध झालेल्या या लोकांना लोक किंवा नागरिक मेले तरी चालतील, पण त्यांना फक्त सत्ता पाहिजे. 

राजकारणाचे गुन्हेगारीकरण नाही, तर विद्रुपीकरण 

राज यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, नाशिक या शहरांमध्ये अमली पदार्थ सहज उपलब्ध आहेत. गेल्या दहा वर्षांत ड्रग्सच्या विरोधातल्या धाडी बंद झाल्या आहेत आणि आता हा प्रकार शाळांपर्यंत पोहोचला आहे. राजकारणामध्ये वाढलेला पैसा आणि रस्त्यावर आलेले ड्रग्स यांचा संबंध तपासून पाहिला पाहिजे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण नाही, तर विद्रुपीकरण झालेले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काहीही केलं नाही, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये, महिला आघाडीचं एकनाथ शिंदेंना पत्र 
पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काहीही केलं नाही, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये, महिला आघाडीचं एकनाथ शिंदेंना पत्र 
Bacchu Kadu And Eknath Shinde: प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदे-बच्चू कडूंच्या भेटीत काय काय घडलं?
प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदे-बच्चू कडूंच्या भेटीत काय काय घडलं?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: नीलम गोऱ्हे , बच्चू कडू नको...; विधान परिषदेसाठी 'त्यांना' संधी द्या, शिंदेंच्या मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं!
नीलम गोऱ्हे , बच्चू कडू नको...; विधान परिषदेसाठी 'त्यांना' संधी द्या, शिंदेंच्या मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं!
West Bengal Elections : बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमधून हाकलून देऊ, ममता बॅनर्जी त्यांना वाचवू शकणार नाहीत; पंतप्रधान मोदींचे आश्वासन
बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमधून हाकलून देऊ, ममता बॅनर्जी त्यांना वाचवू शकणार नाहीत; पंतप्रधान मोदींचे आश्वासन

व्हिडीओ

Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Iran US Talks : अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
Virat Kohli : विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी घालणारा एकमेव खेळाडू ठरला
विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Home Loan : गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
Embed widget