एक्स्प्लोर

चीनच्या उलट्या बोंबा! प्रवक्ते म्हणतात, भारतानं आपलं सैन्य ताब्यात ठेवावं

भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. यानंतर चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी मात्र भारतावरच आरोप केले आहेत. 6 जूनच्या चर्चेनुसार चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेत आणखी मागे जाण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र शांततेत चर्चा करण्याऐवजी चीनने वाद घालण्यास सुरुवात केली.

नवी दिल्ली:  भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. दरम्यान चीनच्या सरकारी मीडियाने चीनी सेनेच्या हवाल्याने दावा केला आहे की, गलवान घाटीवर नेहमी त्यांचा अधिकार राहिला आहे. तसंच आरोप केला आहे की, भारतीय सैनिकांनी जाणूनबुझून उकसवणारे हल्ले केले, त्यामुळं गंभीर संघर्ष झाला आणि जवान शहीद झाले. चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिनजियान यांनी म्हटलं आहे की, भारताने आपलं सैन्य ताब्यात ठेवावं. आपल्या सैनिकांवर नियंत्रण ठेवावं. सीमारेषा पार करु नये. कुठलीही समस्या निर्माण करु नये आणि एकतर्फी पाऊल उचलू नये, ज्यामुळं मुद्दा आणखी चिघळेल. भारतीय लष्कराने काल ही माहिती दिली आहे. 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाली होती. एएनआयच्या माहितीनुसार चीनचेही 43 जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत. गेल्या 45 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं आहे की, चीन आणि भारतादरम्यान संघर्षात जवान शहीद झाले आहेत. India-China Face Off | चीनसोबत झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद चीनने काय आरोप केला? चीनने आरोप केला आहे की, भारतीय सैनिकांनी 15 जून रोजी दोन वेळा अवैध कारणांनी चीनच्या सीमेत प्रवेश केला तसंच चीनच्या सैनिकांना डिवचत त्यांच्यावर हल्ले केले. त्यामुळं दोन्ही सैन्यांमध्ये मारपीट झाली. सोबतच चीनने भारतीय लष्कराच्या 'गलवान व्हॅलीत तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असताना सैनिकांमध्ये झडप झाली' या दाव्याचा देखील विरोध केला आहे. India China Border Live Updates | पंतप्रधानांनी मौन का धारण केलंय, ते काय लपवत आहेत? : राहुल गांधी चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिनजियान यांना सीमेवर भारतीय सैनिक शहीद झाल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, याबाबत मला माहिती नाही. ते म्हणाले की, आमच्या सैनिकांची एक उच्चस्तरीय बैठक झाली होती आणि सीमेवर स्थिती सामान्य करण्यासाठी सहमती देखील दर्शवली होती. मात्र 15 जून रोजी भारतीय सैनिकांनी सीमेचं उल्लंघन केलं. दोन वेळा त्यांनी आमच्या सीमेत प्रवेश केला. India-China Face Off | जवानांच्या बलिदानाचं दु:ख शब्दात व्यक्त करु शकत नाही : राहुल गांधी प्रवक्ता झाओ लिनजियान म्हणाले की, भारताने आपलं सैन्य ताब्यात ठेवावं. आपल्या सैनिकांवर नियंत्रण ठेवावं. सीमारेषा पार करु नये. कुठलीही समस्या निर्माण करु नये आणि एकतर्फी पाऊल उचलू नये, ज्यामुळं मुद्दा आणखी चिघळेल. झाओ यांनी म्हटलं की, दोन्ही देशांचं संवाद आणि चर्चेद्वारे या मुद्द्यावर तोडगा काढण्यावर एकमत झालं आहे. भारत आणि चीनमध्ये 6 जून रोजी मेजर जनरल रँक लेव्हलची चर्चा झाली होती. यामध्ये सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती झाली होती. 6 जूनच्या चर्चेनुसार चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेत आणखी मागे जाण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र शांततेत चर्चा करण्याऐवजी चीनने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर भारतीय सैनिक आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla Bus Accident: स्टेअरिंग गरागरा फिरवायची सवय असणाऱ्या संजय मोरेंच्या हातात इलेक्ट्रिक बसचं पॉवर स्टेअरिंग आलं अन् घात झाला?
मिनी बस चालवणाऱ्या संजय मोरेला मोठी बस चालवायला दिली अन् घात झाला, पॉवर स्टेअरिंगमुळे अंदाज चुकला?
निवडणूक संपताच मोठी बातमी, नाशिकमध्ये सापडले पंतप्रधान पिक विमा योजनेचे बोगस लाभार्थी? नेमका प्रकार काय?
निवडणूक संपताच मोठी बातमी, नाशिकमध्ये सापडले पंतप्रधान पिक विमा योजनेचे बोगस लाभार्थी? नेमका प्रकार काय?
मारकडवाडीत  भाजप विरुद्ध महाविकास आघाडी भिडणार, बड्या नेत्यांच्या सभांमुळे तणाव वाढण्याची शक्यता, कडेकोट बंदोबस्त
मारकडवाडीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी भिडणार, बड्या नेत्यांच्या सभांमुळे तणाव वाढण्याची शक्यता, कडेकोट बंदोबस्त
Satish Wagh Case: अंगावर जखमा, दांडक्याचे वळ अन्... आमदार टिळेकरांच्या मामाची हत्या कशी झाली?, पंचनाम्यानंतर पोलिसांनी काय सांगितलं?
अंगावर जखमा, दांडक्याचे वळ अन्... आमदार टिळेकरांच्या मामाची हत्या कशी झाली?, पंचनाम्यानंतर पोलिसांनी काय सांगितलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajan Naik Local Train : लोकलचा प्रवास, भजनाचा आनंद , राजन नाईक यांचा लोकने प्रवासKurla Buss Accident Driver Beatnup : कुर्ला बस अपघातातील चालकाला जमावाची मारहाणABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 10 December 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Kurla BEST Accident : कुर्ला अपघात प्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla Bus Accident: स्टेअरिंग गरागरा फिरवायची सवय असणाऱ्या संजय मोरेंच्या हातात इलेक्ट्रिक बसचं पॉवर स्टेअरिंग आलं अन् घात झाला?
मिनी बस चालवणाऱ्या संजय मोरेला मोठी बस चालवायला दिली अन् घात झाला, पॉवर स्टेअरिंगमुळे अंदाज चुकला?
निवडणूक संपताच मोठी बातमी, नाशिकमध्ये सापडले पंतप्रधान पिक विमा योजनेचे बोगस लाभार्थी? नेमका प्रकार काय?
निवडणूक संपताच मोठी बातमी, नाशिकमध्ये सापडले पंतप्रधान पिक विमा योजनेचे बोगस लाभार्थी? नेमका प्रकार काय?
मारकडवाडीत  भाजप विरुद्ध महाविकास आघाडी भिडणार, बड्या नेत्यांच्या सभांमुळे तणाव वाढण्याची शक्यता, कडेकोट बंदोबस्त
मारकडवाडीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी भिडणार, बड्या नेत्यांच्या सभांमुळे तणाव वाढण्याची शक्यता, कडेकोट बंदोबस्त
Satish Wagh Case: अंगावर जखमा, दांडक्याचे वळ अन्... आमदार टिळेकरांच्या मामाची हत्या कशी झाली?, पंचनाम्यानंतर पोलिसांनी काय सांगितलं?
अंगावर जखमा, दांडक्याचे वळ अन्... आमदार टिळेकरांच्या मामाची हत्या कशी झाली?, पंचनाम्यानंतर पोलिसांनी काय सांगितलं?
Crime News: साधा बाईकचा धक्का लागला अन् नुकतंच मिसरुड फुटलेल्या पोरांनी धारदार चाकू नाचवत धिंगाणा घातला, छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचा वचक संपला?
साधा बाईकचा धक्का लागला अन् नुकतंच मिसरुड फुटलेल्या पोरांनी धारदार चाकू नाचवत धिंगाणा घातला, छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचा वचक संपला?
राज्यातील बनावट औषध पुरवठा प्रकरणात सर्वात धक्कादायक खुलासा; कंपनींच्या बोगस पत्त्यावरून औषधांची डिलिव्हरी
राज्यातील बनावट औषध पुरवठा प्रकरणात सर्वात धक्कादायक खुलासा; कंपनींच्या बोगस पत्त्यावरून औषधांची डिलिव्हरी
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
उत्तरेकडील वाऱ्यांनी मुंबई पुरती गारठली, महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान, पुढचे 5 दिवस हाडं गोठवणारी थंडी
उत्तरेकडील वाऱ्यांनी मुंबई पुरती गारठली, महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान, पुढचे 5 दिवस हाडं गोठवणारी थंडी
Embed widget