एक्स्प्लोर

चीननंतर आता दक्षिण कोरियात कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवसात चार लाख रुग्णांची नोंद

Coronavirus : दक्षिण कोरियात एकाच दिवसात कोरोनाच्या चार लाख नव्या रुग्णांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली आहे. 

सेऊल: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचत आता दक्षिण कोरियामध्येही कोरोनाचा उद्रेक झाल्याचं दिसून येतय. दक्षिण कोरियामध्ये एकाच दिवसात तब्बल चार लाख कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. कोरियामध्ये वाढलेल्या या रुग्णसंख्येला ओमायक्रॉन व्हेरिएंट जबाबदार असल्याचं सांगितलं जातं.

दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्या देशात बुधवारी 4,00,071 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यानंतर एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. स्थानिक पातळीवर कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं सांगण्यात येतंय.

त्या आधी मंगळवारी दक्षिण कोरियामध्ये 293 मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. चीननंतर आता दक्षिण कोरियातही कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर जगभरात कोरोनाची चौथी लाट येणार अशीही भीती व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, चीनच्या जिलीन प्रांताची राजधानी चांगचुनमध्ये शुक्रवारपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या शहरातील 90 लाख नागरिकांना ईमर्जन्सी अलर्टनंतर घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. शेडॉंगमधील युचेंगमध्ये देखील लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. युचेंगमध्ये 5 लाख नागरिक राहतात. सध्या चीनच्या तीन शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे  2,65,00,000 नागरिकांना घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. चीनमधील कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा चिनी अर्थव्यवस्थेला धक्का बसू शकतो. 

ओमायक्रॉन आणि डेल्टाच्या मिश्रणाने उदयास आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळे पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (WHO) सांगितलं आहे की, 2021 च्या तुलनेत यावर्षी देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची आतापर्यंत नोंदवलेली प्रकरणे सर्वाधिक आहेत. तसेच ओमायक्रॉन आणि डेल्टाच्या मिश्रणामुळे आणखी एक नवीन व्हेरियंट निर्माण होऊ शकतो.

संबंधित बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget