एक्स्प्लोर

शाळेसाठी जीवघेणा प्रवास, यशोदा नदीच्या पुरात तीन विद्यार्थी अडकले; जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

देवळी नगरपालिका फायर ब्रिगेडची चमू घटनास्थळी पोहचली असून मुलांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

वर्धा : जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील डिगडोह येथे यशोदा नदीला (River) पूर आल्याने तीन शाळकरी विद्यार्थी (School) पाण्यात अडकले आहेत. वाहत्या पुराच्या पाण्यामुळे तिघेही पाण्याने वेढलेल्या उंच ठिकाणी थांबून राहिले. याबाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच नगरपालिका (Wardha)आपत्ती व्यवस्थापक पथकाला पाचारणही करण्यात आले. त्यानंतर, पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या तीन विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. सुदैवाने विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. तिघेही शाळेतून परत येत असताना अचानक पाणी वाढले, तर यशोदा नदीच्या जवळ पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पाणी पातळी वाढली होती.  

देवळी नगरपालिका फायर ब्रिगेडची चमू घटनास्थळी पोहचली असून मुलांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा शोध व बचाव पथक देखील जाग्यावर पोहचले आहे. नागझरी येथील इयत्ता 10 वीच्या वर्गात शिकणारा भाविष कापसे आणि डोगडोह येथील त्याचे दोन सहकारी शाळा सुटल्यावर घरी येत असताना पुराच्या पाण्यात अडकले. यशोदा नदीवर डिगडोह येथे पुलाचे काम सुरू असल्याने पाणी साचून राहिल्याची माहिती आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना पुलावरुन येताना मोठी कसरत करावी लागत असून त्यातूनच हे तीन विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकले होते. दरम्यान, या विद्यार्थ्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.  

बुलढाण्यात सकाळपासून जोरदार पाऊस

बुलढाण्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असून मेहकर तालुक्यातील अनेक नदी-नाल्याना पूर आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधांर सुरू आहे. तर, मेहकर तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. मेहकर तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क वाशिम जिल्ह्याशी तुटला आहे. कास नदीला आलेल्या पुरामुळे मादणी ,आरेगाव या गावांचा संपर्हीक तुटला आहे.

वाशिम जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत

वाशिम जिल्ह्यात गेल्या 20 तासापासून बरसत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाला आहे. नागपूर संभाजीनगर महामार्गावर  असलेल्या पिंप्री सरहद गावाजवळील  उतावळी नदीवर पुराचं पाणी आल्याने  जवळपास अनेक तासांपासून रस्ते वाहतूक खोळंबली आहे. 

नांदेडमध्ये सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय

नांदेडमध्ये काल मध्यरात्रीपासून दमदार पाऊस झाल्यानंतर सहस्त्रकुंडच्या धबधब्याचे रौद्ररुप पाहायला मिळत आहे. मागील 15 दिवसांपासून पाऊस नव्हता, काल रात्री झालेल्या पावसानं पैनगंगा नदीची पातळी वाढली आहे. त्यानंतर, हा सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. 

हेही वाचा

ठाकरे बंधुचं स्टेटमेंट चुकीचं नाही; 6 जुलैच्या मोर्चात सहभागी होण्याबाबत शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget