एक्स्प्लोर

Largest District : भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? एकेकाळी राज्य होता 'हा' जिल्हा!

Largest District: भारतात किती राज्य आहेत? हे कदाचित तुम्हाला माहित असेल. पण भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता हे तुम्हाला माहित आहे का? कधीकाळी हा जिल्हा म्हणजे एक वेगळं राज्यच होतं.

Largest District: भारतात 28 राज्ये (States) आणि 8 केंद्रशासित प्रदेश (Union Territories) आहेत. या राज्यातील प्रशासन सुकर चालावं यासाठी त्याला छोट्या भागांत विभागण्यात आलं आहे, ज्याला आपण जिल्हा म्हणतो. जेव्हा एखाद्या जिल्ह्यवर लक्ष ठेवणं जोखीमीचं जातं किंवा प्रादेशिक विविधतेमुळे जिल्हा विभागण्याची गरज वाटते, त्यावेळी एका जिल्ह्याचे दोन तुकडे देखील पडतात. तसाच काहीसा प्रकार आपल्या देशात होत असतो आणि गरज पडल्यास नवीन जिल्हे बनत असतात.

असाच काहीसा प्रकार देशातील एका राज्यात घडला. मूळचं राज्य असलेल्या क्षेत्राचं रुपांतर जिल्ह्यात झालं आणि त्यामुळेच त्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वाधिक आहे. पण देशातील हा जिल्हा नेमका कोणता? असा प्रश्न कधी तुम्हाला कधी पडला आहे का? याच रंजक गोष्टीबद्दल जाणून घेऊया.

'या' जिल्ह्याच्या अर्ध्या भागात वाळवंटी प्रदेश

भारतातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचं नाव कच्छ आहे, हे गुजरातमध्ये (Gujarat) वसलेलं आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा सर्वात मोठा जिल्हा असल्याचं सांगितलं जातं. गुजरातच्या या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ 45,674 चौरस किलोमीटर आहे, जे एकट्या महाराष्ट्र राज्याचा 23.7 टक्के भाग व्यापते. या जिल्ह्याचा निम्म्याहून अधिक भाग हा वाळवंटी प्रदेश आहे, जो गुजरातमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. पर्यटक उंट सफारीचा आनंद घेण्यासाठी कच्छला हजेरी लावतात.

एकेकाळी जिल्ह्याच्या नावाने होतं राज्य

एकेकाळी भारतात कच्छ नावाचं राज्य होतं. ही गोष्ट आहे 1950 सालची, जेव्हा हा जिल्हा राज्य म्हणून नावारुपास होता. 1 नोव्हेंबर 1956 रोजी हा परिसर मुंबई राज्याला जोडण्यात आला. त्यावेळी मराठी आणि गुजराती लोक तिथे राहत होते आणि त्यात काही मारवाडी लोकांचीही संख्या होती. त्यानंतर 1960 मध्ये भाषेच्या आधारावर मुंबई राज्याचं विभाजन झालं, मुंबईचं विभाजन करुन महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन नवीन राज्यं निर्माण करण्यात आली. कच्छ जिल्हा नंतर गुजरातमध्ये आला आणि मुंबई हा जिल्हा महाराष्ट्रात आला.

कच्छचे रण पर्यटकांचं आकर्षण

गुजरातमधील कच्छचे रण गांधीधामपासून 108 किलोमीटर अंतरावर आहे. हा प्रदेश सुमारे 26 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर व्यापला आहे. रण म्हणजे मिठाचे दलदल. हा वाळवंटासारखा दिसणारा प्रदेश पांढऱ्या मिठाने आच्छादलेला आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणचे सौंदर्य बघण्यासारखे असते. कच्छचे रण दिवसा इतके पांढरे दिसते की जणू जमीन आणि आकाश एक झाल्याचा भास होतो. तर रात्रीच्या अंधारात पूर्ण चंद्राच्या प्रकाशात किंवा पौर्णिमेच्या रात्री मिठाची जमीन चकाकणारी दिसते.

हेही वाचा:

Brass City: भारतातील 'या' शहराला म्हणतात पितळ नगरी; अमेरिकेपासून युरोपपर्यंत येथील वस्तूंना मागणी

महत्त्वाच्या बातम्या

FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget