एक्स्प्लोर

Facts: वातावरणातील बदलाचा बिअरच्या चवीवरही परिणाम; आता नेमकी कशी लागते बिअरची चव? जाणून घ्या

Taste of Beer: आगामी काळात हवामान बदल ही सर्वात मोठी समस्या असणार आहे, यामुळे बिअरच्या चवीवरही परिणाम होऊ शकतो. याबाबतचं एक संशोधन समोर आलं आहे.

Taste of Beer: हवामान बदल (Climate Change) धोकादायक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. हवामान बदलाचा आरोग्यासह (Health) इतर गोष्टींवर, खाद्यपदार्थांवरही परिणाम होतो. बरेच जण हवामानात होणारे बदल नाकारत आहेत, पण हेच सत्य आहे.

तुम्ही बिअर (Beer) पित असो किंवा नसो,  तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हवामान बदलामुळे भविष्यात बिअरची चव देखील बदलणार आहे. अलीकडील संशोधनात असं आढळून आलं की, हवामानातील बदलामुळे बिअरवर परिणाम होईल, त्यामुळे ती अधिक महाग होईल आणि तिची चव बदलण्याची देखील शक्यता आहे.

या संशोधनातून झाला खुलासा

हवामानातील बदलामुळे बिअरच्या चवीवर कसा बरं परिणाम होतो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पाणी आणि चहा नंतर बिअर हे तिसरं सर्वात लोकप्रिय पेय आहे. तर, जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या या अल्कोहोलिक पेयाला त्याची विशिष्ट चव आणि वास हॉप्स नावाच्या फुलापासून मिळतो.पण भविष्यात या फुलांचं उत्पादन कमी होईल आणि त्यामुळे बिअरच्या गुणवत्तेवर देखील हवामान बदलाचा परिणाम होईल, असे द गार्डियनच्या अहवालात म्हटलं गेलं आहे.

भविष्यात बिअरची चव बदलणार

जर्नल नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असं भाकीत केलं गेलं आहे की, जोपर्यंत शेतकरी उष्ण आणि कोरड्या हवामानाशी जुळवून घेत नाहीत, तोपर्यंत उत्पादन घटण्याची समस्या जाणवता राहील. युरोपच्या वाढत्या तापमानातील प्रदेशांमध्ये 2050 पर्यंत हॉपचं उत्पादन सुमारे 4 ते 18 टक्क्यांनी घसरेल. बिअरची चव बदलण्यास हॉप्समधील अल्फा ऍसिड कारणीभूत असल्याचाही अंदाज लावला गेला आहे. त्यामुळे भविष्यात सध्याच्या चवीच्या तुलनेत 20 ते 31 टक्क्यांनी बिअरची चव घसरेल.

अशा प्रकारेही दिसू शकतो परिणाम

"बिअर पिणार्‍यांना हवामानातील बदल, त्यामुळे बिअरच्या गुणवत्तेत झालेला बदल आणि किंमतीतील फरकाचा अंदाज नक्कीच लक्षात येईल, असं आमचा डेटा सूचित करतो," असं झेक अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या ग्लोबल चेंज रिसर्च इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ, अभ्यास सह-लेखक मिरोस्लाव त्रन्का म्हणतात. युरोपियन पबमध्ये तर, हवामान आणि राजकारणाव्यतिरिक्त बहुतेक वादविवाद हे बिअरवरुन होत असल्याचंही ते म्हणाले.

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) नुसार, हवामान बदल जरी सर्वांसाठी हानीकारक असला तरी लोकांवर याचा विषम परिणाम होतो. अहवालात असं आढळून आलं आहे की, केवळ एक तृतीयांश राष्ट्रातील स्त्रिया आणि मुलींवर हवामान संकटाचा विषम परिणाम दिसून येतो. हवामानातील बदल आणि आरोग्याशी संबंधित गोष्टींवरही या संशोधनात अभ्यास केला गेला.

हेही वाचा:

Facts: कोण आहे जगातील सर्वात स्मार्ट सीईओ? जाणून घ्या कसं केलं जातं कॅल्क्युलेशन

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
Embed widget