![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shrikant Shinde On Aditya Thackeray : त्यांनी त्यांच्या पप्पांना हा प्रश्न विचारला पाहिजे; श्रीकांत शिंदे यांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका
Shirikant Shinde On Aditya Thackeray : खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
![Shrikant Shinde On Aditya Thackeray : त्यांनी त्यांच्या पप्पांना हा प्रश्न विचारला पाहिजे; श्रीकांत शिंदे यांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका Shiv Sena Shinde Faction MP Shrikant Shinde hit back on Shiv Sena UBT leader Aditya Thackeray at Kalyan Thane Maharashtra Shrikant Shinde On Aditya Thackeray : त्यांनी त्यांच्या पप्पांना हा प्रश्न विचारला पाहिजे; श्रीकांत शिंदे यांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/16/7213c8cebb720f285e9430e6e10d9f9f1694872334611290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कल्याण, ठाणे : जे मुख्यमंत्री सत्तेत असताना अडीच वर्षात अडीच दिवस मंत्रालयात गेलेत, अडीच वर्षात सरकारचा कारभार कसा हाकला, हा प्रश्न त्यांनी त्यांच्या पप्पांना विचारला पाहिजे, अशा बोचऱ्या शब्दात खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. दुष्काळी दौऱ्यावर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांच्यावर टीका केली होती.
कल्याणमध्ये गणेशोत्सवानिमित्ताने कोकणवासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मोफत बसेस सोडण्यात आल्या. त्यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, संभाजीनगर मध्ये कॅबिनेट झाली या कॅबिनेटमध्ये 60000 कोटींचे पॅकेज मराठवाड्याला दिलेलं आहे. अनेक प्रलंबित विषयांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेतले आहेत. मागील सव्वा वर्षात शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्यासाठी सगळे नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम केलं.. साडेबारा हजार कोटींपेक्षा जास्त निधी शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये टाकण्याचं काम केलं असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले. सरकारकडून फक्त पोस्टरबाजी सुरू असल्याची जे टीका करतात त्यांनी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये स्वतः जाऊन लोकांशी भेटा असेही शिंदे यांनी म्हटले. आतापर्यंत लोकांना भेटला नाहीत आता तरी भेटा, तेव्हाच दोन सरकारमधील फरक तुम्हाला कळेल असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी कल्याण डोंबिवलीत रस्त्यांची कामे पूर्ण होतील असे खासदार शिंदे यांनी म्हटले. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मुख्यमंत्र्यांनीआयुक्तांना सूचना दिल्यात. खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत गणेशोत्सवापूर्वी हे काम पूर्ण केले जातील असेही त्यांनी सांगितले
मुंबई-गोवा महामार्गासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न सुरू
मुंबई गोवा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्याचे कॉन्ट्रॅक्टर बदलण्याचे काम केंद्र सरकारने केलं आणि त्या ठिकाणी एका मार्गिकाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणपती आधी एक मार्गिका सुरू करण्यात येईल असे सांगितले. आपलं सरकार आल्यानंतर केंद्र सरकार व राज्य सरकार दोघांच्या माध्यमातून लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)