एक्स्प्लोर

मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू , पाच जण गंभीर जखमी

Mumbai Nasik Highway Accident : मृत झालेल्यांमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. पाच जण जखमी झाले आहेत.

Mumbai Nasik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात झालाय. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. पडघा नजीकच्या खडवली फाटा या धोकादायक वळणावर मंगळवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. 

पडघा व परिसरातील असंख्य विद्यार्थी, चाकरमानी, रेल्वेने कल्याण ठाणे मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी खडवली रेल्वे स्टेशन येथे जात असतात. सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास MH 04 E 1771 ही काळी पिवळी जीप प्रवासी घेऊन जात होती.  जीप खडवलीकडे जात असताना त्याच सुमारास कंटेनर क्रमांक MH 48 T 7532 हा मुंबईच्या दिशेने भरधाव येत होता. कंटेनरने जीपला जोरदार ठोकर दिली. त्यानंतर कंटेनरने जीपला अक्षरशः फरफटत शेतात लोटून दिले. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये विद्यार्थी असलेल्या चिन्मयी विकास शिंदे वय 15, रिया किशोर परदेशी, चैताली सुशांत पिंपळे वय  27, संतोष अनंत जाधव वय 50, वसंत धर्मा जाधव वय 50 आणि प्रज्वल शंकर फिरके वय 18 यांचा मृत्यू झाला आहे.  या अपघातात दिलीप कुमार विश्वकर्मा वय 29,  चेतना गणेश जसे वय 19, कुणाल ज्ञानेश्वर भामरे वय  22, जान्हवी संजय वाळंज आणि वाहन चालक जावेद अब्दुल शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भिवंडीत  खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे. शिवशंकर जंगीलाला प्रजापती यास पडघा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर स्थानिक भगवान सांबरे यांनी या अपघातास कंटेनर चालकासह या महामार्गावर टोल वसूल करणारे ठेकेदार व सीगल इंडिया ही महामार्ग बनविण्याचे काम करणारी कंपनी जबाबदार असल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.  

खडवली फाटा अपघात स्थळाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संताप

मुंबई नाशिक महामार्गावर खाजगीकरणातून रस्ते चौपदरीकरण केले. पण धोकादायक ठिकाणी उड्डाणपूल बनवावेत अशी मागणी मागील कित्येक वर्षे केली जात आहे. त्यासाठी अनेक वेळा आंदोलनं झाली. पडघा ते घोटी दरम्यान अनेक उड्डाणपूल भुयारी मार्ग मंजूर केले. केंद्रीय राज्यमंत्री यांनी चार वर्षांपूर्वी चार उड्डाणपुलांच्या कामाचे भूमिपूजन केले. टोलनाका ठेकदर यांच्या आडमुठे पणामुळे उड्डाणपूलाचे काम रखडून राहिले आहे, अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख ग्रामीण विश्वास थळे व काँग्रेस पदाधिकारी राकेश पाटील यांनी केली आहे. जर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वेळीच या ठिकाणचा उड्डाणपूल बनवला असता तर आजपर्यंत अनेकांचे जीव वाचवता आले असते. अशी टीका होत असून 9 जुलै रोजी सुध्दा याच ठिकाणी एका भरधाव टँकरने धडक दिल्याने रस्त्या कडेला उभ्या असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पण प्रशासनाला जाग का येत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोशल मीडियावर गॅस तुटवड्याच्या अफवा, पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये, मिरा भाईंदरमध्ये थेट गॅस एजन्सीमध्येच दाखल 
सोशल मीडियावर गॅस तुटवड्याच्या अफवा, पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये, मिरा भाईंदरमध्ये थेट गॅस एजन्सीमध्येच दाखल 
Bhiwandi Fire  : भिवंडीत गॅस लायटर कंपनीला भीषण आग, संपूर्ण कंपनी जळून खाक
Bhiwandi Fire  : भिवंडीत गॅस लायटर कंपनीला भीषण आग, संपूर्ण कंपनी जळून खाक
KDMC : ऐकावं ते नवलंच! काही नागरिकांनी मालमत्ता कर नं भरलामुळे संपूर्ण सोसायटीचाच पाणीपुरवठा बंद; कल्याण डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांची अजब कारवाई
ऐकावं ते नवलंच! काही नागरिकांनी मालमत्ता कर नं भरलामुळे संपूर्ण सोसायटीचाच पाणीपुरवठा बंद; कल्याण डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांची अजब कारवाई
साताऱ्यानंतर ठाणे महापालिका, भाजप आमदाराने हिशोब काढला; विधानसभेत भाजप-शिवसेनेत पुन्हा 'सामना'
साताऱ्यानंतर ठाणे महापालिका, भाजप आमदाराने हिशोब काढला; विधानसभेत भाजप-शिवसेनेत पुन्हा 'सामना'

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat ED probe: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? राजकारण्यांचा काळा पैसा व्याजाने दिल्याचा संशय
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? राजकारण्यांचा काळा पैसा व्याजाने दिल्याचा संशय
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Gold Price Crash : सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
Iran War Update : होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
UPI Rule : यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
Embed widget