एक्स्प्लोर

युवकांनी स्टार्टअपवर लक्ष केंद्रीत करावं, उद्योजक बनावं: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Solapur University Yuva Mahotsav : सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवास थाटात प्रारंभ झाला असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तरुणांना उद्योजक बनण्याचं स्वप्न पाहावं असं आवाहन केलं. 

सोलापूर: आपल्या देशात स्पर्धा परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस अधिकारी बनण्याचे युवकांमध्ये क्रेझ आहे. आता त्यासोबतच युवकांनी स्टार्टअपकडे लक्ष केंद्रित करून आपल्या कल्पनाशक्तीला चालना देऊन छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय उभे करून उद्योजक बनण्याचे स्वप्न अंगीकारावे, असे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. 

मंगळवारी, वडाळा येथील लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विसाव्या युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या समारंभाचे अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. सचिन गायकवाड, डॉ. बी. पी. रोंगे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे आदींची प्रमुख उपस्थिती होती. लोकमंगल संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी यंदा या महोत्सवात 62 महाविद्यालयांमधून 1800 विद्यार्थी सहभागी झाल्याचे सांगितले. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 39 कलाप्रकारांचेही सादरीकरण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, विद्यार्थी कलाकारांनी युवा महोत्सवातील प्रत्येक कलाप्रकारात सहभाग घेऊन आनंद लुटावा. चांगली कला सादर करून टॅलेंट सिद्ध करावे. त्यासोबतच युवकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक दिवस आत्मपरीक्षण करावे. आपल्या क्षमतेचेही निरीक्षण करावे. संवाद कौशल्य देखील खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक क्षेत्रात चांगले संवाद असणे फार महत्त्वाचे असते. उद्योजक बनण्याचे स्वप्न विद्यार्थ्यांनी पाहावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. 

कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर म्हणाले, स्पर्धा म्हटले की,  विजय-पराजय येतो. मात्र सहभाग हाच खरा विजय असतो. 39 कला प्रकारांचा सहभाग असलेला हा युवा महोत्सव युवा विद्यार्थी कलाकारांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे. कलाकारांना चांगले व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येते. सोबतच स्टार्टअपसाठी देखील विद्यापीठ नेहमी प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी नेहमी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बनण्याकडे लक्ष द्यावे. स्वतः उद्योजक होण्याचे स्वप्न बघून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. आज विद्यापीठाला पंतप्रधान उच्च सत्र शिक्षा अभियानातून मंजूर झालेल्या 100 कोटी रुपये निधीमधून विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, स्टार्टअपबाबत विद्यार्थी व शिक्षकांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त कलागुणांना व कौशल्यांना वाव देऊन उद्योजक बनण्याकडे लक्ष द्यावे. शासनाच्या पर्यटन तसेच विविध महामंडळाकडून पर्यटन व उद्योग उभारण्यासाठी बिगरव्याज वित्त पुरवठा होतो. त्याचा लाभ युवकांनी घ्यावा. सुदैवाने आज आपल्या जिल्ह्यासाठी एकमेव विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने व येथील विद्यार्थ्यांनी अशी कामगिरी करावी की, ज्यामुळे संपूर्ण जगात नावलौकिक प्राप्त व्हावे. त्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, अशा सदिच्छा देखील त्यांनी यावेळी दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने झाली तर राष्ट्रगीताने समारोप झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. सतीशकुमार देवकर यांनी मानले. 

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget