एक्स्प्लोर

मोठी बातमी! मराठा आरक्षणाचा निर्णय 24 डिसेंबरपर्यंत होणे शक्य नाही; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा निर्णय 24 डिसेंबरपर्यंत होणे शक्य नाही, फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्वांनी संयम राखावे, असे सुभाष देशमुख म्हणाले आहे.

सोलापूर : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) निर्णय घेण्यासाठी सरकारकडे फक्त उद्याचा दिवस शिल्लक असल्याचं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी म्हटले असतानाच, दुसरीकडे मराठा आरक्षणच्या बाबतीत माजी सहकारमंत्री तथा भाजप आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय 24 डिसेंबरपर्यंत होणे शक्य नाही, फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्वांनी संयम राखावे, असे सुभाष देशमुख म्हणाले आहे. त्यामुळे त्यांच्या याच वक्तव्यावर आता मनोज जरांगे यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 

सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना सुभाष देशमुख म्हणाले की, "आरक्षणाच्या बाबतीत सभागृहात अनेक आमदारांनी आपले मत व्यक्त केले आहे. किमान 70 ते 80 आमदारांनी आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्वतः आपले मत व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्यामुळे त्यांना दिलही गेलं पाहिजे. शिंदे समितीने आपला अहवाल सादर केला आहे, त्यानंतर त्या अहवालाचे अवलोकन होईल आणि ते मंत्रिमंडळ समोर सादर केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवून निर्णय घेतला जाईल. त्यामुळे, 24 डिसेंबरपर्यंत याबाबत निर्णय होणे शक्य नाही, कारण अहवाल आता प्राप्त झाला आहे," असे देशमुख म्हणाले आहे. 

सर्वांनी सहकार्य करावे

पुढे बोलतांना ते म्हणाले की, आरक्षण दिल्यानंतर ते रद्द होऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे, फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्वांनी संयम राखावे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि आरक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावे असेही देशमुख म्हणाले. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो काही 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे, त्या वेळेत आरक्षण देणे शक्य होणार असे मला वाटत आहे, असं देशमुख म्हणाले. 

फेब्रुवारीपर्यंत सर्वांनी संयम ठेवला पाहिजे...

गेल्या 40 ते 45 वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न रखडलेला आहे. 24 डिसेंबरला तो मार्गी लागणार नाही. अजून अहवाल सादर करण्याचे बाकी होते आणि तो आत्ता सादर झाला आहे. यावर कॅबिनेट आणि त्यानंतर पुन्हा अधिवेशन घ्यावे लागणार आहे. कारण आरक्षण देतांना ते टिकले पाहिजे. दिलेले आरक्षण पुन्हा रद्द होऊ नयेत याची देखील सर्वांनी नोंद घेण्याची गरज आहे. आरक्षण देतांना खूप अभ्यासपूर्वक द्यावा लागणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात जो विशेष अधिवेशन बोलवण्यात आला आहे, तोपर्यंत सर्वांनी संयम ठेवला पाहिजे, असेही सुभाष देशमुख म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

सरसकट आरक्षणावर ठाम, सरकारकडे आता उद्याचा दिवस; मनोज जरांगेंचा सभेपूर्वी सरकारला इशारा

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur Crime News: आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
Ashadhi wari 2026: देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
Amruta Fadnavis and Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....
CM Devendra Fadnavis in Pandhapur: देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Embed widget