एक्स्प्लोर

राज्याप्रमाणे देशातही कोरोनाबाधितांच्या संख्येत घट.. रोजचा आकडा 65 हजारांपेक्षा कमी

भारतात दरदिवशी वाढणारी कोरोना रुग्णांची संख्य़ा आता 65000 च्या खाली आली असून सोमवारी कोरोना रुग्णांची संख्या 61,267 इतकी वाढली तर मृतांच्या संख्येत 884 जनांची भर पडल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितले. कोरोना रुग्णांच्या संख्येचा चढता आलेख आता उतरत आहे ही दिलासादायक बातमी आहे.

नवी दिल्ली: रोजची वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी 65,000 च्या खाली आली असून एकुण बरे झालेल्य़ा रुग्णांची संख्या आता 56 लाखांच्या वर पोहचली आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हंटले आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत एका दिवसात 61,267 नव्या रुग्णाची भर पडली असुन देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 66,85,082 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 884 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या आता 1,03,569 इतकी झाली आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्य़ा 56,62,490 इतकी झाली आहे.तर देशभरात कोरोनाच्या 9,19,023 अॅक्टिव केसेस् असून ही संख्या एकूण रुग्णांच्या 13.75 टक्के इतकी आहे. कोरोनाच्या संसंर्गामुळे होणाऱ्या मृतांचे प्रमाण हे 1.55 टक्के इतके आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्येने 17 ऑगस्ट रोजी 20 लाखांचा टप्पा ओलांडला तर 23 ऑगस्ट रोजी 30 लाखांचा टप्पा ओलांडला. 5 सप्टेंबर रोजी ती संख्या 40 लाख तर 16 सप्टेंबरला 50लाख तर 28 सप्टेंबर रोजी कोरोना रुग्णांच्या संखेने 60 लाखांचा टप्पा ओलांडला. आयसीएमआरच्या अहवालानुसार 5 ऑक्टोबर पर्यंत एकूण 8,10,71,797 इतक्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्य़ा असून सोमवारी एका दिवसात 10,89,403 इतक्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. याआधी रविवारी प्रकाशित केलेल्या आपल्या सप्टेंबर महिन्या्च्या आढवा  अहवालात केंद्रीय अर्थमंत्रालयाने भारतात कोरोनाने कदाचित याआधी कोरोनाने त्याच्या तीव्रतेसंबंधी सर्वोच्च अवस्था गाठली असून आता त्याच्या प्रादुर्भावाची घसरण सुरु झाल्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर अनलॉक आणि सरकारी पॅकेज यामुळे अर्थव्यवस्था सुधारत असल्याचा दावा केलाय. महाराष्टातही  गेल्या पाच दिवसात राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत घट पाहायला मिळाली आहे. काल राज्यात 10 हजार 244 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील आणि राज्यातील कोरोना रुग्णांचा चढता आलेख आता उतरत आहे ही दिलासादायक बातमी आहे. कोरोनावर भारतात लस कधी उपलब्ध होणार याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, 2021 च्या जुलै महिन्यापर्यंत 25 कोटी लोकांना लस देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. सरकारला कोरोना लसीचे 400 ते 500 कोटी डोस प्राप्त होतील आणि यातील जुलैपर्यंत 25 कोटी लोकांना लसीकरण पूर्ण होईल असं अनुमान आहे. केंद्र सरकार कोरोना आजारावर नियंत्रणासाठी 24 तास काम करत आहे. तसंच कोरोनाची लस आल्यानंतर त्याच्या वितरण प्रणालीसाठी देखील काम सुरु आहे. आमची प्राथमिकता आहे की देशातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस कशी दिली जाईल. कोरोना लसीच्या संदर्भात एक उच्चस्तरीय तज्ञांनी कमिटी देखील कार्यरत आहे, असं यापूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधीत बातम्या:

भारतात कोरोना प्रादुर्भावाने शिखर गाठून उतरण सुरु झाल्याची शक्यता.. अर्थमंत्रालयाचा अहवाल

जुलै 2021 पर्यंत 25 कोटी लोकांचं कोविड लसीकरण पूर्ण होण्याचं अनुमान : डॉ हर्षवर्धन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत  नाही, आम्ही पण कमजोर नाहीSanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!Sanjay Gaikwad Dance Buldhana : आमदार संजय गायकवाड यांनी मुरळीवर धरला ठेका, दिलखुलास डान्सNew India Co-Oprative Bank :  Hitesh Mehta ने व्यवसायासाठी धर्मेशला 70 कोटी दिल्याची कबुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत भारतीयांच्या पायात अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
मुंबईतील हॉटेल्समध्ये आता तंदूर रोटी कायमची बंद?
मुंबईतील हॉटेल्समध्ये आता तंदूर रोटी कायमची बंद?
Indian Immigrant : मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.