एक्स्प्लोर

Sindhudurga News: सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून आठवड्यातून केवळ चारच दिवस टेक ऑफ, तेही रामभरोसेच

Sindhudurga News: देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हात दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळाकडे महाराष्ट्र शासन आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

Maharashtra Sindhudurga News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurga District) बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून आठवड्यातून केवळ चारच दिवस टेक ऑफ होत आहे, तेही रामभरोसे. चिपी विमानतळावर अलायन्स एअरची विमानसेवा सुरू असून सद्यस्थितीत सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे चारच दिवस विमान ये-जा करतं, उर्वरीत बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे तीन दिवस विमान येत नाही. पावसामुळे वातावरण खराब झाल्यास त्या दिवशी विमानसेवा रद्द केली जाते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरील विमानसेवा रामभरोसे सुरू आहे. याचा फटका विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. याकडे राजकीय नेत्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे.

देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हात दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळाकडे महाराष्ट्र शासन आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. कारण मोठा लवाजवा करत या विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं. मुळात कोकणातील हवामानाचा अंदाज घेऊन विमानतळावर विमान उतरण्यासाठी आणि उड्डानासाठी कोणत्याही परिस्थितीत लागणाऱ्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात धुक्याचं प्रमाण जास्त असतं. तसेच पावसाळी वातावरण असल्यास विमान उतरण्यास किंवा उड्डाण करण्यास तांत्रिक बाबी समोर येतात. पर्यायानं विमानसेवा रद्द केली जाते. याचा फटका विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच बसतो. त्यामुळे शासनानं जरी खाजगी तत्वावर हे विमानतळ सुरू केलं असलं तर याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पावसाळ्यात तर सिंधुदुर्ग विमानतळावरून प्रवाशांना रामभरोसे विमानसेवेचा अनुभव कायमच येतो. 


Sindhudurga News: सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून आठवड्यातून केवळ चारच दिवस टेक ऑफ, तेही रामभरोसेच

सिंधुदुर्गातील बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर अलायन्स एअर कंपनी प्रवाशांना सेवा देते. मात्र सध्या या विमानतळावरून केवळ 4 फ्लाईट टेक ऑफ करत आहेत. रामभरोसे विमानसेवा असल्यानं विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसत आहे.  

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर 800 कोटी खर्च करून उभारण्यात आलं. चिपी गावात हे विमानतळ उभारून देशातील पहिल्या पर्यटन जिल्ह्याला गती देण्यासाठी उभारण्यात आलं असल्याचा दावा राजकीय नेतेमंडळींकडून करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात या विमानतळाचा पर्यटनाला कोणताही फायदा होताना दिसत नाही. याउलट शेजाऱ्याच्या गोवा राज्यात मात्र देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान येऊन मोठ्या संख्येनं देश विदेशातील पर्यटक येतात. त्यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळत आहे.

बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर भविष्यात विमानांची संख्या वाढविली जाईल, माल्टा देशाचं विमान याठिकाणी उतरेल अशा वल्गना माजी पालकमंत्री तथा विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. मात्र विमानांची संख्या सोडाच सद्यस्थितीत पूर्ण क्षमतेनं सातही दिवस एक विमान येऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे खासदार विनायक राऊत यांनी तर या विमानतळावरुन सिंधुदुर्ग ते शिर्डी आणि मैसूर विमासेवा सुरू करू, असं म्हटलं होतं, तेही हवेत विरलं. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नियमित विमानसेवा सुरू ठेवण्यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक उड्डाण मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन मार्ग काढू म्हटलं होतं. मात्र अद्याप नियमित विमानसेवा सुरू झालेली नाही. भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील दुसरं विमान याठिकाणी सुरू केलं तेही काही दिवसांत बंद झालं. त्यामुळे बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरील विमानसेवा सध्या तरी रामभरोसे आहे.

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी तर केंद्र आणि राज्य सरकारनं गोव्यातील मोपा विमानतळ सुरू ठेवण्यासाठी बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचा बळी दिला, अशी टीका केली होती. सुरुवातीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र हे विमानतळ उभारून झालं तेव्हा मात्र देशाअंतर्गत विमानसेवा सुरू राहतील अशा प्रकारचीच धावपट्टी उभारण्यात आली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog: बच्च कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
Maharashtra Live blog: बच्च कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Farmers' Fury: 'मी कोणत्याच पक्षाचा नाही, मी शेतकरी आहे!', Parbhani त जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली.
PM Modi Mumbai : मोदींचा मुंबई दौरा, मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला पंतप्रधान संबोधित करणार
Rain Alert: Latur जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अहमदपूर, देवणी तालुक्याला झोडपले, जनजीवन विस्कळीत
Cyclone Alert: 'मोंठा' चक्रीवादळ Andhra Pradesh किनारपट्टीवर धडकले, अनेक राज्यांत पावसाचा इशारा
Delhi Crime Special Report : दिल्ली ॲसिड हल्ला प्रकरणात मोठा खुलासा, कुणी रचला बनाव?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog: बच्च कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
Maharashtra Live blog: बच्च कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Mohammad Shami : मोहम्मद शमीचा सलग दुसऱ्या रणजी सामन्यात धमाका, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, आगरकरसह निवड समितीचं टेन्शन वाढलं
मोहम्मद शमीचा धडाका कायम, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, निवड समितीला दमदार कामगिरीतून उत्तर
Rashmika Mandanna: 8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
Embed widget