एक्स्प्लोर

Satara News : कास पठारावरील बांधकामांवरून सातारचे दोन्ही राजे आक्रमक, उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Satara News : सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसरातील (Kas Plateau) अनधिकृत बांधकामाबाबत एबीपी माझाने  'कास कोण करतंय भकास ?' अशी रोक ठोक भूमिका घेत वृत्त प्रसारीत करताच सातारचे दोन्ही राजे आक्रमक झाले आहेत.

सातारा : जागतिक वारसास्थळ म्हणून युनोस्कोने आपल्या पुस्तकात नोंद घेतलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसरातील (Kas Plateau) अनधिकृत बांधकामाबाबत एबीपी माझाने  'कास कोण करतंय भकास ?' अशी रोक ठोक भूमिका घेत वृत्त प्रसारीत करताच सातारचे दोन्ही राजे आक्रमक झाले आहेत. मात्र, एक राजा हा कास परिसरातील अतिक्रमणे कायम करावी अशी मागणी करत असताना दुसरा राजा निसर्गाचा समतोल राखला जावा आणि अतिक्रमणे काढावी अशी भूमिका घेत आहेत. खा. उदयनराजे भोसले (Udayanraje) यांनी आज सकाळी सातारा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन कास परिसरातील निसर्गाचा समतोल राखला पाहिजे यासाठी अनधिकृत बांधकामे काढली पाहिजेत अशी भूमिका घेतली. तर दुपारी आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje) यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ज्यांनी आपल्या स्व: च्या मालकीच्या जागेवर बांधकामे केली आहेत, त्यांची बांधकामे अधिकृत करा अशी मागणी करत आहेत. ही बांधकामे पाडण्याची भूमिका प्रशासनाने घेतली तर आम्हाला बायका पोरांसह रस्त्यावर झोपावे लागेल अशी भूमिका शिवेंद्रराजे यांनी घेतली आहे.

उदयनराजे यांची भूमिका
महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणचे एसएसआय वाढवून मिळावी अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली. कास फिरायला आलेल्या पर्यटकांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. त्यासाठी तसे नियोजन केले पाहेजे. जी बांधकामे झाली आहेत,  त्यामुळे कासचा परिसरत विदृप होत चालला आहे. हा परिसर म्हणजे वेस्टन घाट, वल्ड हेरीटेज, इको सेन्सीटीव, सह्याद्री व्याग्र प्रकल्प आहे. या भागातील लोकांनी नेमक काय करायच? पर्यटन वाढले पाहिजे असं आपण म्हणतो त्यावेळी स्थानिकांचा विचार केला पाहिजे. त्यांनी नेमक खायचं काय यावरही चर्चा केली पाहिजे. 4 तारखेला जिल्हाधिकारी आणि मी कासची पहाणी करण्यासाठी जाणार आहे. लोणावळ्याला जात होतो तेंव्हा ते हिरवगार होते, आज तेथे झाडे नाहीत. कासची झाडी जपली पाहिजेत, पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजेत, या आगोदर पाचगणी महाबळेश्वर परिसरात जी बेकायदा बांधकामे झाली आहेत त्याकडे लक्ष दिले पाहिजेत. साखर कारखाने, एमायडीसी मधील कारखान्यांची तपासणी झाली पाहिजे, असे मत उदयराजे यांनी मांडले आहे. 

कासचे सौंदर्य राखले पाहिजे, कोणी कसही बांधकाम करत आहे, जर ते इकोसेन्सेटीव बांधकाम केले असते तर ते चांगले दिसले असते. कासची उंची वाढवली, भूशी डॅम्पपेक्षा येथील डॅम्प चांगला आहे.
 बऱ्याचशा हॉटेल धारकांची पहाणी केली पाहिजे, वेस्टेज डिस्पोज केले पाहिजे, जर सुप्रिम कोर्टाने आदेश दिला असेल तर मी काय करणार? असा प्रश्न उपस्थित करत उदयराजे म्हणाले, कास परिसरात जास्त कोणी बांधकाम करता कामा नये. काही लोकांनी तीन चार मजली बांधकामं केली आहेत. ज्यांनी या ठिकाणी विदृपीकरण केले त्याची आम्ही पहाणी करणार आहोत. महसुल खाते, पर्यावरण खाते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री  यांच्या समवेत एक बैठक घेऊन यातून काय मार्ग काढता येईल यावर चर्चा केली. कोणी आरेरावीची भाषा करत असेल तर ते कायद्याने तोडणारच."

 शिवेंद्रराजेंची भूमिका

 जिल्हाधिकाऱ्यांसोबत सर्वांसमोर चर्चा केली. ही बांधकामे कशी करावीत यासाठी आम्ही चर्चा केली. शासनाकडून काही पाहिजे असेल तर ते मी देतो. ही अतिक्रमणे नाहीत, वडिलोपार्जीत जमिनीवर बांधकामे केली आहेत. त्याचे शुल्क भरण्यास तयार आहोत, पर्यटन वाढवायचे असेल तर येणाऱ्या पर्यटकांना सुविधा दिल्या पाहिजेत, अन्यथा पर्यटन वाढणार नाही. प्रशासन जेसीबी घेऊन आले तर आम्ही बायकापोरांसह बुलडोझर समोर झोपू. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याचे नियम घालावे, बांधकामे कशी करायची त्यासाठी नियम द्या. राज्यातील अनेक अतिक्रमणे नियमीत केली तशी आमची अतिक्रमणे नियमीत करा, आम्ही जंगल काढा असे म्हंटले नाही, असे शिवेंद्र राजे यांनी म्हटले आहे. 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Shinde vs Uday Samant :  
"माझं नाव घेण्याएवढं त्यांचं धैर्य नाही", कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचं उदय सामंत यांना प्रत्युत्तर 
Udayanraje Bhosale Satara: आंबेनळी घाटातील अपघातात मुलं गेली, उदयनराजे पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले, 'स्वत:ला एकटं समजू नका, तुमचा मुलगा म्हणून कधीही हाक मारा'
आंबेनळी घाटातील अपघातात मुलं गेली, उदयनराजे पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले, 'स्वत:ला एकटं समजू नका, तुमचा मुलगा म्हणून कधीही हाक मारा'
तब्बल पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार, खेड ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे थेट निलंबन, विभागीय आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय
तब्बल पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार, खेड ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे थेट निलंबन, विभागीय आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय
Raigad Accident Ambenali Ghat: आंबेनळी अपघातात सर्वात मोठा ट्विस्ट, तब्बल 24 तास स्कॉर्पिओ कोसळल्याचा थांगपत्ता कोणालाच नव्हता, चक्रावणारी माहिती समोर
आंबेनळी अपघातात सर्वात मोठा ट्विस्ट, 24 तास स्कॉर्पिओ कोसळल्याचा थांगपत्ता कोणालाच नव्हता, चक्रावणारी माहिती समोर

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Embed widget