एक्स्प्लोर

Satara News : सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा पूर्ववत; पुसेसावळी तणाव प्रकरणात आतापर्यंत 34 जणांना अटक 

Satara News : नेट बंद असल्याने सर्वात मोठा परिणाम आर्थिक व्यवहारांवर झाला. इंटरनेट सेवा प्रशासनाकडून पूर्ववत करण्यात आली असली तरी जमाव बंदी आदेश अद्याप हटवण्यात आलेला नाही.

सातारा : जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळीमध्ये रविवारी झालेल्या दोन गटामधील तणावानंतर अजूनही परिस्थिती तणावाखाली आहे. कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी गावामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी रविवारी झालेल्या तणाव प्रकरणात आतापर्यंत 34 जणांना अटक करण्यात आली आहे. खंडित करण्यात आलेली इंटरनेट सेवा पुन्हा टप्प्याटप्याने आज सकाळपर्यंत पूर्ववत झाली आहे. 

ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर तांत्रिक पुराव्यांवर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. दरम्यान, काही लोकांकडून पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेत बाजारपेठ उघडण्यास विरोध केला आहे. जोपर्यंत युवकांना या गुन्ह्यातून वगळले जात नाही, तोपर्यंत बाजारपेठ सुरू होणार नसल्याची भूमिका संबंधितांनी घेतली आहे. त्यामुळे गावात शांतता असली तरी बाजारपेठेत शुकशुकाट आहे.

दरम्यान, नेट बंद असल्याने सर्वात मोठा परिणाम आर्थिक व्यवहारांवर झाला. इंटरनेट बंदीने लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोलमडला. नेट बंद झाल्याने पाचगणी महाबळेश्वर येथून अनेक पर्यटक परत फिरले. इंटरनेट सेवा प्रशासनाकडून पूर्ववत करण्यात आली असली तरी जमाव बंदी आदेश अद्याप हटवण्यात आलेला नाही.

आतापर्यंत 34 जणांना अटक 

दरम्यान, पुसेसावळी तणाव प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 34 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामधील 15 जणांना वडूज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 16 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे, बाजारपेठ सुरू करण्यासाठी पोलिसांनी गावातील व्यापाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमची मुलं अटकेत असल्याने आम्ही दुकाने कशी सुरू, अशी विचारणा व्यापाऱ्यांनी केली. अटकेतील मुलांचा दंगलीशी संबंध नसल्याचा दावाही केला. मात्र, पोलिसांनी ठोस पुरावे हाती आल्यानंतर कारवाई केल्याचे सांगितले. तसेच पुसेसावळीत दंगल झाली होती तेव्हा आपली मुलं कुठं होती याचा माहिती सादर करा, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

पुसेसावळीत तणाव कसा निर्माण झाला?

औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी 10 सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्टवर दोन मुलांच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांकडे विचारपूस करण्यात येत असतानाच्या काळात सदर आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आल्यानंतर तणाव निर्माण झाला. रात्री साडे नऊच्या सुमारास जमलेल्या जमावाकडून दुचाकी व चार चाकी वाहने पेटवून देण्यात आली.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: राज्यभरात पावसाची जोरधार! चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली, साताऱ्यात कृष्णा नदीचं पुन्हा रौद्ररूप, कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा
राज्यभरात पावसाची जोरधार! चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली, साताऱ्यात कृष्णा नदीचं पुन्हा रौद्ररूप, कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Rohit Pawar: '...पण आपण छत्रपतींचे वारस आहात, छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करता हे विसरु नये'; आमदार रोहित पवारांचा थेट मंत्री शिवेंद्रराजेंना सल्ला
'...पण आपण छत्रपतींचे वारस आहात, छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करता हे विसरु नये'; आमदार रोहित पवारांचा थेट मंत्री शिवेंद्रराजेंना सल्ला
Satara NEET exam death News: नीट परीक्षेचा निकाल आला, नैराश्यात गेली अन् उंदरांना मारण्याच्या विषारी वड्या खाल्ल्या; अचानक तीव्र पोटदुखी सुरू झाली, शेवटी...
नीट परीक्षेचा निकाल आला, नैराश्यात गेली अन् उंदरांना मारण्याच्या विषारी वड्या खाल्ल्या; अचानक तीव्र पोटदुखी सुरू झाली, शेवटी...

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget