एक्स्प्लोर

West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर

West Bengal : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 

कोलकाता : केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केले. पश्चिम बंगालमध्ये यावेळी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिल आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला होईल. तर, मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसची सत्ता वाचवण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. तर, भाजपनं देखील पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलमध्ये भाजपला धक्का बसताना दिसत आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता आहे. तर, असदुद्दीन ओवेसी यांच्या आघाडीला देखील चांगल्या जागा मिळतील, असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

पश्चिम बंगाल कोणाची सत्ता? 

मॅटराईज आयएएनसच्या ओपिनियन पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार पुन्हा येऊ शकतं. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीच जितक्या जागा जिंकल्या त्यातुलनेत यावेळी जागा कमी होऊ शकतात. ओपिनियन पोल नुसार तृणमूल काँग्रेसला 155-170 जागा मिळू शकतात. तर, भाजपला 100-115 जागा मिळण्याची शक्यता आहे. या ओपिनियन पोलनुसार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम आघाडीची कामगिरी काँग्रेस पेक्षा चांगली राहू शकते. एमआयएमच्या आघाडीला पाच ते सहा जागा मिळू शकतात. मात्र, काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

ओपिनियन पोलनुसार तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील मतदानाच्या टक्केवारीतील अंतर कमी राहण्याची शक्यता आहे. टीएमसीला 43-45 टक्के, भाजपला 41 ते 43 टक्के  आणि इतरांना 13 ते 15 टक्के मतं मिळू शकतात. 

पश्चिम बंगालमध्ये ओपिनियन पोलनुसार तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. पश्चिम  बंगालमध्ये यावेळी 294 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 23 एप्रिलला 152 जागांवर मतदान होईल. तर, दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिलला 142 जागांवर मतदान होणार आहे. मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. 

2021 चा निकाल

पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत  तृणमूल काँग्रेसला 48.5 टक्के मतं मिळाली होती. तर, भाजपला 38.5 टक्के मतं मिळालेली. तृणमूल काँग्रेसनं त्यावेळी 213 जागा जिंकलेल्या, तर भाजपनं 77 जागांवर विजय मिळवला होता.    

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा घणाघात, वळसे पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न
आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा घणाघात, वळसे पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न
भाजपाने 12 ट्रॅव्हल्स बुकिंग केल्या; विधानपरिषदेची उमेदवारी भरताच मतदारांना पर्यटनासाठी नेलं, भंडाऱ्यात राजकीय सामना
भाजपाने 12 ट्रॅव्हल्स बुकिंग केल्या; विधानपरिषदेची उमेदवारी भरताच मतदारांना पर्यटनासाठी नेलं, भंडाऱ्यात राजकीय सामना
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नाहीच, कारण आलं समोर; ठाकरेंच्या शिवसेनेचा कुणाला पाठिंबा कुणाला?
नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नाहीच, कारण आलं समोर; ठाकरेंच्या शिवसेनेचा कुणाला पाठिंबा कुणाला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget