एक्स्प्लोर

केंद्राने शेतकऱ्यांवर अन्याय केला; राज्याने वाऱ्यावर सोडलं : राजू शेट्टी

देशात झुंडशाही आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला; राज्य सरकारने वाऱ्यावर सोडलं. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनामधून काही निष्पन्न होणार नाही, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

सांगली : शेतीमालाचा दर, पुणतांब्यामधील शेतकऱ्यांचं आंदोलन यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारवरही निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने  शेतकऱ्यांवर अन्याय केला आणि राज्य सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडलं, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. तसंच पुणतांब्यामधील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनामधून फार काही निष्पन्न होणार नाही, असंही राजू शेट्टी यांनी नमूद केलं. ते सांगलीमध्ये बोलत होते.
 
'केंद्र सरकारने  शेतकऱ्यांवर अन्याय केला; राज्य सरकारने वाऱ्यावर सोडलं'
आता सगळ्या आघाडी असो किंवा युती या सगळ्यांपासून आम्ही अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने सुद्धा शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.  रासायनिक खताच्या किंमती गगनाला भिडल्या. डिझेल प्रचंड वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यागत जमा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकाकीपणे आम्ही शेतकऱ्यांची लढाई लढत आहोत, असं राजू शेट्टी म्हणाले.

'पुणतांब्याच्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनामधून फार काही निष्पन्न होणार नाही'
तर पुणतांब्यामध्ये उपोषणासाठी बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर पूर्ण होतील का यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, "शेती आणि शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न हे केंद्र सरकारच्याच धोरणांमध्ये लपलेले आहेत. राज्य सरकारचा त्याच्यामध्ये सहभाग फार कमी आहे. कारण शेतकऱ्यांचे प्रश्न हे शेतीमालाच्या दरामध्ये लपलेली आहेत आणि शेतीमालाचा दर हा प्रामुख्याने केंद्र सरकारच्या धोरणावर अवलंबून असतो. त्यामुळे पुणतांब्यामधील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनामधून फार काही निष्पन्न होईल असं वाटत नाही."

सगळ्याच पक्षांपासून स्वाभिमानी आता चार हात लांब राहणार : राजू शेट्टी
दुर्दैवाने आज संपूर्ण देशामध्ये झुंडशाही चालली आहे. गलिच्छ राजकारण सध्या देशामध्ये चालू आहे. हे पाहून आज आमच्या मनाला वेदना होतात. कुणीही कुठल्याही जातीचा असो त्याला या देशांमध्ये मोकळेपणाने राहता आलं पाहिजे. मोकळेपणाने श्वास घेता आला पाहिजे. मग काश्मीरमधला पंडित असो किंवा अगदी महाराष्ट्रातला अल्पसंख्यांक असो त्याला मोकळेपणाने राहता आला पाहिजे, संविधानाने तसा अधिकारच दिला आहे, असं राजू शेट्टी म्हणाले. स्वभिमानी शेतकरी संघटनेने आता सगळ्याच पक्षापासून चार हात लांब राहायचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही आमची भूमिका घेऊन लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांचे जनमत पुन्हा  मिळवू, असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

इतर बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर

व्हिडीओ

Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Viral Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद
चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद
Embed widget