एक्स्प्लोर

केंद्राने शेतकऱ्यांवर अन्याय केला; राज्याने वाऱ्यावर सोडलं : राजू शेट्टी

देशात झुंडशाही आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला; राज्य सरकारने वाऱ्यावर सोडलं. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनामधून काही निष्पन्न होणार नाही, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

सांगली : शेतीमालाचा दर, पुणतांब्यामधील शेतकऱ्यांचं आंदोलन यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारवरही निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने  शेतकऱ्यांवर अन्याय केला आणि राज्य सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडलं, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. तसंच पुणतांब्यामधील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनामधून फार काही निष्पन्न होणार नाही, असंही राजू शेट्टी यांनी नमूद केलं. ते सांगलीमध्ये बोलत होते.
 
'केंद्र सरकारने  शेतकऱ्यांवर अन्याय केला; राज्य सरकारने वाऱ्यावर सोडलं'
आता सगळ्या आघाडी असो किंवा युती या सगळ्यांपासून आम्ही अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने सुद्धा शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.  रासायनिक खताच्या किंमती गगनाला भिडल्या. डिझेल प्रचंड वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यागत जमा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकाकीपणे आम्ही शेतकऱ्यांची लढाई लढत आहोत, असं राजू शेट्टी म्हणाले.

'पुणतांब्याच्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनामधून फार काही निष्पन्न होणार नाही'
तर पुणतांब्यामध्ये उपोषणासाठी बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर पूर्ण होतील का यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, "शेती आणि शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न हे केंद्र सरकारच्याच धोरणांमध्ये लपलेले आहेत. राज्य सरकारचा त्याच्यामध्ये सहभाग फार कमी आहे. कारण शेतकऱ्यांचे प्रश्न हे शेतीमालाच्या दरामध्ये लपलेली आहेत आणि शेतीमालाचा दर हा प्रामुख्याने केंद्र सरकारच्या धोरणावर अवलंबून असतो. त्यामुळे पुणतांब्यामधील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनामधून फार काही निष्पन्न होईल असं वाटत नाही."

सगळ्याच पक्षांपासून स्वाभिमानी आता चार हात लांब राहणार : राजू शेट्टी
दुर्दैवाने आज संपूर्ण देशामध्ये झुंडशाही चालली आहे. गलिच्छ राजकारण सध्या देशामध्ये चालू आहे. हे पाहून आज आमच्या मनाला वेदना होतात. कुणीही कुठल्याही जातीचा असो त्याला या देशांमध्ये मोकळेपणाने राहता आलं पाहिजे. मोकळेपणाने श्वास घेता आला पाहिजे. मग काश्मीरमधला पंडित असो किंवा अगदी महाराष्ट्रातला अल्पसंख्यांक असो त्याला मोकळेपणाने राहता आला पाहिजे, संविधानाने तसा अधिकारच दिला आहे, असं राजू शेट्टी म्हणाले. स्वभिमानी शेतकरी संघटनेने आता सगळ्याच पक्षापासून चार हात लांब राहायचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही आमची भूमिका घेऊन लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांचे जनमत पुन्हा  मिळवू, असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRamdas Kadam On BJP : भाजपने माझ्याविरोधात काम केलं तर परिणाम राज्यात दिसतील -कदमZero Hour Guest Center Uday Samant :सेनेचा बुरुज BJPच्या झेंड्याखाली,किरण सामंतांची मनधरणी कशी केली?Zero Hour ABP Majha : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांवर भाजपचा झेंडा? महायुतीत काय घडतंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
माहीभाईचा जलवा कायम, धोनीची झलक पाहायला चाहत्यांची झुंबड, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
चेन्नई, मुंबई ते लखनौ महेंद्रसिंह धोनीचा जलवा कायम, एकाना स्टेडियमवर चाहत्यांचा जनसागर, व्हिडीओ व्हायरल
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Embed widget