एक्स्प्लोर

Sangli: सांगलीत महाविद्यालयाने आश्वासन देऊनही 25 टक्के शैक्षणिक शुल्क परत केलं नाही, संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन

Sangli: सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना फी परत दिली नसल्याच्या निषेधार्थ ठिय्या मारून आंदोलन करण्यात आले.

Sangli: सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात (walchand college of engineering, sangli) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना फी परत दिली नसल्याच्या निषेधार्थ ठिय्या मारून आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांची शासनाने 25% फी परत देण्याचे आदेश दिले होते, मात्र वालचंद महाविद्यालय प्रशासनाने गेल्या दोन वर्षांपासून अद्यापही विद्यार्थ्यांना फी परत दिली नाही. यामुळे आक्रमक झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने वालचंद महाविद्यालयाच्या (walchand college of engineering, sangli) विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले. 

महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये हे अभियांत्रिकी विद्यार्थी आता धरणे आंदोलनावर बसले होते. जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांचे 16,500 प्रमाणे परत देण्याची फी थकवण्यात आली आहे. फी परत देण्यामध्ये महाविद्यालय प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आले. जोपर्यंत ही 25 टक्के फी शासनाने दिलेल्या निर्णयानुसार परत देण्यात येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. शेवटी वालचंद महाविद्यालयाने 25 टक्के शैक्षणिक शुल्क मार्च अखेर परत करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन थांबवण्यात आले.

कोरोना काळात सोयीसुविधा घेता न आल्याने वालचंद महाविद्यालयाने 25 टक्के शैक्षणिक शुल्क मार्च अखेर परत करण्याचे आश्वासन मंगळवारी अभाविपच्या या आंदोलनानंतर दिले. यामुळे सुमारे पाऊणेदोन कोटी रुपये विद्यार्थ्यांना परत मिळणार आहेत. कोरोना महामारीमुळे 2 वर्ष महाविद्यालय हे बंद होते. महाविद्यालयातील कुठल्याही सोयी सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना घेता न आल्याने तत्कालीन सरकारने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या निर्देशानुसार शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता.या निर्णयानुसार  प्रत्येक विद्यार्थ्याला शुल्कामध्ये 16 हजार 250 रुपये सवलत देणे हे क्रमप्राप्त होते. परंतु वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाने ही सवलत विद्यार्थ्यांना दिली नाही.  याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वारंवार महाविद्यालयाला निवेदन दिले. उपसंचालकांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु महाविद्यालयाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अभाविपने मंगळवारी महाविद्यालय बंद आंदोलन केले. यावेळी महाविद्यालयाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुमारे साडेतीन तास विद्यार्थ्यांनी आंदोलन करीत ठिय्या केला. उपसंचालक महाविद्यालयात उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीवर विद्यार्थ्यांकडून दगड ठेऊन निषेध करण्यात आला. 

दरम्यान, 31 मार्चपर्यंत खुल्या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे 16,250/- प्रत्येकी, इतर मागास वर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे 10,000/-  (एकूण शुल्काच्या 25%) एवढे शुल्क विद्यार्थ्यांना परत करून अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत शासनाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अभाविपने आंदोलन मागे घेतले.  एकूण 1560 विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील विद्यार्थी वगळता इतर सर्व विद्यार्थ्यांना 1 कोटी 73 लाख 55 हजार महाविद्यालय परत करणार आहे.
 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget