एक्स्प्लोर

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीमध्ये माळीण आणि तळीये दरड दुर्घटनेची पुनरावृत्ती, काय घडले होतं माळीण आणि तळीयेमध्ये?

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीमधील दुर्घटनेवरुन माळीण आणि तळीये गावात घडलेली दरड दुर्घटना नजरेसमोर आली. माळीण आणि तळीयेमध्ये नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेऊया...

Irshalwadi Landslide : कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. अशातच रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी (Irshalwadi) इथे काल (19 जुलै) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास दरड (Landslide) कोसळली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून 120 ते 130 लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत 75 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. इर्शाळवाडीमधील दुर्घटनेवरुन माळीण आणि तळीये गावात घडलेली दरड दुर्घटना नजरेसमोर आली. 2014 मध्ये माळीणमध्ये (Malin) दरड कोसळल्याने संपूर्ण गाव गाडलं गेलं होतं. तर 2021 मध्ये तळीयेमध्ये (Taliye) अशीच दुर्घटना घडली होती. ज्यात निसर्गाच्या कुशीतल्या या गावात केवळ चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळालं. माळीण आणि तळीयेमध्ये नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेऊया...

माळीण : डोंगर कोसळून गाव गाडल्याची घटना राज्यातील पहिलीच घटना 

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे एक आदिवासी भागातील गाव. पुण्यातून 75 ते 80 किमी अंतरावर डिंभे धरणाच्या परिसरात हे गाव वसललं होतं. त्यावेळी साधारण त्या गावाची लोकसंख्या 750 च्या आसपास असावी. 30 जुलै 2014 रोजी पहाटेच्या वेळी डोंगराचा कडा खाली आला आणि त्यात 44 हून अधिक घरं नागरिकांसह गाडली गेली. त्यात पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी जनावरे यांच्यासह सर्वच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. त्यांना बुधवारची सकाळ पाहताच आली नाही. एका क्षणात होत्याच नव्हतं झालं. एसटी चालकामुळे ही घटना सर्वांना समजली. मुसळधार पाऊस सुरु असतानाच ही दुर्घटना घडली. दिवस-रात्र त्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. सहा दिवसात जवळपास 151 मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला घरातील व्यक्तीही जिवंत नव्हत्या. प्रशासनाचे त्यांचे अंत्यविधी केले. डोंगर कोसळून गाव गाडल्याची घटना राज्यातील पहिलीच घटना होती. या घटनेनंतर राज्य आणि केंद्र सरकारने ही घटना राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केली. सरकारने माळीण गावाचं पुनर्वसन केलं.

अन् डोंगराच्या कुशीतील तळीये गाव मातीचा ढिगारा बनलं

रायगड जिल्ह्यातीलच महाड तालुक्यातील तळीये गाव 22 जुलै 2021 रोजी दुपारी साडेचार वाजता कोसळलेल्या दरडीमुळे उद्ध्वस्त झालं होतं. डोंगराच्या कुशीत असलेलं हे गाव अवघ्या 24 तासात मातीच्या ढिगारा बनलं. दरड कोसळल्यामुळे या गावातील 35 घरं जमीनदोस्त झाली. जे कामावर गेले होते तेच जिवंत राहिले, उरलेले सर्व दरडीखाली दबले गेले. सर्वत्र चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं. तळीयेमध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होता. समोरच्या डोंगराचा भाग खाली आला. त्यामुळे गावातील लोक घराबाहेर आले आणि ते दुसऱ्या डोंगराच्या बाजूला आडोशाला उभे राहिले. पण जीव वाचवण्यासाठी ज्या डोंगराखाली उभे राहिले, त्याच डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्यामुळे काही लोक दरडीखाली जागीच दबले गेले. तर काही दरडीबरोबर वाहत गेले. अनेकांच्या अंगावर आणि घरांवर दरडीसोबत आलेली दगड पडले, झाडे पडली. जेवढे डोंगराच्या आडोशाला उभे होते, त्यातील एकही बचावला नाही. इथल्या ढिगाऱ्यातून 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मात्र चौथ्या दिवशी बचावकार्य थांबवण्यात आलं आणि बेपत्ता 31 जणांना मृत घोषित करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या पोलादपूरजवळ भीषण अपघात, शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेल्या शिवभक्ताचा मृत्यू तर दोन जण जखमी 
रायगडच्या पोलादपूरजवळ भीषण अपघात, शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेल्या शिवभक्ताचा मृत्यू तर दोन जण जखमी 
Raigad Crime News: सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी नातेवाईक महिलेला संपवलं, नंतर मृतदेह दरीत फेकला; रायगड हादरलं!
सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी नातेवाईक महिलेला संपवलं, नंतर मृतदेह दरीत फेकला; रायगड हादरलं!
Aniket Tatkare Vidhan Parishad Election 2026: दोन तारखा...दोन प्रवास...आणि विलक्षण योगायोग; बिनविरोध विजयी होताच अनिकेत तटकरेंची पोस्ट, काय म्हणाले?
दोन तारखा...दोन प्रवास...आणि विलक्षण योगायोग; बिनविरोध विजयी होताच अनिकेत तटकरेंची पोस्ट, काय म्हणाले?
Bal Mane Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी हकालपट्टी करताच बाळ माने चार्टर्ड विमानाने मुंबईत, नितेश राणेही सोबतीला, पुढचा प्लॅनही सांगितला!
ठाकरेंनी हकालपट्टी करताच बाळ माने चार्टर्ड विमानाने मुंबईत, नितेश राणेही सोबतीला, पुढचा प्लॅनही सांगितला!

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
अभिजीत दीपके दिल्लीत, जंतरमंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
अभिजीत दीपके दिल्लीत, जंतरमंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2026 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2026 | शनिवार 
Suryakumar Yadav: वर्ल्डकप जिंकूनही कॅप्टनशीप गेली, टीम इंडियातून सुद्धा उचलबांगडी; सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, मोजक्याच शब्दात बरंच काही बोलला!
वर्ल्डकप जिंकूनही कॅप्टनशीप गेली, टीम इंडियातून सुद्धा उचलबांगडी; सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, मोजक्याच शब्दात बरंच काही बोलला!
दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्त
दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्त
India vs Afghanistan: केएल राहुलचे खणखणीत शतक, गिलची कॅप्टनी खेळी अन् रिषभ पंतला सुद्धा सुर गवसला, सुदर्शनची सुद्धाा फिफ्टी; टीम इंडियाची अफगाणविरुद्ध दमदार सुरुवात
केएल राहुलचे खणखणीत शतक, गिलची कॅप्टनी खेळी अन् रिषभ पंतला सुद्धा सुर गवसला, सुदर्शनची सुद्धा फिफ्टी; टीम इंडियाची अफगाणविरुद्ध दमदार सुरुवात
Cockroach Janta Party Jantar Mantar: कॉकरोच जनता पार्टीचा जंतर-मंतरवर 5 तास एल्गार; धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देण्यासाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम, सोनग वांगचुक सहभागी, उद्धव ठाकरे अन् रोहित पवारही आंदोलनावर बोलले
कॉकरोच जनता पार्टीचा जंतर-मंतरवर 5 तास एल्गार; धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देण्यासाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम, सोनग वांगचुक सहभागी, उद्धव ठाकरे अन् रोहित पवारही आंदोलनावर बोलले
Uddhav Thackeray :कॉकरोच ना कमी लेखू नका, हा जंतरमंतरवरील आंदोलनाचा इशारा, नीटच्या पीडित तरुण- तरुणींचा आक्रोश सरकारला ऐकावाच लागेल : उद्धव ठाकरे
हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेत रणरणत्या उन्हात रस्त्यावर; कॉकरोच ना कमी लेखू नका : उद्धव ठाकरे
Embed widget