एक्स्प्लोर

येत्या काही दिवसात राज्यात पावसाची स्थिती काय असेल? हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांचा अंदाज

कोकणामध्ये आजपासून तर मराठवाड्यामध्ये 10 तारखेपासून आणि मध्य महाराष्ट्रात 11 तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.

पुणे : आफ्रिकेतून येणारे कोरडे वारे आपल्या बाष्पयुक्त हवेमध्ये मिसळतात त्यामुळे पावसावर परिणाम झाला आहे. परंतु जून आणि जुलैमध्ये पावसात खंड होईल हे भाकित वर्तवलं होतं, अशी माहिती हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितलं. लोकांना सावध करावे या अनुषंगाने जिथे 65 मिलिमीटर पाऊस होईल किंवा त्यापेक्षा जास्त होईल तिथे वापसा येताच पेरण्या कराव्यात आणि पाऊस कमी झाला असेल किंवा 65 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाला असेल आणि जमिनीत ओलावा नसेल तर पेरणी करू नये ही बाब आधीच सांगितली गेली होतीस, असं साबळे यांनी सांगितलं.
 
मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये माझ्याकडे जवळ जवळ 16 वेधशाळेचा डेटा येतो. विदर्भातल्या चार मराठवाड्यातील एक त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठातील या सहा ते सात आणि कोकण कृषी विद्यापीठाची एक अशा या सगळ्यांच्या अभ्यासावरून मला असे दिसून आले यावर्षी साधारणपणे वाऱ्याचा वेग मार्च, एप्रिल, मे महिन्यात दोन ते अडीच किलोमीटर प्रति तास होता. ज्या वेळेला आठ ते नऊ किलोमीटर प्रतितास वेळ असायला पाहिजे होता, त्यावेळी दोन ते तीन किलोमीटर प्रतितास वेळ झाला. तरीही निश्चित माझ्या मॉडेलनुसार सांगता येईल की हमखास जूनमध्ये आणि जुलैमध्ये पावसात खंड होता, हे सांगितले होते. ज्यावेळी याला दुजोरा देणारी आणखी एक दुसरी भारतातील घटना घडली ते म्हणजे यावर्षीचे तापमान मार्च, एप्रिलमध्ये पाहिलं तर दोन अंश सेल्सिअसने तापमान सरासरीपेक्षा कमी होते व सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी होता. हे तीन घटक इतके मार्मिक आहेत की या घटकांवरून सांगता येतं की हे घडणार होतं, असं रामचंद्र साबळे यांनी सांगितल. 
 
सद्यस्थितीत महाराष्ट्रावर कमी दाबाचा हवेचे क्षेत्रे निर्माण होत आहे आणि त्यानुसार पावसाला सुरुवात होत आहे. कोकणामध्ये आजपासून तर मराठवाड्यामध्ये 10 तारखेपासून आणि मध्य महाराष्ट्रात 11 तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होईल. साधारणपणे 13 जुलैला आणखी हवेचे दाब कमी आहेत त्यामुळे 13 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत काही ठिकाणी अतिवृष्टीची संभावना आहे, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.

कोकणामध्ये सध्या भात लागवड थांबलेली आहे. तसेच मराठवाड्यात जेव्हा चांगला पाऊस होईल तेव्हा उरलेल्यांना पेरणी करता येईल. पेरणी करताना साधारणपणे यापुढे चार ओळी सोयाबीनच्या एक ओळ तुरीची अशा पद्धतीने पेरणी केली तर तूर आणि सोयाबीन या दोन्ही पिकांना फायदा होऊन शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकेल. याशिवाय काही ठिकाणी बाजरीची पेरणी थांबली, ज्वारीची पेरणी थांबलेली ही देखील खरी आहेत. त्यामध्ये आंतरपीक तुरीचे पीक घ्यायला पाहिजे. दोन ओळी बाजरीच्या किंवा ज्वारीच्या आणि त्यानंतर एक तुरीची अशा पद्धतीने जर पेरणी केली तर दोन्ही पिकांचे उत्पादन मिळू शकेल. आता होणारा पाऊस हा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. खरिपात आधीच्या पेरण्या झाल्या त्यांना जीवदान मिळणार आहे. यापुढे होणाऱ्या पेरण्यांना देखील त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होतोय तसेच पुढेदेखील ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे.

काही तुरळक ठिकाणी जोराचा पाऊस झाला तर तिथेच शेतातून पाणी काढून देणे महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. अशा पद्धतीने पाऊस, हवामान आणि शेतीचा विचार करावा लागणार आहे. सर्व शास्त्रज्ञांच्या मते 2012, 2015, 2018 चा मोठा दुष्काळ असो वा कोल्हापूरला आलेला महापूर किंवा गेल्या वर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दिवसात झालेला पाऊस असो हे आणीबाणीचे संकेत देतात. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
Vidhan Parishad Election 2026: पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर, पाहा संपूर्ण यादी!
पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर, पाहा संपूर्ण यादी!
Pune Crime News : पुणे गुवाहाटी विमानाच्या बाथरूममध्ये सापडली चिठ्ठी अन्...; विमान तातडीने निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तपासलं, प्रवासी सुखरूप, नेमकं काय घडलं?
पुणे गुवाहाटी विमानाच्या बाथरूममध्ये सापडली चिठ्ठी अन्...; विमान तातडीने निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तपासलं, प्रवासी सुखरूप, नेमकं काय घडलं?
Pune Crime News : गुन्हा का नोंदवला नाही म्हणून राडा! महिलेचा दारू पिऊन नऱ्हे पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा, 41 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल
गुन्हा का नोंदवला नाही म्हणून राडा! महिलेचा दारू पिऊन नऱ्हे पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा, 41 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
Satara Sangli Vidhan Parishad : सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
IPL 2026: आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका, फायद्यात कोण?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका
N S Raja Subramani: देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
Balen Shah : नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
Embed widget