एक्स्प्लोर

Supriya Sule : विरोधकांशिवाय आजचा लोकार्पण सोहळा अपूर्णच, संसदेचा इव्हेंट करु नका : सुप्रिया सुळे

लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असायलाच हवा. नव्या संसदभवनाचा कार्यक्रमाला विरोध पक्षातील नेते नसतील तर हा कार्यक्रम अपूर्ण आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Supriya Sule : देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असायलाच हवा. नव्या संसदभवनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षातील नेते नसतील तर हा कार्यक्रम अपूर्णच आहे, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. संसदेचा इव्हेंट करु नका, असेसुद्धा खडेबोल त्यांनी सुनावले आहेत.

सुप्रीया सुळे म्हणाल्या की, प्रत्येक निर्णय घेण्यासाठी मोठ्या नेत्यांना आणि मंत्र्यांना फोन केला जातो. तुमचं काम असलं की तुम्ही मंत्र्यांना फोन करुन बोलावून घेणार मात्र या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी एकाही नेत्याला फोन आला नाही. या सरकारच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी देशातील सगळ्या विरोधीपक्षाच्या नेत्यांना फोन केला असता तर सगळे आनंदानं दिल्लीला गेले असते. संविधानानं देश चालतो आणि देशात लोकशाही असेल तर लोकशाहीत विरोधीपक्षाला महत्व आहे. त्यामुळे देशातील सगळ्यात मोठ्या कार्यक्रमाला विरोधीपक्ष नसेल तर हा कार्यक्रम किंवा सोहळा अपुरा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला होता...

तीन दिवसांपूर्वी मला फक्त एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला होता, संसदीय कमिटी मेंबर म्हणून तो मेसेज होता. आपली संसद हे लोकशाहीचं मंदिर आहे. आम्ही सर्व पक्ष एकत्र आलो असतो, तर हे देशासाठी जास्त संयुक्तिक वाटलं असतं, असंही त्या म्हणाल्या. जुन्या संसद भवनच मला कायम आवडतं राहिलं. या इमारतीच्या भिंतीदेखील बोलक्या आहेत. माझ्यासाठी लोकशाहीचं मंदिर हे संसदेची जुनी इमारत असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. या कार्यक्रमाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कार्यक्रमात बोलवण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. त्यांनादेखील या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं नाही. त्यामुळे राज्यसभा हद्दपारच केल्याचं दिसत असल्याचंही सुप्रीया सुळे म्हणाल्या.

शरद पवारही अनुपस्थित

देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनावरून सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. संसदेची नवीन इमारत बांधली जात आहे. ही गोष्ट आम्हाला पहिल्यांदा वर्तमानपत्रातून समजली. त्यानंतर इमारतीचं भुमीपुजन झालं, तेव्हाही आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. अशा गोष्टींमध्ये सरकारनं विरोधकांना विश्वासात घेतलं नाही, म्हणून विरोधकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. या संसद भवनाच्या तयारीत विरोधीपक्षातील नेत्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं, असंही ते म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले
Ashish Shelar PC : भ्रष्ट आणि अकार्यक्षण ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक
Devendra Fadnavis On Voting : माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर
Rohit Pawar Pimpari Chinchwad : एका मताला ५००० चा भाव, मतदानाच्यादिवशी भाजपवर गंभीर आरोप
Ambadas Danve on BJP : भाजपला पैशांची मस्ती, उन्माद, संभाजीनगरात दानवेंच्या भावाचा संताप अनावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Election Commission Voter Ink: बोटावरील शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
Embed widget