एक्स्प्लोर

Ajit Pawar : चांगलं काम  होताना काही लोक मिठाचा खडा टाकतात; अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल   

Ajit Pawar : "केंद्र सरकार पीक कर्ज  घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्याजाचे दोन टक्के सरकार भरत होते. पंरतु, आता केंद्र सरकारने हात वर केले आहेत. आता त्याचा बोजा शेतकऱ्यांवर पडणार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलीय.

पुणे : बारामती शहरात काही झालं तरी पाणी शिरणार नाही अशी व्यवस्था केली आहे. हे करताना थोडा त्रास झाला, काहींची नाराजी ओढवावी लागली. भाजपचे सरकार असताना पाण्याचा निर्णय घेतला होता.  त्याचा फटका आपल्याला बसला. पंरतु आपलं सरकार येताच तो निर्णय बदलला. त्यामुळे आपल्याला परत पाणी मिळाले. चांगलं काम  होताना काही लोक मिठाचा खडा टाकतात, असा हल्लोबल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी केलाय. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावात कृष्णाली ऍग्रो एजन्सीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते.  

अजित पवार म्हणाले, "पालखी मार्ग करताना शेतकऱ्यांना पैसे मिळतात. परंतु, जुने रस्ते रुंदीकरण करताना पैसे मिळत नाहीत.  शेतकऱ्यांच्या मुलांना या पुढं व्यापारी दृष्टीकोन ठेऊन काम करावं लागणार आहे. कोरोना काळात जीडीपी ढासळला. परंतु, कोरोनाच्या काळात इतरांच्या तुलनेत शेतीचे  नुकसान कमी झालं. आता शेती करताना आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे . आदी लोक नोकरीला प्राधान्य देत होते. परंतु, आता कष्ट केले तर शेतीत फायदा होत आहे. 

"केंद्र सरकार पीक कर्ज  घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्याजाचे दोन टक्के सरकार भरत होते. पंरतु, आता केंद्र सरकारने हात वर केले आहेत. आता त्याचा बोजा शेतकऱ्यांवर पडणार आहे. शेतकऱ्यांनी पैसे घेण्याआधी केंद्र सरकारने सांगायला पाहिजे होतं, आम्ही व्याज देणार नाही. आता त्यावर राज्याचे सहकार मंत्री काय भूमिका घेणार हे बघावं लागणार आहे. भाजप सरकारने बंद पाईपलाईनद्वारे पाणी नेण्याचा निर्णय घेतला. वीरच्या वरच्या तीन धरणाचे पाणी वीर धरणात येतं. येत्या चार-पाच दिवसांत राज्याच्या अनेक भागात पाऊस पडेल अस हवामान खात्याने सांगितले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.  

अजित पवार म्हणाले, "बारामती शहरात अस्थिरीकरण केल्यानंतर बारामतीतील अशोक नगरच्या भागात पणी कमी पडले अशी माहिती मिळत आहे. कॅनॉलमध्ये ज्या ठिकाणी वळणे असतात त्या ठिकाणी पाणी पाजरते म्हणून त्या ठिकाणी लायनींग करायचं होतं. अस्थिरीकरनाच्या मुद्यावर काही बाहेरचे नेते आले आणि नीट माहिती न घेता बोलू लागले. त्यामुळे आता सगळ्या ठिकाणी लायनींगचे काम होणार नाही. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा पाठिंबा असेल त्याच ठिकाणी लायनींगचे काम केलं जाईल. 30 वर्षांपासून काम करत आहे. काही लोक वातावरण खराब करत आहेत, त्यांना साथ देऊ नका. लोकांच्या हिताचेच निर्णय घेतले जातील."  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget