एक्स्प्लोर
Advertisement
यंदा पायी दिंडी सोहळा रद्द! वारकरी संप्रदाय अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी जाणारा पायी दिंडी सोहळा होणार यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : कोरोनाच्या महासंकटामुळे यंदा आषाढी यात्रा होणार का हा सर्वात मोठा प्रश्न सध्या वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला होता. आषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमधे पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक पार पडली. यावेळी आळंदी आणि देहुवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी. किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात, अशी भूमिका मांडण्यात आली.
कोरोना संकटामुळे गेल्या काही दिवसांपासून आषाढी वारीचं काय होणार? हा प्रश्न सर्व वारकऱ्यांना पडला होता. यावर अखेर आज निर्णय घेण्यात आला. आळंदी आणि देहुच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहे. पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या हे नंतर ठरलवे जाईल. देहु आणि आळंदीहुन पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झाल्याने यंदा पायी दिंडी सोहळा होणार नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतच्या बैठकीत आषाढी वारी कशी पार पाडायची? आळंदी आणि देहुहुन पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या? याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहु आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भुमिका मांडल्या. यावेळी वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भुमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. त्यानंतर आळंदी आणि देहुवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भूमिका मांडण्यात आली.
यंदाची आषाढी यात्रा 'या' पद्धतीने होण्याची शक्यता, 'एबीपी माझा'ला सूत्रांची माहिती
बैठकीतील महत्वाचे मुद्दे :
- आळंदी आणि देहु मंदिरातुन प्रस्थान ठरलेल्या तारखेलाच होईल. मात्र, पादुका मंदिरातच राहतील आणि त्यानंतरचे सोहळे मंदिरातच पार पडतील.
- दशमीला पादुका पंढरपूरला नेण्यात येतील. त्या हेलिकॉप्टर, विमान किंवा वाहनाने न्यायच्या हे त्यावेळी ठरलं जाईल.
- या पादुकांसोबत मोजके सेवेकरी, मानकरी आणि मंदिर देवस्थानचे पदाधिकारी असतील.
- वारकऱ्यांच्या एका प्रतिनिधीचा देखील त्याच्या नावाची चिठ्ठी काढून समावेश केला जावा अशी आमची मागणी आहे.
- याआधी देखील काही वेळा पायी वारीमधे खंड पडलेले आहेत.
- तुकाराम महाराजांच्या आठव्या वंशजांच्या काळात एके वर्षी पायी दिंडी रद्द करावा लागल्याचा उल्लेख आहे.
- त्याचबरोबर 1920 च्या दशकात आणि 1945 साली देखील पायी दिंडी सोहळा रद्द करावा लागला होता.
- संतांनी विठ्ठलाचं रुप सगुण आणि निर्गुण स्वरुपात पाहण्याची शिकवण दिलीय. त्याचं अनुसरुन करुन यावर्षी वारकऱ्यांनी घरुनच विठ्ठलाचं दर्शन घ्यावं.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement