एक्स्प्लोर

यंदाची आषाढी यात्रा 'या' पद्धतीने होण्याची शक्यता, 'एबीपी माझा'ला सूत्रांची माहिती

संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यांनी यंदा पायी पालखी सोहळे न काढण्याचा निर्णय घेतला आहे. संत नामदेवांची पालखी पंढरपूर येथेच असल्याने प्रश्न फक्त संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याबाबत उरला आहे.

पंढरपूर : आषाढी यात्रेबाबत सध्या राज्यभर उलटसुलट अंदाज वर्तवले जात असताना यंदा कोरोनाच्या संकटामुळे मानाच्या 7 पालखी सोहळ्यांना थेट वाहनातून पादुका पंढरपूरकडे आणाव्या लागणार आहेत. यापूर्वीच संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यांनी यंदा पायी पालखी सोहळे न काढण्याचा निर्णय घेतला आहे. संत नामदेवांची पालखी पंढरपूर येथेच असल्याने प्रश्न फक्त संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याबाबत उरला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पालखी सोहळ्याच्या मानकऱ्यांसोबत यापूर्वीच चर्चा केली आहे. आता येत्या 29 मे रोजी अजित पवार सोलापूर आणि साताऱ्याच्या पालकमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय देणार आहेत. मात्र एबीपी माझाकडे मिळालेल्या माहितीनुसार, 1- सर्व सात मानाच्या पालख्यांना वाहनातूनच पंढरपूरकडे दशमी दिवशी सकाळी निघावे लागणार आहे. यात मोजक्या लोकांसह प्रस्थान करून पालखीला त्याच ठिकाणी ठेवावी. येथे संपूर्ण पालखी मार्गावर होणारे विधी व नित्योपचार त्याच ठिकाणी करावेत.

2 - दशमी दिवशी म्हणजे 30 जून रोजी या पालखीतील पादुका एका वाहनातून पंढरपूरकडे आणाव्यात. यावेळी त्यांच्यासोबत केवळ 4 ते 5 जणांना परवानगी दिली जाईल.

3 - आषाढी एकादशीला म्हणजे 1 जुलै रोजी या मानकऱ्यांनी पादुकांना चंद्रभागा स्नान घालून नागरप्रदक्षिणे ऐवजी विठ्ठल मंदिराची प्रदक्षिणा करावी. द्वादशीला म्हणजे 2 जुलै रोजी या पादुका मानकऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत मंदिरात आणून देवाचा नैवेद्य दाखवावा आणि याच दिवशी पौर्णिमेला होणारी देव व संत भेटीचा कार्यक्रम उरकून पुन्हा आपल्या गावाकडे वाहनातून परतावे.

4 - आषाढीसाठी राज्यातील कोणत्याही वारकऱ्यांनी पंढरपूरकडे येऊ नये यासाठी 25 जून ते 5 जुलै याकाळात शहरात संपूर्ण नाकाबंदी करण्याचा विचार असून केवळ आपत्कालीन यंत्रणा आणि शासनाने मंजुरी दिलेल्या मानाच्या पालख्या यांनाच प्रवेश दिला जाईल. एकादशी दिवशी शहरात असलेल्या नागरिक आणि भाविकांनीही मंदिर व चंद्रभागा परिसरात येऊ नये यासाठी याभागात 144 कलम जाहीर करावे. यामुळे कोणतीही गर्दी न होता सोहळा संपन्न होईल आणि कोरोनाचा धोकाही राहणार नाही.

5 - आषाढी एकादशीची शासकीय महापूजा प्रथेप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक करतील. यावेळीही मंदिरात समितीचे अध्यक्ष , कार्यकारी अधिकारी आणि 10 पुजारी याशिवाय मुख्यमंत्री दाम्पत्य आणि त्यांच्यासोबत 5 जणांनाच परवानगी दिली जाणार आहे. ज्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या राजशिष्ठाचाराची गर्दी होणार नाही.

सध्या सोलापूर शहरासह जिल्ह्यातही कोरोनाची साथ पसरू लागली आहे. दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत जात असल्याने संपूर्ण प्रशासन कोरोनाच्या लढ्यात व्यस्त आहे. अशावेळी परंपरा जपताना समाजाच्या आरोग्याला बाधा होण्याचे कारण वारकरी कधीही होणार नाहीत. यातूनच कोरोनाचा धोका कमीतकमी करण्यासाठी या मॉडेलवर सरकार गांभीर्याने विचार करीत आहे .

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2026 | शुक्रवार
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
Loan vs Investment : कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
Share Market : ट्रम्प यांच्या वेटिंगमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
Embed widget