एक्स्प्लोर

Prithviraj Chavan: प्रकाश आंबेडकरांनी मतांचं विभाजन करु नये, उद्या खरोखरच संविधान बदललं तर जबाबदार कोण? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

Maharashtra Politics: आजही प्रकाश आंबेडकरांसाठी मविआचे दरवाजे उघडे आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना हवा तो निर्णय घ्यावा. पृथ्वीराज चव्हाणांकडून वंचितला मविआसोबत येण्याची साद. प्रकाश आंबेडकर यावर काय बोलणार, हे आता पाहावे लागेल.

मुंबई: लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या मतांचं विभाजन टाळलं तर मोदींचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे मविआकडून विरोधी पक्षातील मतांचे विभाजन टाळण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही या गोष्टीचा विचार करावा. जेणेकरुन विरोधकांमधील मतांमध्ये फूट पडणार नाहीत. अन्यथा उद्या या गोष्टीमुळे भाजपचा (BJP) विजय झाला आणि संविधान खरोखरच बदलले तर त्यासाठी जबाबदार कोण असेल, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रकाश आंबेडकर यांना विचारला. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचितने मविआसोबत येण्याच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करावा, अशी साद प्रकाश आंबेडकर यांना घातली. वंचित आणि एमआयएम सारख्या पक्षांमुळे विरोधकांची मतं विभागली जातात. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात नऊ ठिकाणी वंचितमुळे भाजपचे अतिरिक्त उमेदवार निवडून आले. मविआ आणि वंचितची चर्चा सुरु असताना आमची आनंदराज आंबेडकर यांच्याशीही चर्चा झाली होती. ते म्हणाले  होते की, अमरावतीची जागा मला द्या, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. मात्र, त्यामुळे आंबेडकर कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाला असता. त्यामुळे आम्ही आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत गेलो नाही. आता प्रकाश आंबेडकर यांनी मतांचे विभाजन होऊन देऊ नये. नंतर संविधान बदलले तर त्याला जबाबदार कोण? आता प्रकाश आंबेडकर यांना जो निर्णय घ्यायचा आहे, तो घेऊ द्या. मात्र, आजही आमच्याकडून त्यांना सोबत येण्याचा प्रस्ताव आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

साताऱ्यात काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास मी लढण्यासाठी तयार- पृथ्वीराज चव्हाण

सातारा लोकसभा मतदारसंघ आणि राज्यातील इतर लोकसभेच्या जागांमध्ये फरक आहे. साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. शरद पवार गटाकडून याठिकाणी कोण लढू शकेल, यासाठी चाचणी सुरु आहे. या जागेसंदर्भात काही लोक शरद पवार साहेबांना भेटले. पवार साहेब त्याबाबत निर्णय घेतील. यासंदर्भात आमच्यात थोडीफार चर्चा झाली आहे. मला माझ्या पक्षाकडून संधी मिळाली तर मी साताऱ्यातून लढायला तयार आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी मविआच्या जागावाटपाबाबत भाष्य केले. राज्यातील 48 पैकी 45 जागांवर आमचे एकमत झाले आहे. त्यानुसार तिन्ही पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. सध्या एक-दोन जागांवर चर्चा सुरु आहे. भिवंडीच्या जागेवरील उमेदवार जाहीर झाला असेल तर त्याबाबत वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करुन निर्णय घेतला असेल. काँग्रेस आणि शिवसेनेत एक-दोन जागांबाबत मतभेद आहेत. मात्र, त्याबाबत लवकरच निर्णय होईल. सांगलीत आमचे स्थानिक कार्यकर्ते  त्या मतदारसंघात आक्रमकपणे विचार व्यक्त करत आहेत. मात्र, आमच्यात एक समन्वय समिती आहे. ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेशी चर्चा करुन प्रश्न सोडवत असते. त्यामुळेच काही निर्णय झाला तर तो समन्वय समितीचा निर्णय असेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा

लोकसभा निवडणुकीतील वंचित फॅक्टरविषयी शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
Congress : मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget