Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
सध्याच्या निवडणुकांमध्ये अनेकांना वाटतं शेवटच्या दिवशी येऊन पैसे वाटलं की सर्व होतं. मात्र तसं नाही जनतेचे प्रश्न समजण्यासाठी जनतेत जाव लागतं, डॅडींनी आम्हा दोघींसाठी प्रचारात समान वेळ दिला. डॅडींना माणनारा मोठा वर्ग आहे. लोक आपुलकीने भेटल्यावर विचारतात विश्वास आहे लोकं साथ देतील असा विश्वास योगिता गवळींनी व्यक्त केला त्यांच्याशी बातचीत केली आहे.
शाई पुसू नये, आयोगाचं आवाहन
मतदान केल्यानंतर अनेकांनी त्यांच्या बोटावरची शाई पुसली जात असल्याची तक्रार केली. त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी अखेर निवडणूक आयोगाला माध्यमांसमोर यावं लागलं. बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे गैरकृत्य असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचं आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं.
मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात दावा केला जात आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे दुबार मतदान होण्याची शक्यता वर्तवली गेली. यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील शाई प्रकरणावरुन हल्लाबोल केला.
शाई पुसू नये, आयोगाचं आवाहन
बोटावरील शाई पुसली जात असल्याचे आरोप झाल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगानं 19 आणि 28 नोव्हेंबर 2011 याविषयी आदेश काढला होता. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्करचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल अशा पद्धतीनं, तसंच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वीदेखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचं गैरकृत्य करू नये.
महत्त्वाच्या बातम्या























