एक्स्प्लोर

Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीतील वंचित फॅक्टरविषयी शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...

Maharashtra Politics: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांमुळे प्रस्थापित राजकीय पक्षांना तितकासा फटका बसणार नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. वंचित फॅक्टर यंदा तितकासा प्रभावी ठरणार नाही.

नागपूर: गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी-एमआयएम युतीने अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या संख्येने मते घेतली होती. या मतविभागणीमुळे राज्यातील अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते वंचित (VBA) फॅक्टरविषयी सावध आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा तितकासा प्रभाव जाणवणार नाही, असे भाकीत शरद पवार यांनी वर्तविले आहे. ते मंगळवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी शरद पवार यांना वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो, याविषयी विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना शरद पवारांनी म्हटले की, गेल्यावेळेला वंचित आघाडीबरोबर अल्पसंख्याक समाज आणि त्यांचे नेते होते. आता त्यांच्यासोबत अल्पसंख्याक नेते नाहीत. त्यामुळे वंचितबाबत यंदा गेल्यावेळसारखा निकाल येईल, असे वाटत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की, अल्पसंख्याक समाज कोणाला विजयी करायचे आहे, यापेक्षा कोणाला पराभूत करायचे आहे, याचा जास्त विचार करतो. यंदा मात्र वेगळा मूड आहे. भाजपला पराभूत करु शकणाऱ्या उमेदवारालाच मतदान करण्याचा लोकांचा मूड आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. यावर आता प्रकाश आंबेडकर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल. 

औरंगाबादचा जलील पॅटर्न महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होणार? प्रकाश आंबेडकर माझा कट्टावर काय म्हणाले?

आढळराव पाटलांच्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर

शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शरद पवार यांच्याविषयी अलीकडेच एक वक्तव्य केले होते. आता शरद पवार यांच्या नावाने मतं मागण्याचे दिवस गेले, असे आढळरावांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता शरद पवार यांनी म्हटले की, जेव्हा मतदान होईल आणि निकाल येईल तेव्हा अमोल कोल्हे विजयी झालेले असतील. तेव्हा सगळं काही स्पष्ट होईल, असे शरद पवार यांनी म्हटले.  सातारची जागा आम्ही 100 टक्के जिंकू. राष्ट्रवादी काँग्रेसकडे तीन चांगले उमेदवार असल्याचा दावाही शरद पवार यांनी केला.

आणखी वाचा

शरद पवार संपले म्हणणारे विरोधी पक्षात बसले, आता ते 'डेप्युटी' आहेत; पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा घणाघात, वळसे पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न
आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा घणाघात, वळसे पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
भाजपाने 12 ट्रॅव्हल्स बुकिंग केल्या; विधानपरिषदेची उमेदवारी भरताच मतदारांना पर्यटनासाठी नेलं, भंडाऱ्यात राजकीय सामना
भाजपाने 12 ट्रॅव्हल्स बुकिंग केल्या; विधानपरिषदेची उमेदवारी भरताच मतदारांना पर्यटनासाठी नेलं, भंडाऱ्यात राजकीय सामना

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget