एक्स्प्लोर

Sharad Pawar : अजित पवारांना त्यावेळचं राजकारण कळलं नाही; 2014 साली भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar Reply To Ajit Pawar : त्यावेळी राजकारणाचा भाग म्हणून भाजपला पाठिंबा देण्याचं बोललो असलो तरी आम्ही आमचा रस्ता मात्र सोडला नाही असं शरद पवार म्हणाले. 

जालना : शिवसेना आणि भाजपला आम्हाला एकत्र येऊ द्यायचं नव्हतं, त्यासाठी 2014 च्या निवडणुकीत आम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला, पण अजित पवारांना (Ajit Pawar) राजकारणातल्या काही गोष्टी कळाळेल्या नाहीत असा टोला शरद पवारांनी (Sharad Pawar) लगावला. त्यावेळी भाजपला पाठिंबा देण्याची गोष्ट जरूर बोललो असेल, पण तसं काही केलं नाही, आम्ही आमचा रस्ता कधी सोडला नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. जालन्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी ही माहिती दिली. 

बोललो जरूर, पण तसं केलं नाही

अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर शरद पवार म्हणाले की, सन 2014 साली तुम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची सुरुवात तेव्हापासून झाली असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, त्यांना कळलं नाही ते असं आहे, आम्हाला त्यावेळी काहीही झालं तरी सेना आणि भाजप एकत्र येऊ द्यायचं नव्हतं, आणि ते एकत्र येऊ न देण्यासाठी मी जरूर काही गोष्टी बोललो. शेवटी आम्ही तसं केलं का हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

आम्ही आमचा रस्ता सोडला नाही

शरद पवार म्हणाले की, भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांच्याळी एका उद्योगपतीच्या घरी भेट झाल्याचा दावा अजित पवारांनी केला होता. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. तेम म्हणाले की, अशा चर्चा होत असतात. शेवटी निर्णय महत्वाचा असतो. निर्णय काय तर मी भाजपबरोबर काही गेलो नाही. उद्या तसं कुणी सुचवलं, तुम्हीही सुचवू शकता. सुचवलं म्हणजे स्वीकारलं असं होत नाही. ही चर्चा अशा वेगवेगळ्या विषयावरही होत असेल. पण अंतिम निर्णय काय हा महत्त्वाचा आहे आणि अंतिम निर्णय मी सांगितला. आम्ही आमचा रस्ता सोडलेला नाही. 

अजित पवारांचा तो दावा खोटा

1989 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी अजित पवारांना उमेदवारी द्या अशी काही नेत्यांनी मागणी केली होती. त्यावेळी अजितला दिल्लीला जाऊ द्या, मी काटेवाडीला जातो शेती करायला असं शरद पवारांनी म्हटल्याचा दावा अजित पवारांनी केला होता. तो दावा खोटा असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. 

मला प्रश्न विचारण्यापेक्षा गेल्या दहा वर्षांत मोदींनी काय केलं ते सांगावं

मराठवाड्याचा विकास महाविकास आघाडीच्या काळात रखडला असं नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्षात काय केलं ते सांगावं. जे सत्तेत नाहीत त्यांनी विकास रखडवला असं सांगण्यात काय अर्थ आहे. अमित शहा म्हणतात गेल्या दहा वर्षात शरद पवारांनी काय केलं याचा हिशोब द्यावा.  2014 ते 2024 मध्ये ते सत्तेवर आहेत, मी नाही. मी विरोधात आहे आणि ते हिशोब माझ्याकडून मागतात, त्यांची जबाबदारी ते सांगत नाहीत. 

सुरुवातीच्या निवडणुकीमध्ये नेतृत्व करणारी माणसांची राजकीय उंची फार होती. त्यावेळेस त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा विचार गांभीर्याने घ्यायची. आज ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्यांचा 60 ते  70 टक्के अन्य पक्षाच्या नेतृत्वावरती विचारावर हल्ला करणे एवढा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे असं शरद पवार म्हणाले. 

पैशाच्या जोरावर निवडणूक यंत्रणा हाती घेतात

शरद पवार म्हणाले की, माझ्या पहिल्या लोकसभा निवडणुकीचा खर्च चार लाख रुपये होता आणि 56 वर्षांपूर्वी विधानसभेची निवडणूक लढवली तेव्हा माझा खर्च 11 ते 12 हजाराच्या आसपास होता. आता सगळे चित्र बदललेलं आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे ते कोणत्याही मार्गाने रिसोर्सेस उभा करतात आणि त्या ताकदीवर निवडणूक यंत्रणा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतात असं दिसते.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
Sangram Jagtap: 'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप
'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप
Sunetra Pawar On Chakan MIDC Pune: चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Manoj Jarange: 'बावनकुळे साहेब तुम्ही मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणून तुमच्यावर रडकुंडीला येण्याची वेळ; एकदा माफ केलं, इथून पुढे तुमच्यावर व्यंग करणार नाही' : मनोज जरांगे पाटील
'बावनकुळे साहेब तुम्ही व्यथित झालात, आईचं नाव घेतलं याचं आम्हालाही वाईट वाटलं; एकदा माफ केलं, इथून पुढे तुमच्यावर व्यंग करणार नाही; मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Embed widget