एक्स्प्लोर

Shahaji Bapu Patil on Ramdas Kadam: रामदासभाईंनी केलेल्या आरोपात तथ्य, बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाविषयी वक्तव्यावर शहाजीबापूंकडून पाठराखण; म्हणाले, 'त्या काळात अनेक ठिकाणी...'

Shahaji Bapu Patil on Ramdas Kadam: रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांवर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Shahaji Bapu Patil on Ramdas Kadam: शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांवर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. रामदास कदम यांनी "बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव दोन दिवस मातोश्रीमध्ये ठेवण्यात आलं आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले," असा आरोप केला होता. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

या प्रकरणावर आता माजी आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी प्रतिक्रिया देत रामदास कदम यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळत आहे. "त्या काळात मी काँग्रेसमध्ये कार्यरत होतो, मात्र ग्रामीण भागात बाळासाहेबांच्या निधनासंबंधी अशाच चर्चा सुरू होत्या," असं स्पष्ट करत शहाजी बापूंनी रामदास कदमांच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला आहे. 

Shahaji Bapu Patil on Ramdas Kadam: 'त्या' काळात अनेक ठिकाणी चर्चा

माढा तालुक्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आले असताना शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,  "त्या काळात अनेक ठिकाणी चर्चा होती की, बाळासाहेब ठाकरे यांचे निधन नेमकं कधी झाले? दोन दिवस घोषणा का केली जात नाही? काहींनी अंत्यविधीच्या तयारीसंदर्भात अंदाज मांडले, तर काहींनी वेगळ्याच शक्यता बोलून दाखवल्या. रामदास कदम हे शिवसेनेचे जुने नेते असून त्यांनी उपस्थित केलेल्या शंकेमध्ये तथ्य असू शकेल," असे त्यांनी म्हटले. 

Shahaji Bapu Patil on Anil Parab: अनिल परबांच्या आरोपात तथ्य नाही

1993 साली रामदास कदम यांची पत्नी ज्योती कदम यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला. याबाबत विचारले असता शहाजी बापू म्हणाले की, आरोपाला काहीतरी आरोप करून जोडायचे म्हणून परब यांनी कदम यांच्यावर हा आरोपाचा पदर जोडला आहे. मात्र, रामदास भाई यांच्या पत्नीने माध्यमांसमोर येऊन वास्तव सांगितल्याने परब यांच्या आरोपात काही तथ्य नाही, असे त्यांनी म्हटले. 

Shahaji Bapu Patil on Elections: महायुती एकत्र निवडणूक लढणार

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच संदर्भात बोलताना शहाजी बापूंनी स्पष्ट केलं की, "महायुती म्हणून शिवसेना (शिंदे गट), भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा 

Ramdas Kadam : बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाविषयी वादग्रस्त वक्तव्य बुमरँग, शिंदे गटातील सगळ्यांनी हात वर केले, आता रामदास कदमांची सारवासारव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Embed widget