एक्स्प्लोर

Sanjay Raut on Raj Thackeray and Uddhav Thackeray : कदाचित राज ठाकरे-उद्धव ठाकरे फोनवर बोलले असतील; संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, पडद्यामागे गुप्त घडामोडी?

Sanjay Raut on Raj Thackeray and Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत. त्यामुळे युती करण्याची इच्छा असेल तर दोन भावांनी बोलले पाहिजे, असे अमित ठाकरे यांनी म्हटले होते.

Sanjay Raut on Raj Thackeray and Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर बोलताना राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत. त्यामुळे युती करण्याची इच्छा असेल तर दोन भावांनी बोलले पाहिजे. त्यांनी एकमेकांना फोन करावा. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही, असे वक्तव्य केले. तर गुरुवारी नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.     

संजय राऊत म्हणाले की, आम्ही सकारात्मक आहोत, म्हणून खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. आम्ही सकारात्मक आहोत. माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत. त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत. माननीय उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत. अत्यंत सकारात्मक असल्यामुळे जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाले असेल तर त्यात चिंतेचे कारण काय? असे त्यांनी म्हटले. 

कदाचित फोन झाले सुद्धा असतील

अमित ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता अमित ठाकरे म्हणाले की, ही जी सगळी मुलं आहेत, त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे दोन भाऊ आहेत. मी त्या दोघांनाही पाहिले आहे. दहा मिनिटांनी मी राज ठाकरेंना फोन करतोय किंवा उद्धव ठाकरे यांना फोन करतोय, असे सोशल मीडियावर सांगून कोणी एकमेकांना फोन करत नाही. कदाचित फोन झाले सुद्धा असतील, असे त्यांनी म्हटले आहे.  

तुम्हाला फळ दिसेल

संजय राऊत पुढे म्हणाले की, मी वारंवार सांगतोय की, तुम्हाला फळ दिसण्याशी मतलब आहे ना. तुम्हाला फळ दिसेल, फळ झाडावर यायला आधी बी लावावे लागते, मग पाणी घालावे लागते, मग रोपट वाढवावं लागतं, मग फांद्या येतात, अशा अनेक प्रक्रियेतून फळ येते. त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. मला पूर्ण खात्री आहे की, काही दिवसांनी तुम्ही म्हणाल झाडाला खूपच फळं आलेली आहेत. इतक्या लवकर फळं आली कशी? पण फळं येतील, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. 

आमच्यासाठी ते कॅफे नाही तर दुसरे घरच 

अमित ठाकरे यांनी तुम्हाला शिवतीर्थ कॅफेटेरियावर येण्याचे आमंत्रण दिले आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलेले आहे. गोड मुलगा आहे तो. जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे. त्याची विधाने देखील फार गोड आहेत. त्याच्या मनामध्ये ज्या भावना आहेत, त्या भावनेचे मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो. त्यांची विधाने आजकाल फार चांगली आहेत. आदित्य देखील भूमिका फार उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवे आहे? मी कॅफेमध्ये नाही तर मी घरी जाईल. आमच्यासाठी ते कॅफे नाही तर दुसरे घरच आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.  

आणखी वाचा

Uddhav Thackeray and Raj Thackeray : ठाकरे गट-मनसे एकत्र येण्याचा आणखी एक ठोस संकेत, संदीप देशपांडेंच्या हातात राऊतांचं पुस्तक; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Actress Lives In 100 Year Old Bungalow: 100 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यात राहते सैफ अली खानची 'ही' हिरोईन; शाहरुखच्या मन्नतपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर हिचं घर!
100 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यात राहते सैफची 'ही' हिरोईन; शाहरुखच्या मन्नतपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर हिचं घर!
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Montha Cyclone Maharashtra Weather: मोंथा चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र खवळला, उरणमधील बोट समुद्रात भरकटली, 50 खलाशांशी संपर्क तुटला
मोंथा चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र खवळला, उरणची बोट समुद्रात भरकटली, 50 खलाशांशी संपर्क तुटला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mission BMC: ठाकरे गटाचा नवा डाव, 'नवीन चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य' देत जुन्यांना धक्का?
Maha Local Polls: 'जिथं जुळणार नाही, तिथं मैत्रीपूर्ण लढत', Eknath Shinde यांचे संकेत
Sillod Voter List Fraud : सिल्लोडमध्ये मतदार यादीत घोळ? बंद घरात तब्बल ५१० मतदार
Bachchu Kadu Morcha: 'मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करू', बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा
Ravikant Tupkar : 'आमदारच नव्हे, दोन-चार मंत्र्यांना कापा',तुपकरांचे चिथावणीखोर वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Actress Lives In 100 Year Old Bungalow: 100 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यात राहते सैफ अली खानची 'ही' हिरोईन; शाहरुखच्या मन्नतपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर हिचं घर!
100 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यात राहते सैफची 'ही' हिरोईन; शाहरुखच्या मन्नतपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर हिचं घर!
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Montha Cyclone Maharashtra Weather: मोंथा चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र खवळला, उरणमधील बोट समुद्रात भरकटली, 50 खलाशांशी संपर्क तुटला
मोंथा चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र खवळला, उरणची बोट समुद्रात भरकटली, 50 खलाशांशी संपर्क तुटला
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
BMC Election Uddhav Thackeray: BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, 60 पेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाही, नव्या चेहऱ्यांना संधी
BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, 60 पेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाही, नव्या चेहऱ्यांना संधी
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Embed widget