एक्स्प्लोर

Sanjay Raut : मनसे-ठाकरेंच्या युतीवर पुन्हा मोठं भाष्य; राज्यात दोनच समविचारी पक्ष; संजय राऊतांच्या विधानाने उंचावल्या भुवया, नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray -Uddhav Thackeray : राज्यात दोनच समविचारी पक्ष असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आता नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मनसे शिवसेना युतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही पक्षातील नेते युतीबाबत सातत्याने सकारात्मक वक्तव्ये केली जात आहे. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात दोनच समविचारी पक्ष आहेत, दोनच समाविचारे नेते आहेत. एक उद्धव ठाकरे आणि दुसरे राज ठाकरे, असं वक्तव्य संजय राऊतांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सध्याच्या भूमिकेवर राऊतांनी अप्रत्यक्ष टोला लगावलाय का? असा सवाल देखील यामुळे उपस्थित झाला आहे.

सध्या महाराष्ट्रात दोनच समाविचारी पक्ष

राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, शिवसेना ठाकरेंच्या पक्षाच्या बैठकीतल्या बातम्या तुमच्यापर्यंत येत आहेत, त्या चुकीच्या आहेत या विषयावरती पक्षाच्या कोणत्याही बैठकीत चर्चा झालेली नाही. आमच्या पक्षाची मानसिकता आणि भूमिका खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भूमिका ही याबाबतीत अत्यंत पारदर्शक आहे. मराठी माणसाची एकजूट राहावी. मराठी माणसांना एकत्रित राजकारण करावे, ही त्यांचे भूमिका आहे. काल अमित शहा यांच्यासारखे लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला डिवचून गेले, अशा नांग्या मराठी माणसाने एकत्र येऊन ठेचा, ही भूमिका उद्धव ठाकरे यांची आहे. हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे. सध्या महाराष्ट्रात दोनच समविचारी पक्ष आहेत, दोनच समविचारे नेते आहेत, एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे, असंही पुढे राऊतांनी म्हटलं आहे. 

आमच्या सगळ्यांची मानसिकता योग्य दिशेने

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही त्यांना भूतकाळात काय झालं हे विचारणार नाही आणि विचारलेलं सुद्धा नाही. कोण काय बोलत आहे, त्याच्यावरती आमच्या भूमिका ठरणार नाहीत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांमध्ये जो संवाद आहे किंवा जो संवाद होणार आहे, त्याच्यावर भूमिका ठरतात. आता मी काय बोलतो या क्षणी किंवा अन्य कोण काय बोलत असेल मी माझ्या पक्षामधील जी काय मानसिकता आहे ते मी सांगत आहे. आमच्या सगळ्यांची मानसिकता योग्य दिशेने चालली आहे. वीस वर्षांपूर्वी, 19 वर्षांपूर्वी, 18 वर्षांपूर्वी आम्ही सुद्धा काँग्रेस बरोबर नव्हतो. पण, महाराष्ट्राची गरज म्हणून 2019 ला आम्ही एकत्र आलो. भारतीय जनता पक्षाने केलेल्या बेईमानीविरुद्ध आम्ही एकत्र आलो. प्रश्न इतकाच आहे आमच्याबरोबर 25 वर्ष राहिलेले लोक बेईमानी करून निघून गेले, असंही पुढे राऊतांनी म्हटलं आहे.

काँग्रेसने या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत प्रचंड योगदान दिलं

अशा वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही महाराष्ट्रात सरकार बनवलं. संसदेत लोकशाहीत असं सरकार बनवणं हा काही अपराध नाही. देशाच्या राजकारणात आणि महाराष्ट्रात अशी सरकार यापूर्वी बनलेली आहेत. काँग्रेसने या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत प्रचंड योगदान दिलं. भारतीय जनता पक्ष किंवा किंवा त्यांचे तेव्हाचे लोक ब्रिटीशांचे खबरी म्हणून काम करत होते. भगतसिंग यांच्या शहिदांच्या किंवा अनेक प्रमुख शहिदांच्या किंवा क्रांतिकारकांच्या गोपनीय माहिती ब्रिटिशांना पुरवत होते. तेव्हा काँग्रेस गांधी नेहरू सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली या देशात स्वातंत्र्याचा लढा लढत होते. हे सत्य आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आम्ही नव्हतो, काँग्रेस होतं. तेव्हा भाजप नव्हता. काँग्रेस होतं. मतभेद काही असले तरी नरेंद्र मोदी यांनी देश उभं नाही केला. देश हा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वामध्ये गेल्या साठ वर्षात उत्तम प्रकारे उभा केला, असंही पुढे संजय राऊतांनी म्हटलं आहे. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं

व्हिडीओ

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget