एक्स्प्लोर

Raosaheb Danve : भाजपसोबत असताना सर्व निर्णय मातोश्रीवर व्हायचे, आता उद्धव ठाकरेंवर दिल्लीत गांधींच्या दारात उभं राहण्याची वेळ : रावसाहेब दानवे

Raosaheb Danve on Uddhav Thackeray, मुंबई : "देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्लीला गेले. तेव्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, महाराष्ट्र आम्ही दिल्लीच्या इशाऱ्यावर चालू देणार नाही. आता ठाकरे दिल्लीला कशासाठी गेले. आता त्यांनी कोणाचा इशारा घेतला."

Raosaheb Danve on Uddhav Thackeray, मुंबई : "देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्लीला गेले. तेव्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, महाराष्ट्र आम्ही दिल्लीच्या इशाऱ्यावर चालू देणार नाही. आता ठाकरे दिल्लीला कशासाठी गेले. आता त्यांनी कोणाचा इशारा घेतला. आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  कोणाच्या दारात जाऊन उभे राहिले. आमच्या युतीच्या काळात जागा वाटपाचे निर्णय, निवडणुकीची रणनिती प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यापासून आतापर्यंत मातोश्रीवर ठरवले जायचे. आता मातोश्रीतून बाहेर पडत राहुल गांधी आणि खरगेजींच्या दारात उभं राहण्याची पाळी राज्यातील जनतेने आणली आहे", असे भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

उद्धव ठाकरेंनी असंगाशी संगत केली

रावसाहेब दानवे म्हणाले, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकीमध्ये आपण यशस्वी व्हावं. यासाठी विरोधी पक्ष प्रयत्न करत आहेत. पर्वा उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन आले. दिल्लीमध्ये त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेकडे आपण पाहिलं तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की, जनतेच्या न्यायालयात जाऊन आम्ही न्याय मागणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे, जनतेच्या न्यायालयाचा किंवा जनमताचा 2019 अनादर कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी केलाय. उद्धव ठाकरेंनी असंगाशी संगत केली आणि आपलं सरकार बनवलं, असंही रावसाहेब दानवेंनी सांगितलं. 

उद्धव ठाकरेंची भाषा चिथावणी खोर आहे

पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, दिल्लीतील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मी किती चांगला मुख्यमंत्री होतो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सरकारमध्ये काही मित्र असलेल्यांनी लिहिलं की, पूर्ण कालावधीमध्ये उद्धव ठाकरे केवळ एक दिवस मंत्रालयात आले. याचा अर्थ असा की ठाकरे सर्वांत अपयशी मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी जनादेशाची भाषा वापरणे चुकीचे आहे. बांगलादेशच्या परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. उद्धव ठाकरेंनी ते हिंदूत्ववादी असल्याचं वक्तव्य अनेकदा केलं. आताच्या काळात ते करत नाहीत. परंतु त्याठिकाणी बांगलादेशात जी परिस्थिती झाली. ती आपल्या देशात सुद्धा होऊ शकते, अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेले आहे. मला वाटतं ही त्यांची चिथावणी खोर भाषा आहे. ज्या ठिकाणी हिंदूंची हत्या होते, त्याचा निषेध करण्याएवढे तरी त्यांचे हिंदूत्व जागरुक असायला हवे होते. परंतु हे सुद्धा ते दाखवू शकले नाहीत. याचा अर्थ हिंदूत्वापासून उद्धव ठाकरे दूर गेले. हे आपल्या सर्वांच्या लक्षात येतय. त्यांचा तीन दिवसांचा दिल्ली दौरा होता. ते कशासाठी गेले, असा सवालही रावसाहेब दानवे यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Ajit Pawar: वायरमन आला तर माझं नाव सांगा; अजितदादा लाडक्या भावांना म्हणाले, शेतीचं वीजबिल भरू नका

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jai Malokar Akola Case : जय मालोकर याच्या मृत्यूआधीचं CCTV फुटेज माझाच्या हाती! EXCLUSIVEABP Majha Headlines : 06 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar on Sanjay Gaikwad : मर्यादा पाळा! Ajit Pawar यांनी भर सभेत संजय गायकवाडांना झापलंABP Majha Headlines : 05 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Embed widget