Ram Kadam on Raj Thackeray: राज ठाकरेंनी मिसिंग लिंकवरुन देवेंद्र फडणवीसांना फटकारताच राम कदमांचा पलटवार, म्हणाले, 'हिंदीत बोललं तर काय झालं?'
Ram Kadam on Raj Thackeray: राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

Ram Kadam on Raj Thackeray: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील (Mumbai-Pune Expressway) 'मिसिंग लिंक' (Missing Link) प्रकल्पावर झालेल्या दरड कोसळीच्या दुर्घटनेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या हिंदीतील भाषणावर आणि 'बघून घेऊ' या इशाऱ्यावर राज ठाकरेंनी आक्षेप घेतला होता. राज ठाकरेंच्या याच टीकेला आता भाजप (BJP) आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Ram Kadam on Raj Thackeray: नेमकं काय म्हणाले राम कदम?
राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना भाजप आमदार राम कदम म्हणाले की, "अमीर खानच्या लग्नाला गेल्यावर आपण मराठी किती बोललात, मग मुख्यमंत्री यांनी भाषणात दोन ओळी हिंदीत बोललं तर काय झालं. मराठीचा आदर कायमचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची ओळखचं इन्फ्रा मॅन अशी झाली आहे. धडाधड सर्वत्र कामं सुरू आहेत याची धास्ती विरोधकांना आहे. त्यामुळेच विरोधकांकडून टक्केवारीच्या गोष्टी करून बदनाम केलं जात आहे. रामाच्या अस्तित्वावर कायम प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले त्यांचा तो अजेंडा होता. मिसिंग लिंकवरची दरड हा अपघात होता. लोकं चांगल्या कामाबद्दल बोलत नाही.मात्र, त्रुटींबाबत कायम बोलतात," अशी टीका त्यांनी केलीय.
Raj Thackeray on Devendra Fadnavis: "विधानसभा महाराष्ट्राची अन् मुख्यमंत्री हिंदीत कशासाठी बोलतात?: राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर तोफ डागताना विधानसभेतील त्यांच्या भाषेवर बोट ठेवले होते. राज ठाकरे म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत भाषण झालं. मिसिंग लिंक उत्तम दर्जाचे वैगरे बोलले, टीका करणाऱ्यांना बघून घेऊ म्हणतात, मुख्यमंत्री आहे ना तू? मग हिंदीमधून सुरू झाले, कोणासाठी हिंदी बोलला? विधानसभा महाराष्ट्राची. कदाचित आपल्याच पक्षातील वरच्यांना सांगायचे आहे बघून घेईन," अशी टीका त्यांनी केली होती.
फडणवीसांच्या 'राजकारण करू नका' या विधानाचा समाचार घेताना राज ठाकरे पुढे म्हणाले, "वा रे वा, त्याचं राजकारण करू नका म्हणे. त्याच्यावर बोललं की राजकारण? आपण इतकी वर्षे विरोधात असताना काय करत होतात, दुसऱ्यांची सरकारं असताना आपण जी आंदोलनं केली ते राजकारण नव्हतं का? आता स्वतःच्या अंगाशी आल्यावर विरोधक राजकारण करतात, असे तुम्ही बोलताय. एकवेळ मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. लोक मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? पण केंद्र सरकारविरोधात काही बोललं तर देशविरोधी ठरवलं जातं, मिसिंग लिंकबद्दल बोललं तर महाराष्ट्राचा अपमान होतो. मग लोकांनी तुम्हाला प्रश्नच विचारायचे नाहीत का?," असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?























