![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rahul Gandhi: राहुल गांधींनी धर्माच्या मुद्यावरुन मोदींना घेरलं, म्हणाले, मोदींनी समुद्राखाली पूजा केली तेव्हा....
Rahul Gandhi Bhandara speech: मोदीजी म्हणतात मी ओबीसी आहे. देशात मागास वर्गातील किती लोक आहेत? जेवढी तुमची संख्या आहे. तेवढी तुमची भागीदारी नाही. ओबीसींची संख्या ५० टक्के आणि मोठ्या पदावर ओबीसी कुठे आहेत, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
![Rahul Gandhi: राहुल गांधींनी धर्माच्या मुद्यावरुन मोदींना घेरलं, म्हणाले, मोदींनी समुद्राखाली पूजा केली तेव्हा.... Rahul Gandhi slams PM Modi in Rahul Gandhi Bhandara rally Rahul Gandhi: राहुल गांधींनी धर्माच्या मुद्यावरुन मोदींना घेरलं, म्हणाले, मोदींनी समुद्राखाली पूजा केली तेव्हा....](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/13/6ade6e17ffe099d5f850ba68e6a4d6641713012426860954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भंडारा: सध्याच्या काळात प्रसारमाध्यमांकडून केवळ बॉलीवूड स्टार्स, क्रिकेटर्स आणि पंतप्रधान मोदी यांनाच 24 तास दाखवले जाते. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर कोणीही बोलत नाही. नरेंद्र मोदी (PM Modi) घटकेत समुद्राखाली असतात तर घटकेत हवेत विमानातून उडत असतात, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले. ते शनिवारी साकोलीत काँग्रेस पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते.
यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडून सातत्याने सुरु असलेल्या धार्मिक राजकारणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. मोदी कधी समुद्राखाली पूजा करताना दिसतात, त्यावेळी त्यांच्यासोबत पुजारी नसतो. मोदी लष्करी अधिकाऱ्यांसोबत पूजेला बसलेले दिसतात. मग ते सीप्लेनने थेट हवेत जातात. मोदींनी एकप्रकारे ही सगळी थट्टा चालवली आहे. ते विकासाच्या, महागाईच्या आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर कधीच बोलत नाहीत. त्यांच्याकडून 24 तास धर्माचे राजकारण सुरु असते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. आम्ही हरितक्रांती, दूधक्रांती, बँकाचे राष्ट्रीयीकरण करतो, पण मोदी 24 तास धर्मावर बोलतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
देशातील लोक कोरोनाने मरत होते आणि मोदी थाळ्या वाजवायला सांगत होते: राहुल गांधी
कोरोनाच्या काळात देशात मृतदेहांचा खच पडला होता. गंगेत लाखो मृतदेह वाहत होते. पण पंतप्रधान मोदी लोकांना सांगत होते की, थाळ्या वाजवा. नंतर ते म्हणाले मोबाईल फोनच्या टॉर्च लावा. जग या सगळ्याकडे बघत होते. कारण इतर कोणत्याही देशातील पंतप्रधान थाळ्या वाजवत नव्हता, ते लोकांचा जीव वाचवत होते, असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी सोडले. नरेंद्र मोदी घटकेत एक गोष्ट बोलतात, घटकेत दुसरी गोष्ट बोलतात. ते लोकांची दिशाभूल करुन उद्योगपतींच्या खिशात पैसे टाकतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधींच्या सभेत नियोजनाचा अभाव
राहुल गांधी यांच्या भंडाऱ्यातील सभेत नियोजनाचा पार बोऱ्या वाजताना दिसला. या सभेसाठी 50 हजार लोक उपस्थित राहतील, असा अंदाज होता. मात्र, सभेच्या ठिकाणी प्रत्यक्षात लाखाच्या आसपास लोक आले. मात्र, त्याठिकाणी व्यवस्था नसल्यामुळे अनेक लोकांना बाहेरच ताटकळत उभे राहावे लागले.
आणखी वाचा
'आमचं सरकार आल्यास पहिल्याच दिवशी अग्निवीर योजना रद्द करणार; राहुल गांधींची मोठी घोषणा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)