एक्स्प्लोर

Rahul Gandhi: चैत्यभूमीसमोर राहुल गांधींचं सावरकरांच्या गाण्याने स्वागत, बँड पथकाने वाजवली 'जयोस्तुते जयोस्तुतेची' सुरावट

Rahul Gandhi in Mumbai: शिवसेना भवनासमोर (Shivsena Bhavan) खासदार अनिल देसाई यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांचे ढोलताशांच्य गजरात जंगी स्वागत करण्यात आले. राहुल गांधी यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. परंतु, यावेळी घडलेला एक प्रसंग सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा शनिवारी मुंबईत दाखल झाली. यावेळी त्यांनी धारावी येथे जनसमुदायाला संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात इलेक्ट्रोरल बॉड्सच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केले. यानंतर राहुल गांधी हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीच्या दिशेने रवाना झाले. चैत्यभूमीकडे जाताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा ताफा शिवसेना भवनावरुन गेला. यावेळी शिवसेना भवनासमोर (Shivsena Bhavan) खासदार अनिल देसाई यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांचे ढोलताशांच्य गजरात जंगी स्वागत करण्यात आले. राहुल गांधी यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर घडलेला एक प्रसंग सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

राहुल गांधी यांचे शिवसेना भवनासमोर स्वागत करण्यात आले तेव्हा त्याठिकाणी ढोलताशे आणि कॅसिओ वाजवला जात होता. अनिल देसाई यांनी स्वागत केल्यानंतर राहुल गांधी यांचा ताफा शिवसेना भवनाच्या परिसरातून थोडासा पुढे गेला होता. त्यानंतर राहुल गांधी  शिवाजी पार्कपासून चैत्यभूमीकडे जात असताना बँड पथकाने अचानक स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या 'जयोस्तुते जयोस्तुते' या गाण्याची सुरावट वाजवली. काहीवेळ ही सुरावट वाजवून थांबवण्यात आली. इतक्या गोंधळात हा सारा प्रकार अनेकांच्या लक्षात आला नाही. मात्र, नेमक्या राहुल गांधींच्या आगमनावेळी 'जयोस्तुते जयोस्तुते' ही ढोलताशा पथकाकडून अनावधानाने घडलेली कृती होती की ठरवून घडलेला 'योगायोग' होता, याविषयी सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

धारावीतील भाषणात राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी भारत न्याय यात्रा धारावीत आल्यानंतर त्याठिकाणी भाषण केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. एका वर्षाआधी आम्ही भारत यात्रा केली.अनेकांनी म्हटलं की, अनेक ठिकाणी आपण नाही गेलात आणि आम्ही मणिपूर ते मुंबई ही यात्रा केली. ही यात्रा धारावीत समाप्त झाली. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, धारावी स्कीलचं कॅपिटल आहे. सुरुवात आम्ही मणिपूरमधून केली कारण सिव्हिल वॉरचं वातावरण भाजपनं तयार केलंय. यात्रेत त्यामुळेच आम्ही न्याय हा शब्द जोडला. कारण गरीब, शेतकरी, कामगार वर्गासोबत अन्याय होतोय, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर शिवसेनेसाठी श्रद्धेय, पण राहुल गांधींसाठी माफीवीर

राज्यात 2019 साली महाविकास आघाडीचे सरकार आले होते. त्यावेळी शिवसेना आणि काँग्रेस हे दोन भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आले. या काळात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय निघाल्यानंतर त्यांचा उल्लेख माफीवीर असा केला होता. सावरकर यांनी ब्रिटीशांची दयायाचना करुन स्वत:ची सुटका करुन घेतली होती, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. याउलट शिवसेनेसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून स्वातंत्र्यवीर सावरकर हे जाज्वल्य हिंदुत्त्वाचे प्रतीक आहेत. त्यामुळे सावरकर हे शिवसेनेसाठी कायमच वंदनीय राहिले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेच्या गोटात नाराजीचा सूर उमटला होता. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत भारतीयांच्या पायात अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Gaikwad Dance Buldhana : आमदार संजय गायकवाड यांनी मुरळीवर धरला ठेका, दिलखुलास डान्सNew India Co-Oprative Bank :  Hitesh Mehta ने व्यवसायासाठी धर्मेशला 70 कोटी दिल्याची कबुलीTop 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत भारतीयांच्या पायात अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
Indian Immigrant : मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
Nana Patekar Wife In Chhaava Movie: 'छावा'मध्ये 'या' दिग्गज मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीनं साकारलीय 'धाराऊ'; नवऱ्यापासून वेगळी राहते, पण...
'छावा'मध्ये 'या' दिग्गज मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीनं साकारलीय 'धाराऊ'; नवऱ्यापासून वेगळी राहते, पण...
Tuljapur Drugs Case : तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचे मुंबई कनेक्शन; आरोपींना बेड्या, तपासात धक्कादायक माहिती उघड
तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचे मुंबई कनेक्शन; आरोपींना बेड्या, तपासात धक्कादायक माहिती उघड
Delhi stampede: तुम्ही पाहिलं का हो हिला? दिल्लीतील चेंगराचेंगरीत हरवलेल्या पत्नीचा मोबाईलमधला फोटो दाखवत नवऱ्याची विचारणा; अख्खी रात्र मृतदेह पाहिले पण...
तुम्ही पाहिलं का हो हिला? दिल्लीतील चेंगराचेंगरीत हरवलेल्या पत्नीचा मोबाईलमधला फोटो दाखवत नवऱ्याची विचारणा; अख्खी रात्र मृतदेह पाहिले पण...
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.