एक्स्प्लोर

Nitesh Rane : आमचे तीन तीन सिंघम आहेत, तुमच्यासारखे शक्ती कपूर नाहीत; आमदार नितेश राणेंची मविआवर सडकून टीका  

महायुती सरकारमध्ये तीन तीन सिंघम आहेत. तुमच्यासारखे शक्ती कपूर नाहीत. सिंघम आल्यानंतर गुंड पळून जातात, घाबरतात, महाविकास आघाडीमध्ये 100  शक्ती कपूर असल्याची टीका भाजप आमदार नितेश राणेंनी केली आहे.

Maharashtra Politics सिंधुदुर्ग : महायुती सरकारमध्ये आमचे तीन तीन सिंघम आहेत. तुमच्यासारखे शक्ती कपूर नाहीत. सिंघम आल्यानंतर गुंड पळून जातात, घाबरतात. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) 100  शक्ती कपूर आहेत. आमच्या सिंघमने बदलापूरमध्ये काय केलं, हे तुम्ही पाहत असालच. येणाऱ्या काळात देखील तुम्हाला असेच पाहायला मिळेल. असा मिश्किल टोला भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) महाविकास आघाडीला लगावत सडकून टीका केली आहे.    

मोदींना हरवणे म्हणजे हिंदू समाजाला हरवणे, मोदींना हरवला म्हणजे हिंदू राष्ट्राला कमी लेखन. एमआयएमचे ओवेसी यांना आमच्या हिंदू राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवायचा आहे. म्हणून त्यांना मोदींना हरवायचं आहे. मात्र देशातील हिंदू समाज मोदींना कधीच हरू देणार नाही. त्यामुळे आमच्या हिंदुस्तानवर भगवाच फडकणार, पाकिस्तानचे झेंडे लावू देणार नाही. असेही  नितेश राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंकडे शिवसैनिक राहिले किती? कालच्या सभेत अनेक जण उठून जात होते. कालच्या सभेत उद्धव ठाकरे एरंडेल घेऊन बोलत असल्याचे वाटत होत. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या शिवसैनिकांना त्यांचे भाषण ऐकण्यासारखं वाटलं नाही. उद्योगपतींचा जीव जावा, अशी इच्छा व्यक्त करणारे उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे यांना माणुसकी नाही, ते स्वार्थी माणूस आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल कमी बोलणं हे चांगलं नाही तर दिवस वाईट जाईल. असे म्हणत  नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही

स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याच बघाव वाकून अशी नेहमी प्रमाणे महाविकास आघाडीची सवय आहे. म्हणून आमदार बाबा सिद्दिकी याच्या हत्येवरून देवेंद्र फडणवीस यांच्या वर टीका करून घाणेरडे राजकारण केले जात आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री सर्व माहिती घेऊन पूर्णपणे पोलीस यंत्रणा तपास कामासाठी लावली आहे. बाबा सिद्धीकी यांची मर्डर का झाली, याची चौकशी सुरू असून लवकरच याची माहिती समोर येईल. या घटने संदर्भात तत्परतेने तपास करणारं महायुतीचे सरकार आहे.  मात्र एवढी तत्परता महाविकास आघाडीच्या काळात होती का? त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही.

महाविकास आघाडीच्या काळात मातोश्रीच्या वहिनींचा म्हणजेच रश्मी ठाकरे यांचा पोलिसांच्या बदल्या करण्यात किती मोठा हस्तक्षेप होता, हा कधीतरी पुराव्यासहित दाखवावे लागेल.  तेव्हा कंटेनरमधून पैसे बाहेर पाठवलं जाईल. आमच्यावर बदल्या करून पैसे घेण्याच्या आरोप करणाऱ्यांनी स्वतःचा इतिहास तपासावा. असा गंभीर आरोपही आमदार नितेश राणे यांनी केला आहे.  

संजय राऊत सुरक्षित नसते तर एवढं बोलू शकले असते का?

सचिन वाझे वर्षावर मुख्यमंत्री बंगल्यावर राहायचे. वसुली सरकार म्हणून महाविकास आघाडीचं सरकार म्हणून नाव का पडलं? परमवीर सिंग यांनी पत्र लिहून काय काय आरोप केले होते महाविकास आघाडीवर, तेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना अवगत केलेलं असं पत्रात लिहिलेलं आहे. आमच्या सरकारमध्ये कुठल्याही आरोपीला आम्ही सोडत नाही. तिथल्या तिथेच त्या आरोपींना शिक्षा देतो. बदलापूर असेल किंवा बाबा सिद्दिकी यांची केस असेल यामध्ये कुठल्याही आरोपीला आम्ही सोडणार नाही. संजय राऊत सुरक्षित नसते तर एवढं बोलू शकले असते का? एका महिलेवर वारंवार अत्याचार करून देखील शुद्धीत असते का? संजय राऊत आणि त्यांचे कुटुंबीय आज महाराष्ट्रात मोकळा श्वास घेतोय ते फक्त आणि फक्त आमच्या सरकारमुळेच.असेही  नितेश राणे म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
Karnataka Land Controversy : कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray | मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून ठाकरेंचा नवा सूर Special ReportBaba Siddique | बाबा सिद्दीकींची हत्या, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं Special ReportRaj Thackeray On Vidhansabha | राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार Special ReportManoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, जरांगे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
Karnataka Land Controversy : कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
Rahul Gandhi on Maharashtra CM : राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती
Congress : ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
शरद पवारांनी आकाशातसुद्धा राज्य केलं असतं, त्यांच्याएवढा पापी माणूस या जगात कोणी नाही, सदाभाऊ खोतांची टीका
शरद पवारांनी आकाशातसुद्धा राज्य केलं असतं, त्यांच्याएवढा पापी माणूस या जगात कोणी नाही, सदाभाऊ खोतांची टीका
Embed widget