ऑपरेशन सिंदूरवेळी हे लंडनच्या बारमध्ये बसले होते, दाखवू का? भारत-पाक सामन्यावरुन नितेश राणेंचा ठाकरेंवर पलटवार
अडीच वर्षे येथील आमदारांचे वडिल मुख्यमंत्री होते आणि ते मंत्री होते, मोटरबाईकवर इकडे यावं लागतं किती मोठा बालेकिल्ला आहे ना? असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावला.

मुंबई : मत्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंनी (Nitesh Rane) आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वरळी कोळीवाड्यात हजेरी लावली, आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राणेंचा कार्यक्रम होत असल्याने नितेश राणे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे नितेश राणेंनी ठाकरे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला. स्वतः मंत्री, वडील मुख्यमंत्री होते तरी कोळीवाड्याची परिस्थिती बदलवू शकला नाही, 6 हजारांनी निवडून येणं म्हणजे बालेकिल्ला नव्हे. सध्या ते राजकीय व्हेंटिलेटवर आहेत, आम्ही 2029 मध्ये दाखवू, असे म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. तर, भारत-पाकिस्तान (Ind vs Pak) सामन्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्त्युत्तर दिलं.
अडीच वर्षे येथील आमदारांचे वडिल मुख्यमंत्री होते आणि ते मंत्री होते, मोटरबाईकवर इकडे यावं लागतं किती मोठा बालेकिल्ला आहे ना? असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावला. तसेच, उद्धव खानला विचारायचे आहे, विजयी मिरवणुकीत पाकिस्तानचे नारे का, हिरवा गुलाल का? तेव्हा पाकचा राग आला नाही का?. मिरवणुकीत सर तन से जुदा असे नारे दिले गेले त्यांचे राजीनामे घे ना. उद्धव ठाकरेंच्या कालावधीत 5 वर्षे महाविकास आघाडीचं सरकार टिकलं असतं तर पुढचा मुख्यमंत्री मुस्लिम झाला असता, असे म्हणत भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरुन राणेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला.
अस्लम शेखने मिनी पाकिस्तान मालवणीला बनवून ठेवला आहे, सरकारी भाचा आमदार झाला तो सचिन वाझेसोबत बुकी होता. आता, हे भारत पाक मॅचबद्दल बोलतात. जिहादी हृदय सम्राटकडून राष्ट्रभक्तीची गरज नाही. ऑपरेशन सिंदूरवेळी हा लंडनमध्ये बसलेला, तेव्हा लंडनमध्ये कोणत्या बारमध्ये होता हे दाखवू का? तेव्हा तुम्हाला हिंदूत्व का नाही आठवलं? थंड हवा तिथे खात होता, असे म्हणत आशिया चषकातील सामन्यावरुन शिवसेनेनं सुरू केलेल्या आंदोलनावर राणेंनी भाष्य केलं. आदित्य ठाकरे स्वत: बुरख्यात लपून उद्या मॅच बघेल, आवाज पण मॅच करेल. पाकिस्तान जिंदाबाद असे नारे तो लावेल, असे म्हणत नितेश राणेंनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी नक्कल केली. तर, संजय राऊत हा मरीन ड्राईव्हवर तिकीटाचे ब्लॅक करताना सापडेल, असेही त्यांनी म्हटलं.
ऑपरेशन सिंदूरवेळी लंडनमधील बारमध्ये?
उद्धव ठाकरेंकडे महापौर देणं म्हणजे पुढचा महापौर अब्दुल किंवा शेख होणार, घरातली पूजा देखील हे होऊ देणार नाहीत. हिंदू समाजाचे कुंकू पुसले जात होते तेव्हा लंडनवरुन परत यावे असं का वाटलं नाही?. पंतप्रधान यांनी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत, याची लायकी नाही स्वत:च्या वडिलांचे नाव घेण्याची. बाळासाहेब यांना हे कोणत्या नावाने हाक मारायचे, म्हातारा म्हणून हाक मारायचे. हा पाकिस्तानची चाटत बसतो, याच्या ढुंगणावर लाथ मारुन बाळासाहेब यांनी हाकललं असतं, अशी तीव्र शब्दात राणेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला.
अस्लम शेख यांना उपमुख्यमंत्रिपदासाठी शब्द
उपमुख्यमंत्री बनण्यासाठी अस्लम शेख याला उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता. दिशा सालियन प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी हे सर्व केलं होतं, काँग्रेसला सांगून ते अस्लम शेखला उपमुख्यमंत्री करणार होते. स्वतः काडीसारखा झाला आहे, तू नको सांगू. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले आहे. उद्या मतं फुटली तर आदित्यवर पण संशय घेईल. युबीटीच्या खासदारांचे काय भविष्य आहे? पतपेढीच्या वेळी देखील इतके ॲक्टिव्ह नव्हते तेवढे आता ॲक्टिव्ह झाले आहेत. मला आता आमची काळजी वाटते आहे, आमची तब्येत खराब झाली आहे, बघा चांगला डॉक्टर असेल तर.. असा उपरोधिक टोलाही राणेंनी लगावला.
























