एक्स्प्लोर

Jayant Patil: पुणे गुंडांचे महेरघर झालंय, गँगवॉर तर नित्याची बाब, तर व्यवसाय करणेही अशक्य; जयंत पाटलांची सरकारवर सडकून टीका

Maharashtra Winter Session : अंतिम आठवडा प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांची जोरदार बॅटिंग करत टीका केलीय.

Jayant Patil नागपूर : पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणायचे ते आता गुंडांचे माहेरघर झाले आहे. गँगवॉर तर नित्याची बाब झाली आहे. खंडणी प्रथा बळावते आहे. पुण्यात व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. पुण्यात शिक्षण घेणाऱ्या मुलींना पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केली. पोलीस एफआयआर घेत नाहीत. त्या मुलींनी लढा दिला. अनगरमध्ये नगराध्यक्ष पदाच अर्ज भरून दिला नाही. ही कायदा सुव्यवस्थेची अवस्था आहे. बाळासाहेब थोरात यांना उद्देशून आम्हाला नथुराम व्हावे लागेल अशी भाषा वापरली गेली. आपली संतांची परंपरा आहे. खरंतर सभागृहाने बाळासाहेबांच्यापाठी खंबीर उभे राहायला हवे होते. पुण्यातील नवले ब्रीज मृत्यूचा सापळा झालेला आहे. 'ना खाऊंगा ना खाने दूंगा' यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थोडा बदल केला आहे 'मैं नहीं खाऊंगा, पर खाने दूंगा'. अशी शंका येत असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील  (Jayant Patil) यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. विरोधी पक्षाने आणलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी जोरदार बॅटिंग करत टीका केलीय

गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा असे काहीसे या सरकारचे वर्णन करता येईल. सरकारची अधोगती पाहता, 'महाराष्ट्र आता थांबणार नाही' पासून सुरू झालेला प्रवास 'महाराष्ट्रात हे कधी थांबणार' इथपर्यंत येऊन पोहोचला आहे, असेही ते म्हणाले.

Jayant Patil  : किमान एक दिवस तरी विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, हा विदर्भाच्या जनतेचा अवमान

१९५३ साली झालेल्या करारानुसार विदर्भातील जनतेला आम्ही वचन दिलेलं की, विदर्भातील प्रश्न मांडण्यासाठी दरवर्षी सहा आठवड्याचे अधिवेशन घेऊ. आता सहा आठवड्याचे अधिवेशन एक आठवड्यावर आले आहे. त्यात किमान एक दिवस तरी विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली. हा विदर्भाच्या जनतेचा अवमान आहे. असेही जयंतराव पाटील म्हणाले.

Jayant Patil on Maharashtra Government : गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, सरकारचे वर्णन

गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, असे काहीसे वर्णन या सरकारचे करता येईल. सरकारने दिलेलं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे जनतेत प्रचंड रोष आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, महिला सुरक्षितेसाठी 25 हजार महिलांचा पोलिस दलात समावेश करू, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे जाहीरनाम्यात आश्वासन दिले आहे. याची आकडेवारी सरकारने जाहीर करावी. 100 दिवसाचे व्हिजन राहिले बाजूला 2047चे महाराष्ट्र व्हिजन दाखवायचे काम सुरू केले आहे. या डॉक्युमेंटवर जनतेचा अभिप्राय जरूर घ्यावा, ही माझी विनंती आहे. असेही जयंतराव पाटील म्हणाले.

Jayant Patil on PM Modi : मोदी साहेबांच्याच भाषेत सांगायचे तर देशाची अब्रू खाली गेलीय

जुन्या लोकांना आणि जुन्या विचारांना भाजपने केराची टोपली दाखवायला सुरू केली आहे. भाजपात कानामागून आले आणि तिखट झाले ही म्हण खरी ठरत आहे. पाच लाख कॉन्ट्रॅक्टरची सुमारे 90 हजार कोटींची बिले थकली आहेत. माझ्या मतदारसंघातील हर्षद पाटील या तरुण सब कॉन्ट्रॅक्टने आत्महत्या केली. आजपर्यंत जागतिक बँकेकडून सव्वा लाख रुपयांचे कर्ज आपण घेतले आहे. देशातील सर्व राज्यांनी जेवढ कर्ज घेतलं आहे, त्यातले निम्मे कर्ज आपणच घेतले आहे. ओपन मार्केटमधून सुमारे 5 लाख 60 कोटी रुपये कर्ज घेतलं आहे. सिंगापूर देशाकडून सुद्धा कर्ज घेतले आहे. फॉरेन एक्सचेंज मध्ये कर्ज घेतले आहे, हा भार खूप मोठा आहे. त्यात रुपयाची किंमत पडली आहे. मोदी साहेबांच्याच भाषेत सांगायचे तर देशाची अब्रू खाली गेली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की, महाराष्ट्र आता थांबणार नाही. मात्र एका वर्षात लोकांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे महाराष्ट्र आता कर्ज काढण्यासाठी थांबणार नाही असा अर्थ लोकांनी काढायला सुरू केला आहे. मंत्रिमंडळात राजी नाराजी सुरू आहे. एक पक्षच गैरहजर आहे. मग सारवासारव. 'महाराष्ट्र आता थांबणार नाही' पासून सुरू झालेला प्रवास 'महाराष्ट्रात हे कधी थांबणार' इथपर्यंत येऊन पोहोचला आहे.

Jayant Patil: गेल्या दशकात सुमारे 18 लाख नागरिकांनी नागरिकत्व सोडून दिलं. तरी बाकी सब ठीक हैं...!

17 अब्ज डॉलरची गुंतवणूक परदेशी कंपन्यांनी काढून घेतली आहे. गेल्या दशकात सुमारे 18 लाख नागरिकांनी नागरिकत्व सोडून दिलं. तरी बाकी सब ठीक हैं...! असं या सरकारचे झाले आहे. कोल्हापूरच्या चपलांचा आपला ठेवा, आता प्राडा नावाचा ब्रँड त्याच्यावर पैसे कमावणार. येवल्याची पैठणी, सावंतवाडीची खेळणी, विदर्भातील संत्री, सोलापूरी चादर या जपल्या पाहिजेत. पूर्वी अमेरिकेने हळद आणि बासमती तांदूळचे पेटंट घेतले होते. त्यावेळी डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ते लढाई करून पुन्हा मिळवले. त्यांच्याच नेतृत्वाखाली समिती नेमून हा सगळा आपला सांस्कृतिक ठेवा जपावा.

कोल्हापूर प्रमाणे पुण्यालाही खंडपीठ व्हावे अशी मागणी आहे, सरकारने त्यासाठी प्रयत्न करावा. गुंडांना पासपोर्ट, शस्त्र परवाने देऊन पोसले जात आहेत. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी अनेक देवस्थान जमिनींचे घोटाळे बाहेर काढले. त्यांना देण्यात आलेले पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले. बंदुकीचा परवाना रीन्यू करून दिला नाही. त्यांच्यावर १० - १२ जणांनी हल्ला केला. त्यांचे प्राण कसेबसे वाचले. १५ दिवस उलटून गेले तरी आरोपी पकडले गेले नाहीत. पोलिस काय करतायत?

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Keral Local Body Election: डाव्यांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात अन् शशी थरुरांच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच शिरकाव; केरळमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याची चिन्हे!
डाव्यांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात अन् शशी थरुरांच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच शिरकाव; केरळमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याची चिन्हे!
Horoscope Today 15 December 2025 : आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
Dharur News : ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
Embed widget