एक्स्प्लोर

छ. शिवाजी महाराजांनी जो न्याय दिला असता, तसाच न्याय देशमुख कुटुंबाला मिळेल, योगेश कदम यांचा मस्साजोगमध्ये शब्द!

योगेश कदम पहिल्यांदाच मस्साजोग गावात गेल्याने गावकऱ्यांनी संपूर्ण घटनेची माहिती गृहराज्यमंत्र्यांना दिली. आरोपीची गाडी वाशीकडे जात असताना ही माहिती पोलिसांना सांगून देखील याकडे दुर्लक्ष केले गेले.

बीड : जिल्ह्यातील संतोष देशमुख (Santosh deshmukh) हत्याप्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीला सुरुवात झाली असून देखील अद्याप आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांना सापडला नाही. तर, दुसरीकडे आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींची पोलिसांकडून बडखास्त केली जात असल्याचा आरोप देशमुख कुटुबीयांकडून व आमदार सुरेश धस यांच्याकडून होत आहे. त्यामुळे, याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बदली करावी, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही केली जात आहे. त्यातच, आज गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh kadam) यांनी मस्साजोग गावात जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासासंदर्भात देशमुख कुटुंबाशी त्यांनी संवाद साधला. यावेळी, धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची कन्या वैभवी यांनी योगेश कदम यांच्याशी चर्चा करत काही महत्त्वाची माहिती दिली. तसेच, संबंधित प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांचा अद्यापही हस्तक्षेप असल्याचं गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.  

योगेश कदम पहिल्यांदाच मस्साजोग गावात गेल्याने गावकऱ्यांनी संपूर्ण घटनेची माहिती गृहराज्यमंत्र्यांना दिली. आरोपीची गाडी वाशीकडे जात असताना ही माहिती पोलिसांना सांगून देखील याकडे दुर्लक्ष केले गेले. वाशी पोलीस स्टेशनचे पी.आय आणि केजचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांना सह आरोपी केले पाहिजे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. त्यानंतर, अंबाजोगाई च्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करा असे सूचना योगेश कदम दिल्या असून ज्यांच्यावर शंका आहे त्यां अधिकाऱ्यांना माफ केले जाणार नाही, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. 

संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने देखील शंका असलेल्यांना सह आरोपी करण्याची मागणी कदम यांच्याकडे केली आहे. त्यावर, ज्यांनी सहकार्य केले त्यांना कडक शिक्षा होणार असे आश्वासन कदम यांनी दिले. देशमुख प्रकरणातील सगळ्या आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दुसऱ्या तालुक्यातील लोक इथं येऊन दहशत माजवत असतील तर त्यांना डायरेक्ट आत मध्ये टाका, अशा सूचनाही गृहराज्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानेच आज इथे आलो आहे. शिंदे साहेबांचं या प्रकरणावर लक्ष आहे, शिंदेसाहेब देशमुख कुटुंबीयांच्या पाठिशी आहेत हा संदेश घेऊनच मी इथे आलो आहे, असेही कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रकरणातील आरोपींना फाशी झाली पाहिजे, या आरोपींनी पुन्हा असं क्रूर कर्म नाही केलं पाहिजे हीच आमची मागणी आहे. जेलमधील आरोपी गळ्यात गमछा घालत आहे. जसा मी इथे आहे, तसेच आरोपी जेलमध्ये आहेत, असे धनंजय देशमुख यांनी गृहराज्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर, ज्या कर्मचाऱ्यावर कुटुंबाला शंका आहे, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे कदम यांनी म्हटले. 

शिवाजी महाराजांच्या काळाप्रमाणेच न्याय होईल

दरम्यान, या प्रकरणाबाबत मी शिंदे साहेबांसोबत चर्चा करणार आहे, माझ्या स्तरावरचे आदेश तर मी दिलेच आहेत. संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर आरोपींना फाशी झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो न्याय दिला, जायचा तसाच न्याय दिला जाईल, असेही गृहराज्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले. 

मुख्य आरोपींचे इतरत्र स्थलांतरण

मुख्य आरोपींना इतरत्र स्थलांतरित करणे हे कुटुंबांची मागणी आहे ही रास्त आहे, मी ही बाब मुख्यमंत्री साहेबांना सांगणार आहे. जेल प्रशासनाच्या प्रमुखांशी मी चर्चा करणार आहे. केस लूज होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे, अशा सूचना मी दिल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्यांवर आरोप आहेत त्यांना समज देऊन चालणार नाही, त्यांना बडतर्फ केले पाहिजे. पोलीस प्रशासनाचे काम काय आहे हे लक्षात आणून देणं आमचं काम आहे, असे पत्रकारांशी बोलताना योगेश कदम यांनी म्हटले. 

हेही वाचा

शिवरायांबद्दल अवमानजनक वक्तव्य, कायदा होणार, तारीख ठरली; गृहमंत्री अमित शाह रायगडावरुन घोषणा करणार

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 एप्रिल 2026 |  बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 एप्रिल 2026 |  बुधवार
सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे-केसरकरांना SIT कधी बोलवणार? खरातप्रकरणी शिवसेनेच्या दीपक केसरकरांचे उत्तर
सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे-केसरकरांना SIT कधी बोलवणार? खरातप्रकरणी शिवसेनेच्या दीपक केसरकरांचे उत्तर

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget