![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
त्या फक्त अफवाच, आमच्यातलं भाजपमध्ये कुणीही जाणार नाही, जयंत पाटलांचं स्पष्टीकरण!
Maharashtra Politics : पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (शऱद पवार) पक्षातील शरद पवारांच्या विश्वासू नेत्याला पक्षात आणण्याच्या भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत, ही बातमी सकाळी धडकली.
![त्या फक्त अफवाच, आमच्यातलं भाजपमध्ये कुणीही जाणार नाही, जयंत पाटलांचं स्पष्टीकरण! Maharashtra Politics NCP sharad pawar group jayant patil clarification marathi news त्या फक्त अफवाच, आमच्यातलं भाजपमध्ये कुणीही जाणार नाही, जयंत पाटलांचं स्पष्टीकरण!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/22/71bffb0f743483441ec3cc0653e915121684774403309290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Politics : पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (शऱद पवार) पक्षातील शरद पवारांच्या विश्वासू नेत्याला पक्षात आणण्याच्या भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत, ही बातमी सकाळी धडकली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील बड्या नेत्याबाबत येणाऱ्या बातम्या केवळ अफवाच आहेत, असे जयंत पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
लोकसभा निवढणुकीपूर्वी भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला धक्के देण्याची रणनिती आखल्याचं वृत्त समोर आले. लोकसभेला 42 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या असतील, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्वाचे आणि ताकदीचे नेते आणले पाहिजेत तरच हे शक्य होईल, असी या रणनीतीमागील भूमिका आहे. नुकताच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपची मराठवाड्यातील ताकद वाढली. नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन मतदारसंघाला त्याचा फायदा होईल. मराठवाड्यानंतर भाजपनं पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याची बातमी सकाळी धडकली. या बातमीचं जयंत पाटील यांच्याकडून खंडन करण्यात आलेय.
फक्त संभ्रम पसरवण्याचं काम -
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार एकसंध आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील बड्या नेत्याबाबत येणाऱ्या बातम्या केवळ अफवाच आहेत, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'एबीपी माझा'ला दिले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केवळ विरोधकांबाबत संभ्रम करण्याचा प्रयत्न असल्याची टीका पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. त्याशिवाय महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही त्यांनी महत्वाची माहिती दिली. असून येत्या दोन-तीन दिवसात जागा वाटपाचा अंतिम निर्णय पूर्ण होणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.
आणखी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)