एक्स्प्लोर

राहुल गांधींची दुसरी उमेदवारी अखेर जाहीर, अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून लढवणार निवडणूक

Rahul Gandhi: राहुल गांधींची दुसरी उमेदवारी अखेर जाहीर झाली आहे.  राहुल यंदा अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत.

Rahul Gandhi:  अनेक दिवस चालढकल केल्यावर राहुल गांधींची (Rahul Gandhi)  दुसरी उमेदवारी अखेर जाहीर झाली आहे.  राहुल यंदा अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून (Raebarli Lok Sabha Election)  निवडणूक लढवणार आहेत.  तर अमेठीतून गांधी कुटुंबीयांचे विश्वासू के.एल. शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. त्यामुळे राहुल गांधी आज दुपारीच अर्ज भरणार आहेत. प्रियांका गांधी देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. शक्तिप्रदर्शनासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे.  

गांधी घराण्यातल्या दिग्गज नेत्यांचा एकेकाळचा गड अर्थात उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून गांधी कुटुंबीयांचे विश्वासू के.एल. शर्मा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  आजच राहुल गांधींची रायबरेलीतून उमेदवारी जाहीर झाली आहे. रायबरेली आणि अमेठीतून आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे परंतु आतापर्यंत उमेदवारी जाहीर झाली नव्हती. सकाळीच काँग्रेसने परिपत्रक प्रसिद्ध करत राहुल गांधींना उमेदवारी जाहीर केली. कालपर्यंत अमेठीतून राहुल गांधी निवडणूक लढवणार असल्याच्य चर्चा होत्या. परंतु आता ते रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहे.  अमेठीपेक्षा रायबरेली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.  2019 साली रायबरेलीमधून सोनिया गांधी निवडून आल्या होत्या. रायबरेलीत कायम काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे. त्यामुळे रायबरेली मतदारसंघ हा काँग्रेसचा गड आहे . 

अमेठीचे बदलली गणित पाहता गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचा वोच शेअर जवळपास 49 टक्के मते मिळाली होती. काँग्रेसचा वोट शेअर हा 40 ते 43 टक्के होता. रायबरेलीच्या बाबतीत चित्र वेगळे आहे. रायबरेलीत काँग्रेसचा वोट शेअर हा 45 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर भाजपचा वोट शेअर हा 33 टक्के होता. त्यामुळे रायबरेली हा मतदारसंघ काँग्रेससाठी जास्त सोईस्कर आहे. मूळ या सगळ्यामागचा मुद्दा होता की, गांधी घराण्यातील कोणीतरी उत्तर भारतातून लोकसभेची जागा लढवावी. कारण उत्तर भारतात काँग्रेसची पकड सैल आणि भाजपची पकड मजबूत होत चालली आहे. कारण काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी उत्तर भारताकडे पाठ फिरवली तर संपूर्ण उत्तर भारत भाजपच्या हातात येईल, असे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे रायबेरली, अमेठी किंवा उत्तर भारतातून गांधी घराण्यातील उमेदवार असा  आग्रह होता. रायबरेलीतून प्रियंका गांधी आणि अमेठीतून राहुल गांधीच्या चर्चा होत्या.मात्र दोघांनी सुरुवातीला निवडणूक लढवण्यास नकार दिला. मात्र सोनिया गांधींच्या मध्यस्तीनंतर राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत.

राहुल गांधींची निवडणुकीय कारकीर्द

2004 साली राहुल गांधींना 3 लाख 90 हजार 179 मतं पडली तर 2 लाख 90 हजार 853 मतांनी त्यांचा विजय झाला. तसेच, 2009 साली त्यांना 4 लाख 64 हजार 195 मतं पडली तर 3 लाख 70 हजार 198 मतांनी ते विजयी झाले. 2014 साली त्यांना 4 लाख 8 हजार 691 मतं मिळाली आणि ते 1 लाख 7 हजार 903 मतांनी विजयी झाले. मात्र, 2019 त्यांना 4 लाख 13 हजार 394 मतं पडली आणि 55 हजार 120 मतांनी त्यांचा पराभव झाला.

हे ही वाचा :

आज पुण्यात राहुल गांधीची तोफ धडाडणार, काँग्रेसचे दिग्गज नेते राहणार उपस्थित

महत्त्वाच्या बातम्या

कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget