एक्स्प्लोर

Manoj Jarange: सगेसोयऱ्यांच्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास विधानसभेच्या 288 जागा लढवणार, मीदेखील निवडणुकीला उभा राहीन: मनोज जरांगे पाटील

Maratha Reservation: पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच मंचावर. पंकजा मुंडेंनी केली मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस. अखंड हरिनाम सप्ताहात जरांगे पाटलांची मोठी घोषणा, विधानसभेला 288 जागा लढवण्याचा इरादा.

बीड: बीडच्या सिरसमार्ग येथे अखंड हरिनाम नारळी सप्ताहाच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि मराठा आंदोलन जरांगे पाटील हे एकाच मंचावर आले होते. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे थेट रुग्णालयातून सप्ताहाला भेट देण्यासाठी आले असल्याने पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी त्यांच्या तब्येतीची विचारणा देखील केली. मात्र, यावेळी मंचावर आसन व्यवस्थेवरून मराठा आंदोलक आणि स्थानिक आयोजक यांच्यात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. तेव्हा पंकजा मुंडे यांनी तात्काळ माईक हातात घेतला आणि सर्वांना शांत राहण्यास सांगितले.

सगेसोयऱ्याची आरक्षणाची अंमलबजावणी न केल्यास 288 विधानसभेच्या जागा लढवणार: मनोज जरांगे पाटील

या कार्यक्रमात मनोज जरांगे यांनी महत्त्वाची घोषणा केली. राज्य सरकारने तात्काळ सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी न केल्यास 288 विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीत मी स्वतः देखील उभा राहीन, असेदेखील ते म्हणाले. आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. आम्हाला फक्त आरक्षण हवे आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्या नेत्यांचा कार्यक्रम मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही.

लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही जरी उमेदवार उभे केले नसले तरी विधानसभेच्या निवडणुकीत सर्व समाजाला एकत्र करून निवडणूक लढणार असून याची तयारी एक महिन्यापासून सुरू केल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये सरकारने मराठा समाजाच्या एकीची धास्ती घेतली असून पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या जात आहेत. तर नरेंद्र मोदींना देखील स्वतःचा प्रचार सोडून आता इतर नेत्यांचा देखील प्रचार करावा लागत आहे, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील सहकारी असलेले गंगाधर काळकुटे यांनी बीडमधून लोकसभेचा अर्ज भरला होता. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, त्यांच्यामागे कोणी आहे का? कारण ते मला भेटून बीडमध्ये गेले आणि अचानक अर्ज कसा भरला याचा शोध घ्यावा लागेल, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय: जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुतीला अप्रत्यक्ष टोला लगावला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना स्वत:चा प्रचार सोडून इतरांचा प्रचार करत फिरावे लागत आहे. मोदी साहेबांना इकडे लक्ष देण्याची गरज नव्हती. पण मराठा समाज एकटवल्याची भीती असल्याने मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात प्रचारासाठी आणावे लागत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

आणखी वाचा

मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला डिवचलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amol Kolhe : शिरुरमध्ये पोलिंग एजंट बनून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मनमानी कारभारEknath Shinde on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ABP MajhaGhatkopar Hoarding Accident : मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना बाहेर काढण्यात यशEknath Shinde Ghatkopar : घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना, पालघरची  सभा आटपून एकनाथ शिंदे घटनास्थळी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Embed widget