एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: रोज कोणी बडबडत असेल, त्याला काय उत्तर देणार ? उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis: स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा  कणा महाराष्ट्र आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले.

नागपूर:  एखादा व्यक्ती रोज बडबड करत असेल त्याला रोज उत्तर देता येत नाही.   वारंवार बडबड करणा-यांची जागा कुठे असते हे तुम्हाला सांगायची गरज नाही, अशी  टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)  उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray)  नाव न घेता केली आहे. महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Din)  निमित्ताने नागपुरातील कस्तुरचंद पार्क मैदानावर शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला . यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले,  आजचा दिवस समृद्ध भारतासाठी समृद्ध महाराष्ट्राचा संकल्प घेण्याचा दिवस आहे. महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य काय असते याची शिकवण दिली. स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा  कणा महाराष्ट्र आहे. 

देशाच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा : देवेंद्र फडणवीस 

देशाचा पावर हाऊस म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं.  देशाच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे. मॅन्युफॅक्चरिंग स्टेट म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं.  देशातील वीस टक्के उत्पादन महाराष्ट्र करतं. देशात सर्वाधिक निर्यात करणारा राज्य महाराष्ट्र आहे.  सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येते. नागपुरचा विकास होत आहे. नागपुरात सर्व प्रकारची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळत आहे. पायाभूत सुविधा सुधारल्या आहेत. भविष्यात नागपूर देशाचा लॉजिस्टिक हब बनेल अशा पद्धतीने तयारी महाराष्ट्र सरकार करत आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात पथसंचलन 

महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात पथसंचलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्य राखीव पोलीस दल, नागपूर शहर पोलिसांचे पुरुष आणि महिला तुकड्या, वाहतूक पोलीस, रेल्वे पोलीस, एनसीसी आणि राष्ट्रीय सेवा योजना च्या तुकड्या तसेच अग्निशमन दल या पथसंचलनात सहभागी झाले होते.  

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

पुण्यातील सभेतून उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केली.  भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही. टरबुजाला घोडे नाही, हातगाडी लागते, असे  उद्धव ठाकरे म्हणाले होते. जय भवानीच महत्व काय कळणार. धाराशिवला गेले पणं तुळजाभवानी मंदिरात गेले नाही, देवेंद्र फडणवीस पण आतापर्यंत तुळजाभवानीच्या मंदिरात गेले नाहीत.  400 पार म्हटल्यावर लोक आज तडीपार म्हणत आहेत. यांना देशाची घटना बदलायची आहे. इंडिया आघाडीचे 300 च्या वर खासदार निवडून येणारच, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

हे ही वाचा :

Thane Lok Sabha Election 2024: महायुतीत ठाण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला, मुख्यमंत्र्याचा हुकुमी एक्का नरेश म्हस्के रिंगणात

Video :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा घणाघात, वळसे पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न
आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा घणाघात, वळसे पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
भाजपाने 12 ट्रॅव्हल्स बुकिंग केल्या; विधानपरिषदेची उमेदवारी भरताच मतदारांना पर्यटनासाठी नेलं, भंडाऱ्यात राजकीय सामना
भाजपाने 12 ट्रॅव्हल्स बुकिंग केल्या; विधानपरिषदेची उमेदवारी भरताच मतदारांना पर्यटनासाठी नेलं, भंडाऱ्यात राजकीय सामना

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget