Ajit Pawar Plane Crash:अजित पवारांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना सांत्वनपर फोन, अंत्यसंस्कारालाही राहणार उपस्थित
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन झाल्यामुळे शरद पवारांसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

PM Modi Call to Sharad Pawar on Ajit Pawar plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झालं आहे . जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये येत असताना विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर सर्वच स्तरांमधून हळहळ व्यक्त केले जात आहे. दरम्यान नवी दिल्लीत असलेल्या शरद पवारांनी थेट बारामती गाठत हेलिकॉप्टरमधून उतरताच हा अपघात कसा झाला? याची माहिती घेतली.अजित पवारांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. अजितदादांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांना सांत्वनपर फोन करत आपल्या संवेदना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उद्या अजित दादांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित राहणार आहेत. (Ajit Pawar Plane Crash)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन झाल्यामुळे शरद पवारांसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अजितदादा आपल्यात नाहीत हे पचवणं अनेकांना कठीण जात आहे. राजकीय वर्तुळातून सर्वच जण पवार कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना सांत्वनपर फोन केला आहे. अजित दादांच्या निधनाने पवार कुटुंबीयांमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या संवेदना व्यक्त केल्या. उद्या अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात सकाळी 11 वाजता अजित पवारांवर अंत्यसंस्कार केले जाणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित पवारांना श्रद्धांजली
अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे .एक्स पोस्ट करून त्यांनी अजित पवार यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद असल्याचे म्हटलं.
ते म्हणाले,"अजित पवार हे जनतेचे नेते होते.त्यांचे तळागाळातील लोकांशी मजबूत संबंध होते.महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे.प्रशासकीय बाबीं बद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे .त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो .ओम शांती "
Before You Go
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार





















